शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

एका तासात मिळणार सातबारा नोंदणीची नोटीस

By admin | Updated: May 24, 2014 23:16 IST

भूमी अभिलेख विभागाने चावडी व ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सातबारा स्कॅनिंग केले आहे. या ई-फेरफार आणि नोंदणी विभागात ‘आय सरिता’ या सॉफ्टवेअरची जोडणी करण्यात आली आहे.

अमरावती : भूमी अभिलेख विभागाने चावडी व ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सातबारा स्कॅनिंग केले आहे. या ई-फेरफार आणि नोंदणी विभागात ‘आय सरिता’ या सॉफ्टवेअरची जोडणी करण्यात आली आहे. यामुळे दस्त नोंदणीनंतर एका तासात तलाठय़ांना ऑनलाईन नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांमध्ये सातबारावर नाव नोंदणी केली जाणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली. ‘आय सरिता’ या सॉफ्टवेअरची जोडणी करण्यात आली आहे. त्यामध्ये व्यवहाराची नोंद होताना दुय्यम निबंधकांकडे संबंधित मिळकतीचा सातबारा उपलब्ध होणार आहे. याची माहिती तत्काळ मिळणार असल्याने फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत.

जागा विक्री करताना खोटे सातबारा उतारा तयार करण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. प्रामुख्याने एखाद्या मिळकतीचे मालकी हक्क नसताना त्याची परस्पर विक्री करणे किंवा एकाच मिळकतीची अनेकांना विक्री करणे अशा घटना सर्रास घडत होत्या. दस्तऐवजातील मिळकतीच्या मालकी हक्काची पडताळणी करण्याची जबाबदारी दुय्यम निबंधकांवर नाही. तसेच या मुद्यावरून त्याला दस्त नोंदणी करणे नाकारताही येत नाही. या तरतुदीचा गैरफायदा घेऊन मिळकतीचे व्यवहारही नोंद होतात. यामुळे दस्त नोंदणी करताना होणारी फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकार नव्या तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.

राष्ट्रीय भूमी अभिलेख

संबंधित व्यक्तीने दस्त करार केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तलाठय़ांना नोटीस दिली जाईल. याबाबत भूमी अभिलेख विभागाचे आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, दस्त नोंदणी केल्यानंतर फेरफार उतारा आणि सातबारा उतार्‍यावर नोंदणी करण्यासाठी जागा मालकास इंडेक्स- २ घेऊन तलाठी कार्यालयात जावे लागते. त्यावर तलाठी नोंदी घालतो. परंतु या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि जागामालकाची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या सुविधेनुसार खरेदीखत नोंदणीसाठी नोंदणी कार्यालयात आल्यानंतर जागा मालक आणि खरेदीदारांना दस्त नोंदणी झाल्यानंतर एका तासामध्ये त्याच ठिकाणी नोटीस दिली जाईल. त्यामुळे त्यांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नसेल. नोटीस मिळाल्यानंतर पंधरा दिवसांनी सातबारावर नोंदणी होईल. लवकरच ही योजना राज्यभर लागू करण्यात येणार आहे. शासनाच्या या नव्या उपक्रमामुळे सातबाराच्या बनावट प्रती काढून केले जाणारे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल. तसेच यामुळे शेतकर्‍यांची फसवणूकसुद्धा टाळता येईल. जागेच्या मालकांची फसवणूक टाळण्यासाठीचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. (प्रतिनिधी)