शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

रोहयोच्या कामात कार्यान्वयन यंत्रणावर वरिष्ठ नाखुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:17 IST

अमरावती : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सर्व कार्यान्वयन यंत्रणा मनरेगा कामे घेण्यात सहभाग नसल्याने यावर विभागीय आयुक्तांनी ...

अमरावती : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सर्व कार्यान्वयन यंत्रणा मनरेगा कामे घेण्यात सहभाग नसल्याने यावर विभागीय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाचा अपवाद वगळता अन्य आठ कार्यान्वन यंत्रणांना वार्षिक कृती आराखडा व पुरवणी कृती आराखडा सन २०२१-२२ मध्ये समाविष्ट कामे संबंधित यंत्रणांना सुरू करण्यासाठी निर्देश द्यावे, अशा लेखी सूचना विभागीय आयुक्तांनी १६ ऑगस्ट रोजी संबंधित विभागाच्या यंत्रणा प्रमुखांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिल्या आहेत.

रोजगार हमी योजनेंतंर्गत २६० अनुज्ञेय कामांची यादी ठेवण्यात आली आहे. या कामांच्या कार्यान्वयन यंत्रणा ठरवून देण्यात आल्या आहेत. शासननिर्णयानुसार अभिसरण आणि संयोजनातून मनरेगाची १०० टक्के कामे घेता येत असल्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागातील प्रौढ मजुरांना मजुरी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागामध्ये दीर्घकालीन टिकाऊ मालमत्ता निर्माण करणे, पंचायत व्यवस्था बळकटीकरणाशिवाय मनेगातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून शेतकऱ्यांना लखपती करणे, मजूर व गावे समृद्ध करणे ही योजनेची उदिष्ट डोळ्यांसमोर ठेण्यात आले आहेत. हे स्पप्न साकार करण्यासाठी सर्व यंत्रणेने मनरेगा अंतर्गत कामे घेण्याचे निर्देश आहेत. परंतु, यात ग्रामपंचायतीचा अपवाद सोडला, तर अन्य यंत्रणांचा कामे घेण्यासाठीचा सहभाग नामधारी आहे. यामुळे वार्षिक कृती आराखडा व पुरवणी कृती आराखडा सन २०२१-२२ मध्ये समाविष्ट कामे संबंधित यंत्रणांना सुरूच केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, रेशीम विकास, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जलसंधारण, जलसंपदा, लघुसिंचन, सार्वजनिक बांधकाम, मत्स्य विकास, रेल्वे आदी विभागांना रोहयोची कामे सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना दिले आहेत.

बॉक्स

विभाग सुरू असलेली कामे

ग्रामपंचायत ४३३९, सामाजिक वनीकरण १७४, कृषी विभाग १२२, रेशीम विकास २९, जिल्हा परिषद, पंचायत समिती २५, जलसंधारण १५, जलसंपदा ४, लघुसिंचन १, तर सार्वजनिक बांधकाम, मत्स्य विकास, रेल्वे या विभागात एकही काम सुरू केलेले नाहीत.

कोट

रोहयोच्या कामात कार्यान्वयन यंत्रणेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. कामे जास्तीत जास्त वाढविण्यावर भर राहणार आहे.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद