शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जिल्ह्यात दीड हजारांवर शेतकऱ्यांचे स्वावलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ११ कोटींवर निधी खर्च अमरावती : जिल्ह्यात सन २०१७-१८ पासून राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब ...

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ११ कोटींवर निधी खर्च

अमरावती : जिल्ह्यात सन २०१७-१८ पासून राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषिक्रांती याेजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ७४८ शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ११ कोटी १५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. या योजनेमुळे मागासवर्गीय शेतकरी सिंचनाबाबत स्वावलंबी झाले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या योजना राबविण्यात येतात. यामध्ये नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपयाचे मर्यादेत अनुदान दिले जाते तसेच विहीर पूर्ण केल्यानंतर लाभार्थीला विद्युत जोडणी, विद्युत पंप, सौर कृषी पंप, सूक्ष्म सिंचन आदीकरिता पॅकेज स्वरूपात अनुदान दिले जाते. यासाठी ऑनलाईन प्रणालीने शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांच्या जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शेतीचे क्षेत्र आदी बाबींची तपासणी करून या योजनेतून लाभार्थींची निवड करण्यात येते. योजनांची परिणामकारक अंमलबजावणी केली जात असल्याने शेतकऱ्यांंचे बागायती शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे.

बॉक्स

तालुका पूर्ण झालेल्या विहिरी

अमरावती १५९, भातकुली १०५,नांदगाव खंडेश्वर १८३, चांदूर रेल्वे १४५, धामणगाव रेल्वे १५५, तिवसा १५२, मोर्शी ३३, चांदूर बाजार ४५, अचलपूर १७, अंजनगाव सुर्जी २२, दर्यापूर १६८, धारणी ४९, चिखलदरा तालुक्यात ५१ याप्रमाणे अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांच्या शेतात १२८४ विहिरींची कामे पूर्ण केली आहेत. अनुसूचित जमाती लाभार्थींच्या ४६४ विहिरी पूर्ण झाल्या आहेत.