शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सात दशलक्ष लिटर पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: June 29, 2015 00:34 IST

सिंभोरा धरणातून ११८ दशलक्ष लिटर पाण्याची उचल दररोज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून केली जाते.

पाईपलाईनला गळती : शहरातही दररोज ३० टक्के पाण्याची नासाडीवैभव बाबरेकर अमरावतीसिंभोरा धरणातून ११८ दशलक्ष लिटर पाण्याची उचल दररोज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून केली जाते. मात्र, हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सात दशलक्ष लिटर पाण्याची गळती होत आहे. शहरातही दररोज ३० टक्के पाण्याचा गळतीमुळे अपव्यय होत आहे. एकीकडे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे घसा कोरडा करून सांगितले जाते, तर दुसरीकडे कितीतरी पाण्याची अशी विनाकारण नासाडी होत आहे. जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई उद्भवते. अनेक ठिकाणी तर पावसाळा, हिवाळ्यातही पाणीटंचाई भासते. मात्र, तरीही पाण्याचा हा अपव्यय रोखला जात नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत दररोज सिंभोरा धरणातून ११८ दशलक्ष लिटर पाण्याची उचल करून अमरावती शहराला दररोज ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, विनाकारण होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्याचे प्रयत्न होेत नाहीत. गळतीमुळे दूषित पाणीपुरवठासिंभोरा धरणातील पाणी जलशुध्दीकरण केंद्रावर शुध्द होते. मात्र, तेथून शहरात पाणी पुरवठा करताना होणारी गळती, पाणी चोरी, अपव्यय व नाल्यातून गेलेल्या लिकेज पाईपलाईनमुळे पाणी दूषित होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. चोरी न करता अधिकृत नळजोडणी करून घेणे आवश्यक आहे. सिंभोरा धरणातून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा होतो. दरम्यान पाईप लाइनमधून सात दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वाया जाते. पाणी गळती रोखण्याचा प्रयत्न जीवन प्राधिकरणमार्फत होत आहेत.- डी.एन. आमले, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण