शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कोरोनाचे सात मृत्यू, 727 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. महापालिकेत आयुक्त प्रशांत रोडे यांनी होम आयसोलेशन व स्वॅब सेंटरचा आढावा घेतला, तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केंद्रांना भेटी दिल्या व सर्व धर्मगुरूंसोबत बैठक घेऊन नागरिकांना कोरोनाप्रति जागरूक होण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा पुन्हा हादरा, जिल्हा प्रशासनाचा बैठकांचा केवळ रतीब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्गाने शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून पुन्हा ७२७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. २,१३१ नमुन्यांच्या तपासणीतून हा आकडा पुढे आला आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता २८,८१५ इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमित रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. महापालिकेत आयुक्त प्रशांत रोडे यांनी होम आयसोलेशन व स्वॅब सेंटरचा आढावा घेतला, तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केंद्रांना भेटी दिल्या व सर्व धर्मगुरूंसोबत बैठक घेऊन नागरिकांना कोरोनाप्रति जागरूक होण्याचे आवाहन केले आहे.वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने सर्वच तालुक्यांत उपचार केंद्रे सुरू झाली व नागरिकांना स्वॅब देण्यास सोईचे व्हावे, यासाठी स्वॅब सेंटरची संख्या वाढविण्यात आली आहे. शासनस्तरावरदेखील अमरावती जिल्ह्यातील वाढत्या संसर्गाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शासनाचे अधिकारी दररोज आढावा घेत आहेत. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांद्वारेही नियमित व्हीसीद्वारे आढावा घेण्यात येत आहे.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात दंडनीय कारवाई सुरू आहे. जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांची मृत्युसंख्या ४६० झाली आहे. कोरोना संसर्गात मृत्यूचे सत्र सुरू झाल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. सीएसच्या माहितीनुसार, शहरातील आनंद विहारातील ३३ वर्षीय तरुण, अर्जुननगरातील ६६ वर्षीय, छांगानीनगरातील ७९ वर्षीय, अंबापेठेतील ८४ वर्षीय, डोंगरयावली येथील ८० वर्षीय पुरुष, दीपनगरातील ६८ वर्षीय व पंचवटी चौकातील ५८ वर्षीय महिलेचा  शनिवारी मृत्यू झाला.

महापालिका क्षेत्रात कंटेनमेंट झोन घोषितशासनाच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात पुन्हा कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शनिवारी महापालिका प्रशासनाद्वारे श्रीकृष्ण पेठ, सबनीस प्लॉट, महाजनपुरा, एलआयसी कॉलनी, भाजीबाजार, अनुराधानगर (सद्गुरू धाम कॉलनीजवळ), चंद्रावतीनगर, उषा कॉलनी, भारतनगर (द्वारकानगरजवळ), साईनगर, खंडेश्वर कॉलनी, गोकुळ (उदय कॉलनीजवळ) हे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.

रविवारी संचारबंदीकोरोनाची संसर्गाला ब्रेक लागावा, यासाठी शनिवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ८ पर्यंत जिल्हा प्रशासनाने कर्फ्यू घोषित केलेला आहे. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे ठप्प असणे अपेक्षित आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या