शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

संततधार पाऊस, अन्नाविना अनोळखी इसमाचा मृत्यू

By admin | Updated: August 9, 2015 00:24 IST

राहायला घर नाही, खायला अन्न नाही. त्यात संततधार पाऊस आणि वातावरणात गारवा, अशा स्थितीत परिस्थितीने आधीच जीर्ण झालेल्या ...

परिचारिका वसतिगृहासमोरील घटना : निराधार, बेघर नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमचवैभव बाबरेकर अमरावतीराहायला घर नाही, खायला अन्न नाही. त्यात संततधार पाऊस आणि वातावरणात गारवा, अशा स्थितीत परिस्थितीने आधीच जीर्ण झालेल्या आणि दररोज फुटपाथवर झोपणाऱ्या त्या अनोळखी इसमाला तग धरता आला नाही. थंडी व अन्नाविना तडफडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी इर्विन चौकातील परिचारिका वसतिगृहासमोर घडली. अद्याप ‘त्या’ अनोळखी इसमाची ओळख पटली नसून शहर कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ४८ तास संततधार पाऊस बरसला. या तीन दिवसांत शेकडो निराधार व बेघर नागरिकांचे अक्षरश: हालहाल झाले. पाऊस नसताना निदान उघड्यावर जीवन कंठणाऱ्या लोकांना एखाद्या सहृदयाकडून खायला तरी मिळते. पण, पावसात ती देखील सोय होत नाही. त्यात पावसामुळे वातावरण गारठलेले. अंगावर पुरते कपडे नाहीत. त्यामुळे हा गारठा आणि पोटात उठलेल्या भुकेच्या आगडोंबामुळेच ‘त्या’ निराधाराचा मृत्यू झाला. परिचारिका वसतिगृहासमोरील फुटपाथ भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. येथे अनेक दिवसांपासून चार भिकारी तळ ठोकून आहेत. यातील एकाची अवस्था काही दिवसांपासून अन्नावाचून अत्यंत वाईट झाली होती. त्यातच त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो चालू शकत नव्हता. पावसामुळे त्याला मदतही मिळाली नाही. शेवटी शनिवारी सकाळी भुकेने तडफडून त्याचा मृत्यू झाला. महापालिकेचे आश्रयस्थान कुचकामीनिराधारांसाठी महानगरपालिकेने आश्रयस्थाने उघडली आहेत. मात्र, ती कुचकामी ठरत आहेत. शहरात विविध भागात अनेक लोक भीक मागतात. मात्र, पाऊस व थंडीच्या वातावरणात बहुतांश निराधारांचा मृत्यू होतो. दरवर्षीच शहरात हे चित्र पाहायला मिळते. संततधार पाऊस, थंडी आणि भुकेमुळे अशक्तपणा येतो. ‘त्या’ अनोळखी इसमाच्या पायाला दुखापत होती. त्याचा अन्नाविना मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मृत्यूचे निश्चित कारण शवविच्छेदनांतर कळेल. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रूग्णालय.