शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आठ कोटींच्या पाणीटंचाई आराखड्यावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: January 25, 2017 00:10 IST

यंदाच्या उन्हाळयातही जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता...

जिल्हा परिषद : जिल्हाधिकाऱ्यांची हिरवी झेंडी, सातशे गावांत ७३७ पाणीटंचाई उपाययोजनाअमरावती : यंदाच्या उन्हाळयातही जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाने सुमारे ८ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार केला असून याआराखडयास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाने यंदाच्या पाणीटंचाईच्या संभाव्य कृती आराखड्यात जिल्ह्यात ७०० गावांमध्ये ७३७ पाणीटंचाईच्या उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी जवळपास ८ कोटी ७८ लाख ५६ हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत पाणीटंचाईच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात कुठेही पाण्याची समस्या निर्माण झाली नाही. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील ४३६ गावे व वाडयांमध्ये मागणीनुसार उपाययोजना प्रस्तावित आहेत. पाणीटंचाईच्या तिसऱ्या टप्प्यातील एप्रिल ते जून २०१७ याकालावधीत काही गावांत तीव्र पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यामुळे जि.प.पाणीपुरवठा विभागाने २६४ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना केली आहे. संभाव्य कृती आराखडयात नवीन विंधन विहिरी १९७, नळयोजनांची विशेष दुरूस्ती १४२, तात्पुरत्या पूरक नळयोजना ४०, टँकर अथवा बैलजोडीने पाणीपुरवठा करणे १५ गावे, विहिरींचे अधिग्रहण १९० यासोबतच वेळेवर उद्भवणाऱ्या परीस्थितीनुसार विहिंरीचे खोलीकरण, गाळ काढणे, विंधन विहिरींची दुरूस्ती आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईचा कृ ती आराखडा तयार केला आहे. सुमारे ८ कोटी ७८ लाख ५६ हजार रूपयाच्या या आराखडयास जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी हिरवी झेंडी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनुसार पाणीटंचाई आराखडयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे पाणीेटंचाईच्या उपाययोजनांना गती येईल. तसेच कोणत्याही तालुक्यात तीव्र पाणीटंचाईची स्थिती उत्पन्न होणार नाही. (प्रतिनिधी)यंदा आराखड्याची रक्कम घटलीजिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने मागील वर्षी सुमारे १० कोटी रूपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला होता.मात्र, यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने संभाव्य पाणीटंचाई आराखडयाची रक्कम ८ कोटी ७८ लाख ५६ हजार रूपये इतकी आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत साधारणपणे १ कोटी रूपयांनी आराखडयाचे नियोजन घटले आहे.टँकर्सची संख्या वाढण्याची शक्यतादरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील १५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, यंदा कमी झालेला पाऊस लक्षात घेता टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.