शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'भस्म करणे', 'मारून टाकण्या'ची सिद्धी

By admin | Updated: August 30, 2016 23:57 IST

प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या पाचवीतील मुलांवर नरबळीच्या उद्देशाने ज्या आश्रमाच्या हद्दीत हल्ला झाला,

'अनुभव ब्रह्म' : शंकर महाराजांनी लिहिलेल्या पुस्तकात नाना आश्चर्यअमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या पाचवीतील मुलांवर नरबळीच्या उद्देशाने ज्या आश्रमाच्या हद्दीत हल्ला झाला, त्या आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शंकर महाराज यांनी लिहिलेल्या 'अनुभव बह्म' या पुस्तकात ‘कुणाचे खूप नुकसान करणे, मारून टाकणे, भस्म करणे’ यासाठीच्या सिद्धींची चर्चा करण्यात आली आहे. श्री संत शंकर महाराज असे लेखकाचे नाव या 'अनुभव ब्रम्ह' पुस्तकावर नमूद असून प्रकाशन समिती, विश्वमंदिर भक्तीधाम, श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट, श्रीक्षेत्र पिंपळखुटा, असा प्रकाशकाचा उल्लेख आहे. या पुस्तकात एकूण २५ प्रकरणांचा समावेश आहे. ध्यान, उपासना, योग आदी मुद्यांसह त्राटक आणि सिद्धी या विषयांवरही शंकर महाराजांनी लिखाण केले आहे. पुस्तकाच्या प्रारंभी परतवाड्याचे भास्कर मोहोड यांचे ऋणनिर्देश आहेत. त्यात सुरुवातीलाच ‘श्री समर्थ सद्गुरू श्री संत शंकर महाराजांनी श्री समर्थ लहानुजी महाराजांच्या आज्ञेवरून, स्वानुभवातून निर्मिलेला अनुभव ब्रम्ह हा अनुपम ग्रंथ आज आपल्या सेवेशी सादर करताना कृतार्थ वाटत आहे’, असा उल्लेख करण्यात आला आहे.शंकर महाराजांनी पुस्तकाच्या प्रारंभी 'हृदयगत' लिहिले आहे. त्यातील अखेरच्या परिच्छेदात ‘या अनुभवग्रंथाचे सारच असे आहे की, जे यातील रहस्य आपल्या जीवनात अनुभवतील त्यांचे दु:खमय असणाऱ्या संसारातून त्यांच्या ठायी आत्मप्राप्ती होऊन तो संसार सुखमय होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुस्तकातील २१ व्या प्रकरणात शंकर महाराज यांनी ‘योगमार्गातील अष्टसिद्धीचे प्रभाव लक्षण’ लिहिले आहेत. ‘ज्यांना पूर्ण निर्विकल्प समाधी योगाचा अनुभव आलेला असतो त्यांनाच अनिमा, गणिमा, लघीमा, गिरीमा, हुताशनी, महिमा, अंतरयामिनी आणि वाचासिद्धी अशा अष्टसिद्धी प्राप्त होतात’, असा लघु परिचय देऊन या प्रकरणातील आठव्या क्रमांकावर त्यांनी ‘वाचासिद्धी’बाबत केलेले लिखाण असे- ‘शाप किंवा आशीर्वाद हे फलित होणे. ज्याप्रमाणे कोणाला पुत्र-धन देणे, कोणाचे फार मोठे नुकसान करणे, कुणाला मारून टाकणे, कुणाला भस्म करणे, इत्यादी क्रिया प्राप्त होतात. याला वाचा सिद्धी असे म्हणतात’. महाराजांनी लिहिलेल्या या पुस्तकात अनेक अद्भूत मुद्दे आहेत. हा ग्रंथ शंकर महाराजांनी स्वानुभवातून निर्मिलेला असल्याचे ग्रंथाच्या प्रारंभीच स्पष्ट केल्यामुळे पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या रहस्यमय बाबी विशेष महत्त्वपूर्ण ठरतात.