शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

वरूडमध्ये कमी दर्जाच्या खाद्य पदार्थांची विक्री

By admin | Updated: July 5, 2016 00:31 IST

सणासुदीच्या दिवसांत भेसळीला अधिक उधाण येत असल्याचे चित्र असून तालुक्यात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे.

एफडीएचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यातसंजय खासबागे  वरुडसणासुदीच्या दिवसांत भेसळीला अधिक उधाण येत असल्याचे चित्र असून तालुक्यात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना भेसळयुक्त पदार्थ खाण्याची वेळ आली आहे. तालुक्यात ठोक व्यापाऱ्यांपासून तर किरकोळ विक्रेत्यापर्यंत भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकले जातात. यामुळे अंगावर पूरळ येणे यासह त्वचेचे आजार वाढत आहेत. सणासुदीच्या दिवसांत तेलामध्ये पामोलीन तेलाची भेसळ होत असल्याने थंडी पडताच तेल गोठायला सुरुवात होते. हा प्रकार अलीकडे उघडकीस येत आहे. इतकेच नव्हे तर तांदूळ, साखर, डाळ, रवा, बेसन, पीठ, तसेच गव्हामध्येसुध्दा सर्रास भेसळ केली जात आहे. रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागला आहे. अन्न, औषधी प्रशासन विभागाने एखाद्या दुकानावर धाड टाकलीच तर नमुने बदलून तपासणीसाठी पाठविले जातात. त्यामुळे दुकानदारावर कारवाई होत नाही. तालुक्यात तेलमाफीयांना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा अभय असल्याने ‘कुणीही आमचे काहीच वाकडे करू शकत नाही’, अशी त्यांची धारणा झाली आहे. अन्नात भेसळ करणाऱ्यांवर होणार का कारवाई ?जीवनावश्यक वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करुन ग्राहकांची लूट होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहणारे अधिकारी याकडे लक्ष देतील की वेळ मारून नेतील, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ गरिबांच्या माथी मारून अनेकांना आजाराने जडले आहे. वारंवार याबाबत चर्चा होत असून प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र आहे. खाद्यपदार्थांमध्ये, धान्यामध्ये, तेलामध्ये भेसळीबाबतच्या तक्रारी आल्यास कारवाई केली जाते. या पदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविल्या जातात. इतकेच नव्हे तर प्रकरण न्यायालयासमक्ष ठेवले जाते. परंतु अद्याप तालुक्यातून अशी तक्रार आलेली नाही.- नीलेश ताथोड,अन्न,पुरवठा अधिकारी, अमरावती