शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

जिल्ह्यात दीड हजारांवर शेतकऱ्यांचे स्वावलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ११ कोटींवर निधी खर्च अमरावती : जिल्ह्यात सन २०१७-१८ पासून राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब ...

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ११ कोटींवर निधी खर्च

अमरावती : जिल्ह्यात सन २०१७-१८ पासून राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषिक्रांती याेजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ७४८ शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ११ कोटी १५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. या योजनेमुळे मागासवर्गीय शेतकरी सिंचनाबाबत स्वावलंबी झाले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या योजना राबविण्यात येतात. यामध्ये नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपयाचे मर्यादेत अनुदान दिले जाते तसेच विहीर पूर्ण केल्यानंतर लाभार्थीला विद्युत जोडणी, विद्युत पंप, सौर कृषी पंप, सूक्ष्म सिंचन आदीकरिता पॅकेज स्वरूपात अनुदान दिले जाते. यासाठी ऑनलाईन प्रणालीने शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांच्या जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शेतीचे क्षेत्र आदी बाबींची तपासणी करून या योजनेतून लाभार्थींची निवड करण्यात येते. योजनांची परिणामकारक अंमलबजावणी केली जात असल्याने शेतकऱ्यांंचे बागायती शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे.

बॉक्स

तालुका पूर्ण झालेल्या विहिरी

अमरावती १५९, भातकुली १०५,नांदगाव खंडेश्वर १८३, चांदूर रेल्वे १४५, धामणगाव रेल्वे १५५, तिवसा १५२, मोर्शी ३३, चांदूर बाजार ४५, अचलपूर १७, अंजनगाव सुर्जी २२, दर्यापूर १६८, धारणी ४९, चिखलदरा तालुक्यात ५१ याप्रमाणे अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांच्या शेतात १२८४ विहिरींची कामे पूर्ण केली आहेत. अनुसूचित जमाती लाभार्थींच्या ४६४ विहिरी पूर्ण झाल्या आहेत.