शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कपाशीच्या बोगस बियाण्यांची अधिक दराने बाजारात विक्री ?

By admin | Updated: June 21, 2014 23:47 IST

मृग नक्षत्राच पहिला पाऊस बरसताच बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव सुरु केली आहे. परंतु कपाशीच्या नवनवीन जातींनी बाजारात शिरकाव केल्याने शेतकरी गोंधळात पडला आहे.

वरुड : मृग नक्षत्राच पहिला पाऊस बरसताच बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव सुरु केली आहे. परंतु कपाशीच्या नवनवीन जातींनी बाजारात शिरकाव केल्याने शेतकरी गोंधळात पडला आहे. यातच तालुक्यात कपाशीच्या बोगस बियाण्यांची विक्री करण्यात येत असल्याने अशा बियाण्यांपासून सावध राहण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.बियाण्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. तणनाशकाची फवारणी करता येणाऱ्या कपाशीचे विशिष्ट तसेच नकली बियाण्यांची मागणी होत आहे. बाहेरच्या जिल्ह्यातूून बियाणे विक्रीसाठी दलालसुद्धा सक्रिय झाल्याने स्थानिक कृषी विक्रेते ठप्प बसले असल्याचे दिसून येत आहे. ९०० रुपये ते एक हजार रुपयांपर्यंत बियाणे बॅग विक्री सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांनी अप्रमाणित कपाशी बियाण्यांची लागवड केल्यास ते जमिनीतून बाहेर येतील की नाही याची खात्री नसल्याने याचा फटका कापूस उत्पादकांना बसण्याची शक्यता अधिक आहे. उन्हाळयात शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण केली केली असून पेरणीसाठी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पेरणीपूर्व बियाणे आणि खतांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी व्यस्त आहे. जमिनीची मशागत पूर्ण होऊन पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आर्थिक अडचण आणि बँकांकडून अद्यापही पीककर्ज मिळाले नसल्याने अल्पभूधारक शेतकरी पेरणीकरिता बी-बियाणे खरेदीकरिता पैशाच्या तडजोडीत लागला आहे. परंतु तणनाशकाच्या फवारणीच्या दृष्टीने कपाशीचे उत्पादन अधिक व्हावे म्हणून विशिष्ट जातीच्या कपाशीची बियाण्यांची मागणी वाढली. विशिष्ट बियाण्यांची विक्री करण्यात दलाल सक्रिय झाले आहेत. ९०० रुपये ते एक हजार रूपयापर्यंत विक्री सुरु असल्याची खमंग चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. सदर बियाणे नरखेड, जलालखेडा, मध्यप्रेदशातील पांढुर्णा येथून आणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विकले जात असल्याचे सांगण्यात येते. परंतु विशिष्ट जातीच्या बियाण्यांची मागणी वाढली असली तरी सदर बियाणे प्रमाणित नसल्याने आणि प्रतवारी नसल्याने महागाईने त्रस्त झालेला शेतकरी आता मशागतीसाठी सुध्दा खर्च करु शकत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या नशिबी अठराविश्वे दारिद्र्य येण्याची शक्यता आहे. नकली बियाण्यांमुळे कपाशी उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक दुकानात प्रमाणित बियाणे असून शेतकऱ्यांची गर्दी नसल्याने कृषी दुकानदार ठप्प बसले आहे. नकली व अप्रमाणित बियाण्यांच्या विक्रीबाबत पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून अशा विक्रेत्याचा शोध सुरु असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)