शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या बोगस बियाण्यांची अधिक दराने बाजारात विक्री ?

By admin | Updated: June 21, 2014 23:47 IST

मृग नक्षत्राच पहिला पाऊस बरसताच बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव सुरु केली आहे. परंतु कपाशीच्या नवनवीन जातींनी बाजारात शिरकाव केल्याने शेतकरी गोंधळात पडला आहे.

वरुड : मृग नक्षत्राच पहिला पाऊस बरसताच बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव सुरु केली आहे. परंतु कपाशीच्या नवनवीन जातींनी बाजारात शिरकाव केल्याने शेतकरी गोंधळात पडला आहे. यातच तालुक्यात कपाशीच्या बोगस बियाण्यांची विक्री करण्यात येत असल्याने अशा बियाण्यांपासून सावध राहण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.बियाण्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. तणनाशकाची फवारणी करता येणाऱ्या कपाशीचे विशिष्ट तसेच नकली बियाण्यांची मागणी होत आहे. बाहेरच्या जिल्ह्यातूून बियाणे विक्रीसाठी दलालसुद्धा सक्रिय झाल्याने स्थानिक कृषी विक्रेते ठप्प बसले असल्याचे दिसून येत आहे. ९०० रुपये ते एक हजार रुपयांपर्यंत बियाणे बॅग विक्री सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांनी अप्रमाणित कपाशी बियाण्यांची लागवड केल्यास ते जमिनीतून बाहेर येतील की नाही याची खात्री नसल्याने याचा फटका कापूस उत्पादकांना बसण्याची शक्यता अधिक आहे. उन्हाळयात शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण केली केली असून पेरणीसाठी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पेरणीपूर्व बियाणे आणि खतांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी व्यस्त आहे. जमिनीची मशागत पूर्ण होऊन पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आर्थिक अडचण आणि बँकांकडून अद्यापही पीककर्ज मिळाले नसल्याने अल्पभूधारक शेतकरी पेरणीकरिता बी-बियाणे खरेदीकरिता पैशाच्या तडजोडीत लागला आहे. परंतु तणनाशकाच्या फवारणीच्या दृष्टीने कपाशीचे उत्पादन अधिक व्हावे म्हणून विशिष्ट जातीच्या कपाशीची बियाण्यांची मागणी वाढली. विशिष्ट बियाण्यांची विक्री करण्यात दलाल सक्रिय झाले आहेत. ९०० रुपये ते एक हजार रूपयापर्यंत विक्री सुरु असल्याची खमंग चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. सदर बियाणे नरखेड, जलालखेडा, मध्यप्रेदशातील पांढुर्णा येथून आणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विकले जात असल्याचे सांगण्यात येते. परंतु विशिष्ट जातीच्या बियाण्यांची मागणी वाढली असली तरी सदर बियाणे प्रमाणित नसल्याने आणि प्रतवारी नसल्याने महागाईने त्रस्त झालेला शेतकरी आता मशागतीसाठी सुध्दा खर्च करु शकत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या नशिबी अठराविश्वे दारिद्र्य येण्याची शक्यता आहे. नकली बियाण्यांमुळे कपाशी उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक दुकानात प्रमाणित बियाणे असून शेतकऱ्यांची गर्दी नसल्याने कृषी दुकानदार ठप्प बसले आहे. नकली व अप्रमाणित बियाण्यांच्या विक्रीबाबत पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून अशा विक्रेत्याचा शोध सुरु असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)