शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

जिल्ह्यात शबरी घरकूल योजना कागदावरच

By admin | Updated: October 30, 2015 00:24 IST

आदिवासींना हक्काचे घरकूल मिळावे म्हणून तत्कालीन सरकारने या त्यांच्यासाठी शबरी आदिवासी घरकूल योजना सुरू केली.

अडीच कोटी तिजोरीतच : आदिवासींची घरकुलासाठी भटकंतीमोहन राऊ त अमरावतीआदिवासींना हक्काचे घरकूल मिळावे म्हणून तत्कालीन सरकारने या त्यांच्यासाठी शबरी आदिवासी घरकूल योजना सुरू केली. मात्र, या योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे़ जिल्ह्यात आदिवासींची कुटुंबसंख्या साडेतीन लाखांच्या आकड्यात असताना केवळ अडीच कोटी रूपये आले असूनही हा निधी अद्यापही शासनाच्या तिजोरीतच पडला आहे़ आदिवासी उपाययोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी गत राज्य सरकारने शबरी आदिवासी घरकूल योजना राबवायला सुरूवात केली होती़ मात्र या योजनेसाठी राज्य शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे ही योजना केवळ काही काळ कागदोपत्री ठरली अखेर आदिवासी विकास हक्क संघटनेने मागील गत वर्षी जानेवारी महिन्यात सात दिवस थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण केल्यानंतर या योजनेकडे शासनाने नाममात्र निधी वळविला या निधीतून राज्यातील किती आदिवासींना घरकूल द्यावे, असा सवाल आता आदिवासी विभागालाच पडला आहे़नाशिक विभागाला सर्वाधिक निधी या योजनेंतर्गत देण्यात आला. परंतु या आयुक्तांकडून अमरावती विभागासाठी केवळ १७ कोटी रूपये या योजनेसाठी देण्यात आले त्यातील पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्ह्याला ६७ लाख रूपये मिळाले तर दुसऱ्या टप्प्यात अडीच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे़ एकीकडे आज जिल्ह्यात आदिवासी कुटुंबाची संख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे़ विशेषत: धारणी क्षेत्रात ही आदिवासींची आकडेवारी मोठ्या प्रमाणात आहे़ आदिवासींच्या नावाने मते घेऊन आदिवासींचा विकास करण्याऐवजी योजनेच्या घोषणेचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जातो़ मात्र आदिवासींना घरकुलांचा लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केला जात नसल्याची नाराजी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे़अमरावती, अचलपूर, धामणगाव, चांदूररेल्वे, दर्यापूर, मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, अमरावती शहर, शेंदूरजना घाट या शहरात आदिवासींची संख्या अधिक आहे़ यांना घरकूल देण्यासाठी नगरपरिषद व महानगरपालिका पुढाकार घेत असले तरी सन १९९५ च्या मतदार यादीत नाव तसेच त्या काळात येथे रहिवासी असणे अनिवार्य, अशी अट टाकण्यात आली आहे़ आजही अनेक आदिवासींचे दारिंद्र्यरेषेच्या यादीत नाव नाहीत. त्यामुळे ही दारिंद्र्यरेषेच्या कार्डाची अट शिथिल करावी, अशी मागणी आदिवासी संघटनेने केली आहे़