शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

विद्यापीठात सेमिस्टर पॅटर्न परीक्षा १२ आॅक्टोबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:25 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यावर्षी सेमिस्टर पॅटर्ननुसार हिवाळी परीक्षा १२ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्देप्राचार्यांना नियोजनासंदर्भात पत्र: सर्व विद्याशाखांसाठी नवीन पॅटर्न लागू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यावर्षी सेमिस्टर पॅटर्ननुसार हिवाळी परीक्षा १२ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. पहिल्यांदाच सर्व विद्याशाखांसाठी नवा पॅटर्न लागू झाला असून सुमारे ९० अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याची तयारी करण्यात आली आहे.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी २८ सप्टेंबर २०१७ रोजी केलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१७-१८ याकरिता सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे. त्याअनुषंगाने परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून प्राचार्यांना सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचे नियोजन करण्याबाबत पत्र पाठविले आहे. हिवाळी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून प्राप्त होतील. मात्र एकंदरीत परीक्षा घेण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता महाविद्यालयांना करावी लागणार आहे. ३० जून २०१७ रोजी विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने अनुक्रमांक १३९ अन्वये सेमिस्टर पॅटर्न परीक्षेची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविली आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने हिवाळी परीक्षेची तयारी चालविली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा विद्यापीठस्तरावर घेण्याबाबत एकमत झाले आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने तयार केले असून प्राचार्य केंद्राधिकारी राहतील. महाविद्यालयात होणाºया परीक्षांचे पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कस्टडीत मोहरबंद करून ठेवले जातील. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राध्यापकांकडून तसेच तासिका तत्त्वावरील मान्यताप्राप्त प्राध्यापकांकडून करून घेण्याची जबाबदारी प्राचार्यावर सोपविली आहे. परीक्षा संपल्यानंतर विहित नमुन्यात निकाल तयार करून १५ दिवसांच्या आत निकालपत्राची संगणकीय प्रत महाविद्यालयांना विद्यापीठास पाठवावी लागेल. विद्यापीठाने विहित केलेली पुनर्मूल्यांकन पद्धती ही महाविद्यालयस्तरावर राबविली जाणार आहे. त्याकरिता विद्यापीठाने निश्चित केलेल्या शुल्काचा महाविद्यालयात भरणा करून विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, पदवी ही महाविद्यालयीन स्तरावर दिली जाणार आहे. परीक्षादरम्यान महाविद्यालय परीक्षा केंद्रावर कुलगुरु, प्र-कुलगुरु, परीक्षा मंडळाचे सदस्य, संचालक आस्कमिक भेटी देतील.परीक्षांदरम्यान महाविद्यालयांवर ही असेल जबाबदारीविद्यार्थ्यांच्या नामांकनाची यादी विद्यापीठाकडे पाठवावी लागेल. परीक्षा संचालनाकरिता प्राचार्यांनी केंद्राधिकारी, सहकेंद्राधिधारी, पर्यवेक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करून निकाल जाहीर करणे, गुणपत्रिका वितरित करणे आणि निकालाची प्रत, सारणी तक्ते विद्यापीठास सादर करावे लागेल. उत्तरपत्रिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत त्या जपून ठेवाव्या लागतील.सर्व विद्याशाखांचे पहिल्यांदाच सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा महाविद्यालयस्तरावर होणार असून प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून पुरविल्या जातील. एरव्ही इत्थंभूत परीक्षेसंदर्भाची तयारी परीक्षा केंद्र असलेल्या प्राचार्यांना करावी लागेल.- जयंत वडते,संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग