शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
5
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
6
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
7
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
8
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
9
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
10
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
11
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
12
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
13
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
14
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
15
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
16
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
17
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
18
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
19
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
20
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना

जिल्ह्यात शबरी घरकूल योजना कागदावरच

By admin | Updated: October 30, 2015 00:24 IST

आदिवासींना हक्काचे घरकूल मिळावे म्हणून तत्कालीन सरकारने या त्यांच्यासाठी शबरी आदिवासी घरकूल योजना सुरू केली.

अडीच कोटी तिजोरीतच : आदिवासींची घरकुलासाठी भटकंतीमोहन राऊ त अमरावतीआदिवासींना हक्काचे घरकूल मिळावे म्हणून तत्कालीन सरकारने या त्यांच्यासाठी शबरी आदिवासी घरकूल योजना सुरू केली. मात्र, या योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे़ जिल्ह्यात आदिवासींची कुटुंबसंख्या साडेतीन लाखांच्या आकड्यात असताना केवळ अडीच कोटी रूपये आले असूनही हा निधी अद्यापही शासनाच्या तिजोरीतच पडला आहे़ आदिवासी उपाययोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी गत राज्य सरकारने शबरी आदिवासी घरकूल योजना राबवायला सुरूवात केली होती़ मात्र या योजनेसाठी राज्य शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे ही योजना केवळ काही काळ कागदोपत्री ठरली अखेर आदिवासी विकास हक्क संघटनेने मागील गत वर्षी जानेवारी महिन्यात सात दिवस थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण केल्यानंतर या योजनेकडे शासनाने नाममात्र निधी वळविला या निधीतून राज्यातील किती आदिवासींना घरकूल द्यावे, असा सवाल आता आदिवासी विभागालाच पडला आहे़नाशिक विभागाला सर्वाधिक निधी या योजनेंतर्गत देण्यात आला. परंतु या आयुक्तांकडून अमरावती विभागासाठी केवळ १७ कोटी रूपये या योजनेसाठी देण्यात आले त्यातील पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्ह्याला ६७ लाख रूपये मिळाले तर दुसऱ्या टप्प्यात अडीच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे़ एकीकडे आज जिल्ह्यात आदिवासी कुटुंबाची संख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे़ विशेषत: धारणी क्षेत्रात ही आदिवासींची आकडेवारी मोठ्या प्रमाणात आहे़ आदिवासींच्या नावाने मते घेऊन आदिवासींचा विकास करण्याऐवजी योजनेच्या घोषणेचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जातो़ मात्र आदिवासींना घरकुलांचा लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केला जात नसल्याची नाराजी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे़अमरावती, अचलपूर, धामणगाव, चांदूररेल्वे, दर्यापूर, मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, अमरावती शहर, शेंदूरजना घाट या शहरात आदिवासींची संख्या अधिक आहे़ यांना घरकूल देण्यासाठी नगरपरिषद व महानगरपालिका पुढाकार घेत असले तरी सन १९९५ च्या मतदार यादीत नाव तसेच त्या काळात येथे रहिवासी असणे अनिवार्य, अशी अट टाकण्यात आली आहे़ आजही अनेक आदिवासींचे दारिंद्र्यरेषेच्या यादीत नाव नाहीत. त्यामुळे ही दारिंद्र्यरेषेच्या कार्डाची अट शिथिल करावी, अशी मागणी आदिवासी संघटनेने केली आहे़