शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

वरुड तालुक्यात शहीद स्मारकांची दुरवस्था

By admin | Updated: March 15, 2016 00:38 IST

स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या आठवणी काळाच्या ओघात हद्दपार होत आहेत.

स्वातंत्र्य संग्रामाच्या स्मृतींवरच कुठाराघात : जतन करण्याची जबाबदारी कुणाची? संजय खासबागे वरूडस्वातंत्र्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या आठवणी काळाच्या ओघात हद्दपार होत आहेत. शहीद स्मृती स्मारकांचीच प्रचंड दुरवस्था झाली आहे. या शहीद स्मारकांमध्ये चक्क तलाठी कार्यालये थाटलेली आहेत. स्मारकांच्या आणि खचलेल्या भिंती अतिशय जीर्ण झाल्या आहेत. तालुक्यातील चार शहीद स्मारकांकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे व्हावे, यासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा इतिहास वरुडला लाभला आहे. तालुक्यात १४० गावांचा विस्तार असून १२० वसलेल्या आणि २० उजाड गावांचा यात समावेश आहे. या गावांचा अंदाजे ४२ तलाठी कारभार पाहत आहेत. येथे सात महसुली मंडळ आहेत. यामध्ये वरुड भाग-१ आणि २, शेंदूरजनाघाट, पुसला, राजुराबाजार, बेनोडा, लोणी, वाठोडा चांदस या गावांचा समावेश आहे. शेंदूरजनाघाट, पुसला आणि राजुराबाजार वगळता तलाठ्यांना हक्काची जागा नसल्याने वरुड, लोणी येथे शहीद स्मारकामध्येच तलाठी कार्यालये थाटली आहेत. बेनोडा येथील शहीद स्मारकात वाचनालय असल्याचे चित्र आहे. इत्तमगांवचे शहिदस्मृती स्मारक ओस पडले आहे. एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार असल्याने एकाच ठिकाणी सुविधा नागरिकांना मिळावी म्हणून शहीद स्मारके ‘हायजॅक’ करण्यात आली. युवा पिढीला शहिदांचे योगदान कळणे आवश्यक आहे. येथे वाचनालय किंवा फोटो प्रदर्शनी असली तर शहिदांच्या आठवणी जागृत राहतील. परंतु शासन, प्रशासन केवळ खाबुगिरीत गुंतल्याने शहिदांच्या आठवणी केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी तसेच १ मे या दिवसांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. या शहीद स्मारकांची उपेक्षा तातडीने थांबविण्याकरिता गांभीर्याने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.शहीद स्मारकातील तलाठ्यांची कागदपत्रे बेवारस राज्य शासनाने शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलेल्या षट्कोणी स्मारकाच्या सभोवताल भिंती नसून जाळया लावण्यात आल्या आहेत. खुल्या वातावरणात येथे असलेले महसुली दस्तऐवज मात्र आजही बेवारस स्थितीत आहेत. याकडे महसूल विभागासह राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे सातबारे असुरक्षित तालुक्यात इत्तमगाव, लोणी आणि बेनोडा येथे शहीद स्मारके बांधण्यात आलीत. शहिदांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न होता. मात्र, या प्रयत्नालाच तिलांजली देण्याचा प्रकार शासनकर्ते करीत आहेत. तलाठी कार्यालयातील सातबारे आणि महसुली कागदपत्रे असुरक्षित असल्याने शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची जोखीम कोण पत्करणार, हा चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.