शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सात कोटींचा हप्ता, तीन लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:13 IST

नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल व इतर बाबींमुळे फळपिकांना होणाऱ्या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे,

शेतकऱ्यांची थट्टा : फळपीक विमा योजनेचा फोलपणा उघडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल व इतर बाबींमुळे फळपिकांना होणाऱ्या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यात हवामानावर आधारित फळपिक योजना सन २०१६-१७ या कालावधीत राबविण्यात आली. यासाठी १७ हजार १२५ शेतकऱ्यांनी २० हजार ४३५ हेक्टर क्षेत्रासाठी १४३ कोटी ७ लाख रूपयांचा विमा संरक्षित केला व सात कोटी १५ लाख ३५ हजारांच्या विमा हप्ता भरला. प्रत्यक्षात केवळ पाच शेतकऱ्यांना तीन लाख २४ हजारांची भरपाई मिळाल्याने विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा शासनाने आरंभली असून केवळ विमा कंपन्यांना लाभ देण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे.राष्ट्रीय पीकविमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा राज्यात अधिसूचित फळपीकांसाठी राबविण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील संत्रा, केळी व मोसंबी या फळपीकांचा समावेश यायोजनेत करण्यात आला. संत्रा पिकासाठी १२ तालुक्यांतील ७० महसूल मंडळात अधिसूचित करण्यात आले. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे वारे व गारपीट यापासून विमायोजनेच्या तरतुदीप्रमाणे फळपीकांसाठी निर्धारित कालावधीत शेतकऱ्यांना विमासंरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे तसेच हवामान घटकावर आधारित फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. जिल्ह्यातील १७ हजार १२५ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. प्रत्यक्षात नुकसान भरपाई जाहीर झाल्यानंतर योजनेचा फोलपणा उघड झाला आहे.फळपीकांसाठी पीककर्जाची मर्यादा मंजूर आहे. अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना सक्तीची असून बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक स्वरूपाची होती. फळपीकांसाठी विमा हप्ता दर १२ टक्के असून राज्य व केंद्र शासनाचे प्रत्येकी ५० टक्के अनुदान यायोजनेत आहे. मात्र, योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विम्याची भरपाई जाहीर झाली असता विमा कंपनीव्दारा शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे. अमरावती उपविभागात तीन हजार ७३३ शेतकऱ्यांनी चार हजार ३०७ हेक्टरसाठी ३० कोटी १५ लाख ३७ हजारांचा विमा संरक्षित केला. यासाठी एक कोटी ५० लाख ७६ हजारांच्या विमा हप्त्याचा भरणा केला. मात्र, एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. मोर्शी उपविभागात १० हजार २६३ शेतकऱ्यांनी ११ हजार ९१५ हेक्टरसाठी ८३ कोटी ४३ हजारांचा विमा संरक्षित केला. यासाठी चार कोटी १७ लाख ९६ हजारांचा विमा संरक्षित केला. प्रत्यक्षात पाच शेतकऱ्यांना तीन लाख २४ हजारांची भरपाई देण्यात आली आहे. अचलपूर तालुक्यात तीन हजार १२९ शेतकऱ्यांनी चार हजार २११ हेक्टर हेक्टरसाठी एक कोटी ४७ लाख ४३ हजारांचा विमा संरक्षित केला. योजनेची भरपाई जाहीर झाली असता एकाही शेतकऱ्याला विमा मिळाला नाही.