शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

सात कोटींचा हप्ता, तीन लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:13 IST

नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल व इतर बाबींमुळे फळपिकांना होणाऱ्या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे,

शेतकऱ्यांची थट्टा : फळपीक विमा योजनेचा फोलपणा उघडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल व इतर बाबींमुळे फळपिकांना होणाऱ्या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यात हवामानावर आधारित फळपिक योजना सन २०१६-१७ या कालावधीत राबविण्यात आली. यासाठी १७ हजार १२५ शेतकऱ्यांनी २० हजार ४३५ हेक्टर क्षेत्रासाठी १४३ कोटी ७ लाख रूपयांचा विमा संरक्षित केला व सात कोटी १५ लाख ३५ हजारांच्या विमा हप्ता भरला. प्रत्यक्षात केवळ पाच शेतकऱ्यांना तीन लाख २४ हजारांची भरपाई मिळाल्याने विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा शासनाने आरंभली असून केवळ विमा कंपन्यांना लाभ देण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे.राष्ट्रीय पीकविमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा राज्यात अधिसूचित फळपीकांसाठी राबविण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील संत्रा, केळी व मोसंबी या फळपीकांचा समावेश यायोजनेत करण्यात आला. संत्रा पिकासाठी १२ तालुक्यांतील ७० महसूल मंडळात अधिसूचित करण्यात आले. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे वारे व गारपीट यापासून विमायोजनेच्या तरतुदीप्रमाणे फळपीकांसाठी निर्धारित कालावधीत शेतकऱ्यांना विमासंरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे तसेच हवामान घटकावर आधारित फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. जिल्ह्यातील १७ हजार १२५ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. प्रत्यक्षात नुकसान भरपाई जाहीर झाल्यानंतर योजनेचा फोलपणा उघड झाला आहे.फळपीकांसाठी पीककर्जाची मर्यादा मंजूर आहे. अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना सक्तीची असून बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक स्वरूपाची होती. फळपीकांसाठी विमा हप्ता दर १२ टक्के असून राज्य व केंद्र शासनाचे प्रत्येकी ५० टक्के अनुदान यायोजनेत आहे. मात्र, योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विम्याची भरपाई जाहीर झाली असता विमा कंपनीव्दारा शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे. अमरावती उपविभागात तीन हजार ७३३ शेतकऱ्यांनी चार हजार ३०७ हेक्टरसाठी ३० कोटी १५ लाख ३७ हजारांचा विमा संरक्षित केला. यासाठी एक कोटी ५० लाख ७६ हजारांच्या विमा हप्त्याचा भरणा केला. मात्र, एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. मोर्शी उपविभागात १० हजार २६३ शेतकऱ्यांनी ११ हजार ९१५ हेक्टरसाठी ८३ कोटी ४३ हजारांचा विमा संरक्षित केला. यासाठी चार कोटी १७ लाख ९६ हजारांचा विमा संरक्षित केला. प्रत्यक्षात पाच शेतकऱ्यांना तीन लाख २४ हजारांची भरपाई देण्यात आली आहे. अचलपूर तालुक्यात तीन हजार १२९ शेतकऱ्यांनी चार हजार २११ हेक्टर हेक्टरसाठी एक कोटी ४७ लाख ४३ हजारांचा विमा संरक्षित केला. योजनेची भरपाई जाहीर झाली असता एकाही शेतकऱ्याला विमा मिळाला नाही.