शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

एका तासात मिळणार सातबारा नोंदणीची नोटीस

By admin | Updated: May 24, 2014 23:16 IST

भूमी अभिलेख विभागाने चावडी व ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सातबारा स्कॅनिंग केले आहे. या ई-फेरफार आणि नोंदणी विभागात ‘आय सरिता’ या सॉफ्टवेअरची जोडणी करण्यात आली आहे.

अमरावती : भूमी अभिलेख विभागाने चावडी व ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सातबारा स्कॅनिंग केले आहे. या ई-फेरफार आणि नोंदणी विभागात ‘आय सरिता’ या सॉफ्टवेअरची जोडणी करण्यात आली आहे. यामुळे दस्त नोंदणीनंतर एका तासात तलाठय़ांना ऑनलाईन नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांमध्ये सातबारावर नाव नोंदणी केली जाणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली. ‘आय सरिता’ या सॉफ्टवेअरची जोडणी करण्यात आली आहे. त्यामध्ये व्यवहाराची नोंद होताना दुय्यम निबंधकांकडे संबंधित मिळकतीचा सातबारा उपलब्ध होणार आहे. याची माहिती तत्काळ मिळणार असल्याने फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत.

जागा विक्री करताना खोटे सातबारा उतारा तयार करण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. प्रामुख्याने एखाद्या मिळकतीचे मालकी हक्क नसताना त्याची परस्पर विक्री करणे किंवा एकाच मिळकतीची अनेकांना विक्री करणे अशा घटना सर्रास घडत होत्या. दस्तऐवजातील मिळकतीच्या मालकी हक्काची पडताळणी करण्याची जबाबदारी दुय्यम निबंधकांवर नाही. तसेच या मुद्यावरून त्याला दस्त नोंदणी करणे नाकारताही येत नाही. या तरतुदीचा गैरफायदा घेऊन मिळकतीचे व्यवहारही नोंद होतात. यामुळे दस्त नोंदणी करताना होणारी फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकार नव्या तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.

राष्ट्रीय भूमी अभिलेख

संबंधित व्यक्तीने दस्त करार केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तलाठय़ांना नोटीस दिली जाईल. याबाबत भूमी अभिलेख विभागाचे आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, दस्त नोंदणी केल्यानंतर फेरफार उतारा आणि सातबारा उतार्‍यावर नोंदणी करण्यासाठी जागा मालकास इंडेक्स- २ घेऊन तलाठी कार्यालयात जावे लागते. त्यावर तलाठी नोंदी घालतो. परंतु या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि जागामालकाची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या सुविधेनुसार खरेदीखत नोंदणीसाठी नोंदणी कार्यालयात आल्यानंतर जागा मालक आणि खरेदीदारांना दस्त नोंदणी झाल्यानंतर एका तासामध्ये त्याच ठिकाणी नोटीस दिली जाईल. त्यामुळे त्यांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नसेल. नोटीस मिळाल्यानंतर पंधरा दिवसांनी सातबारावर नोंदणी होईल. लवकरच ही योजना राज्यभर लागू करण्यात येणार आहे. शासनाच्या या नव्या उपक्रमामुळे सातबाराच्या बनावट प्रती काढून केले जाणारे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल. तसेच यामुळे शेतकर्‍यांची फसवणूकसुद्धा टाळता येईल. जागेच्या मालकांची फसवणूक टाळण्यासाठीचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. (प्रतिनिधी)