शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड, तक्रारींचा अभाव

By admin | Updated: October 1, 2015 00:30 IST

बदलत्या काळात माणसाची मनोवृत्तीही बदलत आहे. जन्मदात्यांना अडगळ समजून त्यांना घराबाहेर काढणारे दिवटे कुलदीपक समाजात पहायला मिळतात.

तीन महिने शिक्षेचं प्रावधान : ज्येष्ठ नागरिक चरितार्थ नियम २०१०लोकमत दिन विशेषअमरावती : बदलत्या काळात माणसाची मनोवृत्तीही बदलत आहे. जन्मदात्यांना अडगळ समजून त्यांना घराबाहेर काढणारे दिवटे कुलदीपक समाजात पहायला मिळतात. अशांना वठणीवर आणण्यासाठी शासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिवाणी न्यायाधीशांचा दर्जा देऊन न्यायाधिकरण केले. मात्र मातापित्यांची आबाळ करणाऱ्या मुुलांच्या विरोधात तक्रार करण्यास पालक पुढे येत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात चार वर्षांत केवळ तीन प्रकरण दाखल झाले आहे. या प्रकरणात न्यायाधिकारणाने दिवट्याला घराबाहेर काढण्याचे आदेश देऊन घर आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे. आयुष्यांच्या शेवटच्या काळात आधाराची खरी गरज असताना मुलांना आई-वडिलांची अडचण वाटते. मग त्यांच्यावर अन्याय केला जातो. उघडपणे मातापित्यांना वाऱ्यावर सोडणारी मुलेही कमी नाहीत. मरणयातना सोसण्यापेक्षा मरण पत्करावे, अशी भावना पालकांची होते. अशा मुलांना वठणीवर आणण्यासाठी शासनाने वर्ष २०१० पासून विशेष कायद्याची तरतूद करुन नागरिकांना दिलासा दिला आहे. न्यायिक हक्काची मागणी करुन अन्यायग्रस्त मातापिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करु शकतात. न्यायाधिकरण अशा मुलांना तीन महिन्यांची शिक्षा ठोठाऊ शकतात. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ‘कलम १९९५ अन्वये आणि प्रकरण ६ खाली दिवाणी न्यायालयाचे अधिकार कायद्याने व शासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. कायदा झाल्यानंतर ४ वर्षांत अमरावती उपविभागात केवळ तीन तक्रारी दाखल झाल्या. यापैकी एका प्रकरणात मारझोड, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दाखल करण्यात आली आहे. प्रकरणात आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाविरोधात आईने तक्रार दाखल केली असता न्यायाधिकरणाने ते घर वृद्ध दाम्पत्यांच्या ताब्यात देऊन त्या मुलाला घराबाहेर काढण्याचा निवाडा दिला आहे. (प्रतिनिधी)वारसांना होऊ शकतो तुरुंगवासआई वडिलांचा सांभाळ न केल्यास वारसाला किंवा मुलाला तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा ८ हजार रुपये दंड होऊ शकतो. हा गुन्हा दखलपात्र आहे. न्यायाधिकरणासमोर बाजू मांडण्यासाठी वकील नेमण्याची तरतूद या कायद्यात नाही. मात्र ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने समाजकल्याण अधिकारी किंवा ज्येष्ठ नागरिक संघाचा प्रतिनिधी बाजू मांडू शकतो. असे असावे तक्रारीचे स्वरुपमुलांनी सांभाळ न केल्यास आई-वडील त्याविरोधात तक्रार करु शकतात. अपत्य नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा सांभाळ करणाऱ्या नातलगांकडून त्रास होत असल्यास त्यांच्याविरोधात तक्रार करता येते. त्यांच्या मृत्यूनंतर जर त्या नातलगांना संपत्ती मिळणार असेल तर अशा बेजबाबदार नातलगांवर कारवाई होऊ शकते. प्रसंगी हे न्यायाधिकरण स्वत:च्या अधिकाराचा वापर करुन तक्रारीशिवायही कारवाई करु शकतात. उदरनिर्वाहासाठी मागता येते रक्कमज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहाला पुरेल एवढी रक्कम पाल्याकडून मागण्याचा अधिकार आहे. मासिक निर्वाह भत्ता, वैद्यकीय सेवा, औषधी तसेच अन्य गरजा भागविण्यासाठी १० हजार रुपयांपर्यंत मागणी करु शकतात. आदेशानंतर एक महिन्यात संबंधिताला ती रक्कम द्यावी लागते. वेळेवर रकमेचा भरणा न केल्यास ५ ते १८ टक्क्यापर्यंत यावर व्याज आकारणी होते. क्षमतेनुसार निर्वाह खर्चज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्यात ज्येष्ठ नागरिकांच्या पाल्याकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायाधिकरणात संबंधित आई-वडील व मुलांची सुनावणी घेण्यात येते. यावेळी विशेष समाजकल्याण अधिकाऱ्यांची भूमिका केवळ निर्वाह अधिकारी म्हणून राहील. या कायद्याच्या निर्मितीपासून समाजकल्याण विभागाकडे एकही तक्रार दाखल नाही. या कायद्याविषयी समाजात जनजागृती करण्याची गरज आहे. वृद्ध मातापित्यांना कायद्याचा आधार आहे, याची माहिती त्या दाम्पत्यांपर्यंत पोहचणे महत्त्वाचे आहे. कधी अपत्यावर असलेल्या प्रेमापोटी अन्याय असला तरी तक्रारी होत नाही. - दत्तात्रय फिस्के,सहायक आयुक्त, समाजकल्याण.