शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

रोहयोच्या कामात कार्यान्वयन यंत्रणावर वरिष्ठ नाखुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:17 IST

अमरावती : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सर्व कार्यान्वयन यंत्रणा मनरेगा कामे घेण्यात सहभाग नसल्याने यावर विभागीय आयुक्तांनी ...

अमरावती : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सर्व कार्यान्वयन यंत्रणा मनरेगा कामे घेण्यात सहभाग नसल्याने यावर विभागीय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाचा अपवाद वगळता अन्य आठ कार्यान्वन यंत्रणांना वार्षिक कृती आराखडा व पुरवणी कृती आराखडा सन २०२१-२२ मध्ये समाविष्ट कामे संबंधित यंत्रणांना सुरू करण्यासाठी निर्देश द्यावे, अशा लेखी सूचना विभागीय आयुक्तांनी १६ ऑगस्ट रोजी संबंधित विभागाच्या यंत्रणा प्रमुखांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिल्या आहेत.

रोजगार हमी योजनेंतंर्गत २६० अनुज्ञेय कामांची यादी ठेवण्यात आली आहे. या कामांच्या कार्यान्वयन यंत्रणा ठरवून देण्यात आल्या आहेत. शासननिर्णयानुसार अभिसरण आणि संयोजनातून मनरेगाची १०० टक्के कामे घेता येत असल्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागातील प्रौढ मजुरांना मजुरी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागामध्ये दीर्घकालीन टिकाऊ मालमत्ता निर्माण करणे, पंचायत व्यवस्था बळकटीकरणाशिवाय मनेगातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून शेतकऱ्यांना लखपती करणे, मजूर व गावे समृद्ध करणे ही योजनेची उदिष्ट डोळ्यांसमोर ठेण्यात आले आहेत. हे स्पप्न साकार करण्यासाठी सर्व यंत्रणेने मनरेगा अंतर्गत कामे घेण्याचे निर्देश आहेत. परंतु, यात ग्रामपंचायतीचा अपवाद सोडला, तर अन्य यंत्रणांचा कामे घेण्यासाठीचा सहभाग नामधारी आहे. यामुळे वार्षिक कृती आराखडा व पुरवणी कृती आराखडा सन २०२१-२२ मध्ये समाविष्ट कामे संबंधित यंत्रणांना सुरूच केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, रेशीम विकास, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जलसंधारण, जलसंपदा, लघुसिंचन, सार्वजनिक बांधकाम, मत्स्य विकास, रेल्वे आदी विभागांना रोहयोची कामे सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना दिले आहेत.

बॉक्स

विभाग सुरू असलेली कामे

ग्रामपंचायत ४३३९, सामाजिक वनीकरण १७४, कृषी विभाग १२२, रेशीम विकास २९, जिल्हा परिषद, पंचायत समिती २५, जलसंधारण १५, जलसंपदा ४, लघुसिंचन १, तर सार्वजनिक बांधकाम, मत्स्य विकास, रेल्वे या विभागात एकही काम सुरू केलेले नाहीत.

कोट

रोहयोच्या कामात कार्यान्वयन यंत्रणेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. कामे जास्तीत जास्त वाढविण्यावर भर राहणार आहे.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद