शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

'भस्म करणे', 'मारून टाकण्या'ची सिद्धी

By admin | Updated: August 30, 2016 23:57 IST

प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या पाचवीतील मुलांवर नरबळीच्या उद्देशाने ज्या आश्रमाच्या हद्दीत हल्ला झाला,

'अनुभव ब्रह्म' : शंकर महाराजांनी लिहिलेल्या पुस्तकात नाना आश्चर्यअमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या पाचवीतील मुलांवर नरबळीच्या उद्देशाने ज्या आश्रमाच्या हद्दीत हल्ला झाला, त्या आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शंकर महाराज यांनी लिहिलेल्या 'अनुभव बह्म' या पुस्तकात ‘कुणाचे खूप नुकसान करणे, मारून टाकणे, भस्म करणे’ यासाठीच्या सिद्धींची चर्चा करण्यात आली आहे. श्री संत शंकर महाराज असे लेखकाचे नाव या 'अनुभव ब्रम्ह' पुस्तकावर नमूद असून प्रकाशन समिती, विश्वमंदिर भक्तीधाम, श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट, श्रीक्षेत्र पिंपळखुटा, असा प्रकाशकाचा उल्लेख आहे. या पुस्तकात एकूण २५ प्रकरणांचा समावेश आहे. ध्यान, उपासना, योग आदी मुद्यांसह त्राटक आणि सिद्धी या विषयांवरही शंकर महाराजांनी लिखाण केले आहे. पुस्तकाच्या प्रारंभी परतवाड्याचे भास्कर मोहोड यांचे ऋणनिर्देश आहेत. त्यात सुरुवातीलाच ‘श्री समर्थ सद्गुरू श्री संत शंकर महाराजांनी श्री समर्थ लहानुजी महाराजांच्या आज्ञेवरून, स्वानुभवातून निर्मिलेला अनुभव ब्रम्ह हा अनुपम ग्रंथ आज आपल्या सेवेशी सादर करताना कृतार्थ वाटत आहे’, असा उल्लेख करण्यात आला आहे.शंकर महाराजांनी पुस्तकाच्या प्रारंभी 'हृदयगत' लिहिले आहे. त्यातील अखेरच्या परिच्छेदात ‘या अनुभवग्रंथाचे सारच असे आहे की, जे यातील रहस्य आपल्या जीवनात अनुभवतील त्यांचे दु:खमय असणाऱ्या संसारातून त्यांच्या ठायी आत्मप्राप्ती होऊन तो संसार सुखमय होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुस्तकातील २१ व्या प्रकरणात शंकर महाराज यांनी ‘योगमार्गातील अष्टसिद्धीचे प्रभाव लक्षण’ लिहिले आहेत. ‘ज्यांना पूर्ण निर्विकल्प समाधी योगाचा अनुभव आलेला असतो त्यांनाच अनिमा, गणिमा, लघीमा, गिरीमा, हुताशनी, महिमा, अंतरयामिनी आणि वाचासिद्धी अशा अष्टसिद्धी प्राप्त होतात’, असा लघु परिचय देऊन या प्रकरणातील आठव्या क्रमांकावर त्यांनी ‘वाचासिद्धी’बाबत केलेले लिखाण असे- ‘शाप किंवा आशीर्वाद हे फलित होणे. ज्याप्रमाणे कोणाला पुत्र-धन देणे, कोणाचे फार मोठे नुकसान करणे, कुणाला मारून टाकणे, कुणाला भस्म करणे, इत्यादी क्रिया प्राप्त होतात. याला वाचा सिद्धी असे म्हणतात’. महाराजांनी लिहिलेल्या या पुस्तकात अनेक अद्भूत मुद्दे आहेत. हा ग्रंथ शंकर महाराजांनी स्वानुभवातून निर्मिलेला असल्याचे ग्रंथाच्या प्रारंभीच स्पष्ट केल्यामुळे पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या रहस्यमय बाबी विशेष महत्त्वपूर्ण ठरतात.