शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

संततधार पाऊस, अन्नाविना अनोळखी इसमाचा मृत्यू

By admin | Updated: August 9, 2015 00:24 IST

राहायला घर नाही, खायला अन्न नाही. त्यात संततधार पाऊस आणि वातावरणात गारवा, अशा स्थितीत परिस्थितीने आधीच जीर्ण झालेल्या ...

परिचारिका वसतिगृहासमोरील घटना : निराधार, बेघर नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमचवैभव बाबरेकर अमरावतीराहायला घर नाही, खायला अन्न नाही. त्यात संततधार पाऊस आणि वातावरणात गारवा, अशा स्थितीत परिस्थितीने आधीच जीर्ण झालेल्या आणि दररोज फुटपाथवर झोपणाऱ्या त्या अनोळखी इसमाला तग धरता आला नाही. थंडी व अन्नाविना तडफडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी इर्विन चौकातील परिचारिका वसतिगृहासमोर घडली. अद्याप ‘त्या’ अनोळखी इसमाची ओळख पटली नसून शहर कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ४८ तास संततधार पाऊस बरसला. या तीन दिवसांत शेकडो निराधार व बेघर नागरिकांचे अक्षरश: हालहाल झाले. पाऊस नसताना निदान उघड्यावर जीवन कंठणाऱ्या लोकांना एखाद्या सहृदयाकडून खायला तरी मिळते. पण, पावसात ती देखील सोय होत नाही. त्यात पावसामुळे वातावरण गारठलेले. अंगावर पुरते कपडे नाहीत. त्यामुळे हा गारठा आणि पोटात उठलेल्या भुकेच्या आगडोंबामुळेच ‘त्या’ निराधाराचा मृत्यू झाला. परिचारिका वसतिगृहासमोरील फुटपाथ भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. येथे अनेक दिवसांपासून चार भिकारी तळ ठोकून आहेत. यातील एकाची अवस्था काही दिवसांपासून अन्नावाचून अत्यंत वाईट झाली होती. त्यातच त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो चालू शकत नव्हता. पावसामुळे त्याला मदतही मिळाली नाही. शेवटी शनिवारी सकाळी भुकेने तडफडून त्याचा मृत्यू झाला. महापालिकेचे आश्रयस्थान कुचकामीनिराधारांसाठी महानगरपालिकेने आश्रयस्थाने उघडली आहेत. मात्र, ती कुचकामी ठरत आहेत. शहरात विविध भागात अनेक लोक भीक मागतात. मात्र, पाऊस व थंडीच्या वातावरणात बहुतांश निराधारांचा मृत्यू होतो. दरवर्षीच शहरात हे चित्र पाहायला मिळते. संततधार पाऊस, थंडी आणि भुकेमुळे अशक्तपणा येतो. ‘त्या’ अनोळखी इसमाच्या पायाला दुखापत होती. त्याचा अन्नाविना मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मृत्यूचे निश्चित कारण शवविच्छेदनांतर कळेल. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रूग्णालय.