शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात सेमिस्टर पॅटर्न परीक्षा १२ आॅक्टोबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:25 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यावर्षी सेमिस्टर पॅटर्ननुसार हिवाळी परीक्षा १२ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्देप्राचार्यांना नियोजनासंदर्भात पत्र: सर्व विद्याशाखांसाठी नवीन पॅटर्न लागू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यावर्षी सेमिस्टर पॅटर्ननुसार हिवाळी परीक्षा १२ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. पहिल्यांदाच सर्व विद्याशाखांसाठी नवा पॅटर्न लागू झाला असून सुमारे ९० अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याची तयारी करण्यात आली आहे.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी २८ सप्टेंबर २०१७ रोजी केलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१७-१८ याकरिता सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे. त्याअनुषंगाने परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून प्राचार्यांना सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचे नियोजन करण्याबाबत पत्र पाठविले आहे. हिवाळी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून प्राप्त होतील. मात्र एकंदरीत परीक्षा घेण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता महाविद्यालयांना करावी लागणार आहे. ३० जून २०१७ रोजी विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने अनुक्रमांक १३९ अन्वये सेमिस्टर पॅटर्न परीक्षेची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविली आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने हिवाळी परीक्षेची तयारी चालविली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा विद्यापीठस्तरावर घेण्याबाबत एकमत झाले आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने तयार केले असून प्राचार्य केंद्राधिकारी राहतील. महाविद्यालयात होणाºया परीक्षांचे पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कस्टडीत मोहरबंद करून ठेवले जातील. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राध्यापकांकडून तसेच तासिका तत्त्वावरील मान्यताप्राप्त प्राध्यापकांकडून करून घेण्याची जबाबदारी प्राचार्यावर सोपविली आहे. परीक्षा संपल्यानंतर विहित नमुन्यात निकाल तयार करून १५ दिवसांच्या आत निकालपत्राची संगणकीय प्रत महाविद्यालयांना विद्यापीठास पाठवावी लागेल. विद्यापीठाने विहित केलेली पुनर्मूल्यांकन पद्धती ही महाविद्यालयस्तरावर राबविली जाणार आहे. त्याकरिता विद्यापीठाने निश्चित केलेल्या शुल्काचा महाविद्यालयात भरणा करून विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, पदवी ही महाविद्यालयीन स्तरावर दिली जाणार आहे. परीक्षादरम्यान महाविद्यालय परीक्षा केंद्रावर कुलगुरु, प्र-कुलगुरु, परीक्षा मंडळाचे सदस्य, संचालक आस्कमिक भेटी देतील.परीक्षांदरम्यान महाविद्यालयांवर ही असेल जबाबदारीविद्यार्थ्यांच्या नामांकनाची यादी विद्यापीठाकडे पाठवावी लागेल. परीक्षा संचालनाकरिता प्राचार्यांनी केंद्राधिकारी, सहकेंद्राधिधारी, पर्यवेक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करून निकाल जाहीर करणे, गुणपत्रिका वितरित करणे आणि निकालाची प्रत, सारणी तक्ते विद्यापीठास सादर करावे लागेल. उत्तरपत्रिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत त्या जपून ठेवाव्या लागतील.सर्व विद्याशाखांचे पहिल्यांदाच सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा महाविद्यालयस्तरावर होणार असून प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून पुरविल्या जातील. एरव्ही इत्थंभूत परीक्षेसंदर्भाची तयारी परीक्षा केंद्र असलेल्या प्राचार्यांना करावी लागेल.- जयंत वडते,संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग