शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

वरुड तालुक्यात शहीद स्मारकांची दुरवस्था

By admin | Updated: March 15, 2016 00:38 IST

स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या आठवणी काळाच्या ओघात हद्दपार होत आहेत.

स्वातंत्र्य संग्रामाच्या स्मृतींवरच कुठाराघात : जतन करण्याची जबाबदारी कुणाची? संजय खासबागे वरूडस्वातंत्र्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या आठवणी काळाच्या ओघात हद्दपार होत आहेत. शहीद स्मृती स्मारकांचीच प्रचंड दुरवस्था झाली आहे. या शहीद स्मारकांमध्ये चक्क तलाठी कार्यालये थाटलेली आहेत. स्मारकांच्या आणि खचलेल्या भिंती अतिशय जीर्ण झाल्या आहेत. तालुक्यातील चार शहीद स्मारकांकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे व्हावे, यासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा इतिहास वरुडला लाभला आहे. तालुक्यात १४० गावांचा विस्तार असून १२० वसलेल्या आणि २० उजाड गावांचा यात समावेश आहे. या गावांचा अंदाजे ४२ तलाठी कारभार पाहत आहेत. येथे सात महसुली मंडळ आहेत. यामध्ये वरुड भाग-१ आणि २, शेंदूरजनाघाट, पुसला, राजुराबाजार, बेनोडा, लोणी, वाठोडा चांदस या गावांचा समावेश आहे. शेंदूरजनाघाट, पुसला आणि राजुराबाजार वगळता तलाठ्यांना हक्काची जागा नसल्याने वरुड, लोणी येथे शहीद स्मारकामध्येच तलाठी कार्यालये थाटली आहेत. बेनोडा येथील शहीद स्मारकात वाचनालय असल्याचे चित्र आहे. इत्तमगांवचे शहिदस्मृती स्मारक ओस पडले आहे. एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार असल्याने एकाच ठिकाणी सुविधा नागरिकांना मिळावी म्हणून शहीद स्मारके ‘हायजॅक’ करण्यात आली. युवा पिढीला शहिदांचे योगदान कळणे आवश्यक आहे. येथे वाचनालय किंवा फोटो प्रदर्शनी असली तर शहिदांच्या आठवणी जागृत राहतील. परंतु शासन, प्रशासन केवळ खाबुगिरीत गुंतल्याने शहिदांच्या आठवणी केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी तसेच १ मे या दिवसांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. या शहीद स्मारकांची उपेक्षा तातडीने थांबविण्याकरिता गांभीर्याने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.शहीद स्मारकातील तलाठ्यांची कागदपत्रे बेवारस राज्य शासनाने शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलेल्या षट्कोणी स्मारकाच्या सभोवताल भिंती नसून जाळया लावण्यात आल्या आहेत. खुल्या वातावरणात येथे असलेले महसुली दस्तऐवज मात्र आजही बेवारस स्थितीत आहेत. याकडे महसूल विभागासह राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे सातबारे असुरक्षित तालुक्यात इत्तमगाव, लोणी आणि बेनोडा येथे शहीद स्मारके बांधण्यात आलीत. शहिदांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न होता. मात्र, या प्रयत्नालाच तिलांजली देण्याचा प्रकार शासनकर्ते करीत आहेत. तलाठी कार्यालयातील सातबारे आणि महसुली कागदपत्रे असुरक्षित असल्याने शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची जोखीम कोण पत्करणार, हा चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.