शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

सात कोटींचा हप्ता, तीन लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:13 IST

नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल व इतर बाबींमुळे फळपिकांना होणाऱ्या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे,

शेतकऱ्यांची थट्टा : फळपीक विमा योजनेचा फोलपणा उघडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल व इतर बाबींमुळे फळपिकांना होणाऱ्या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यात हवामानावर आधारित फळपिक योजना सन २०१६-१७ या कालावधीत राबविण्यात आली. यासाठी १७ हजार १२५ शेतकऱ्यांनी २० हजार ४३५ हेक्टर क्षेत्रासाठी १४३ कोटी ७ लाख रूपयांचा विमा संरक्षित केला व सात कोटी १५ लाख ३५ हजारांच्या विमा हप्ता भरला. प्रत्यक्षात केवळ पाच शेतकऱ्यांना तीन लाख २४ हजारांची भरपाई मिळाल्याने विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा शासनाने आरंभली असून केवळ विमा कंपन्यांना लाभ देण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे.राष्ट्रीय पीकविमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा राज्यात अधिसूचित फळपीकांसाठी राबविण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील संत्रा, केळी व मोसंबी या फळपीकांचा समावेश यायोजनेत करण्यात आला. संत्रा पिकासाठी १२ तालुक्यांतील ७० महसूल मंडळात अधिसूचित करण्यात आले. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे वारे व गारपीट यापासून विमायोजनेच्या तरतुदीप्रमाणे फळपीकांसाठी निर्धारित कालावधीत शेतकऱ्यांना विमासंरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे तसेच हवामान घटकावर आधारित फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. जिल्ह्यातील १७ हजार १२५ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. प्रत्यक्षात नुकसान भरपाई जाहीर झाल्यानंतर योजनेचा फोलपणा उघड झाला आहे.फळपीकांसाठी पीककर्जाची मर्यादा मंजूर आहे. अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना सक्तीची असून बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक स्वरूपाची होती. फळपीकांसाठी विमा हप्ता दर १२ टक्के असून राज्य व केंद्र शासनाचे प्रत्येकी ५० टक्के अनुदान यायोजनेत आहे. मात्र, योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विम्याची भरपाई जाहीर झाली असता विमा कंपनीव्दारा शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे. अमरावती उपविभागात तीन हजार ७३३ शेतकऱ्यांनी चार हजार ३०७ हेक्टरसाठी ३० कोटी १५ लाख ३७ हजारांचा विमा संरक्षित केला. यासाठी एक कोटी ५० लाख ७६ हजारांच्या विमा हप्त्याचा भरणा केला. मात्र, एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. मोर्शी उपविभागात १० हजार २६३ शेतकऱ्यांनी ११ हजार ९१५ हेक्टरसाठी ८३ कोटी ४३ हजारांचा विमा संरक्षित केला. यासाठी चार कोटी १७ लाख ९६ हजारांचा विमा संरक्षित केला. प्रत्यक्षात पाच शेतकऱ्यांना तीन लाख २४ हजारांची भरपाई देण्यात आली आहे. अचलपूर तालुक्यात तीन हजार १२९ शेतकऱ्यांनी चार हजार २११ हेक्टर हेक्टरसाठी एक कोटी ४७ लाख ४३ हजारांचा विमा संरक्षित केला. योजनेची भरपाई जाहीर झाली असता एकाही शेतकऱ्याला विमा मिळाला नाही.