शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

जयश्रीला पाहून आ.ठाकूर गहिवरल्या

By admin | Updated: July 24, 2016 23:58 IST

तब्बल वर्षभर अंधार कोठडीत काढून मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या जयश्री दुधे हिची विदारक अवस्था पाहून आ.यशोमती ठाकूर अक्षरश: गहिरवरल्या.

भक्कम पाठबळ : महिला कायद्यातील बदलासाठी प्रयत्नशीलअमरावती : तब्बल वर्षभर अंधार कोठडीत काढून मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या जयश्री दुधे हिची विदारक अवस्था पाहून आ.यशोमती ठाकूर अक्षरश: गहिरवरल्या. जयश्री दुधे हिची आ.ठाकूर यांनी रविवारी सायंकाळी इर्विन गाठून भेट घेतली. तिला सर्वतोपरीने मदतीचे आश्वासन दिल्यानंतर जयश्रीसह तिच्या कुटुंबियांना भक्कम पाठबळ दिले. जयश्रीवरील अत्याचाराची करुण कहाणी ऐकल्यानंतर महिलाविषयक कायद्यात बदल करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आ. ठाकूर म्हणाल्या. माहुर येथील सासरच्या मंडळीने जयश्रीला वर्षभर अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवून तिचा अनन्वित छळ केला.वकील म्हणून उभी राहीनअमरावती : या वृत्ताला 'लोकमत'ने ठळक प्रसिद्धी दिली. वृत्ताची दखल घेत अनेकांनी इर्विन गाठले. जयश्रीवरील अन्यायाला वाचा फुटल्यानंतर आ. यशोमती ठाकूर यांनी संवेदनशील दखल घेत रविवारी इर्विन गाठून जयश्रीची भेट घेतली. यावेळी आ.ठाकूर यांना पाहून जयश्रीच्या डोळे पाणावले. जयश्रीने तिच्या वेदना आ.ठाकूर यांच्यासमोर मांडल्यानंतर त्या गहिवरून आल्यात. जयश्रीची आपबिती ऐकल्यानंतर अत्याचाराची सीमा गाठणाऱ्या सासरच्या मंडळीविरुध्द कठोर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. दररोज आमच्यातील एक जण तुला भेटायला येईल, अशी ग्वाही आ.ठाकूर यांनी जयश्रीला दिली. मी तुझ्या पाठीशी आहे, असा धीर दिला. आ.ठाकूर यांनी जयश्रीच्या डोक्यावरून हात फिरून तिला प्रेमाचा दिलासा दिला. तुला लवकरच चालत बाहेर यायचे आहे, अशीच हासत रहा, तुझ्या मुलांची भेट घालून देण्याची जबाबदारी माझी, असा विश्वास आ.ठाकूर यांनी जयश्रीला दिला. त्यानंतर जयश्रीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. यावेळी जि.प. सदस्य चित्रा डहाणे, पंचायत समिती सदस्य मंगेश भगोले, कविता पचलोरे, धिरज श्रीवास, वैभव वानखडे, अनिकेत देशमुख, प्रल्हाद चव्हाण, अल्केश काळबांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सर्वपरीने मदतीचे आश्वासनजयश्रीच्या वेदना व तिचे हाल पाहून आ.ठाकूर यांचे दु:ख अनावर झाले. महिलांचा आजही इतका भयानक छळ केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जयश्रीला सर्वपरीने मदत करू, कायद्याची लढाई लढू, आवश्यक पडल्यास जयश्रीच्या पाठीशी वकील म्हणूनसुध्दा उभे राहू, अशी ग्वाही आ.यशोमती ठाकूर यांनी जयश्रीला सांत्वन भेटीदरम्यान दिली. औचित्याचा मुद्दा मांडणार जयश्रीची भेट घेतल्यानंतर आ.ठाकुर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महिलाविषयक कठोर कायदा असतानाही महिलांवर अन्याय केल्या जात असल्याची खंत आ.ठाकूर यांनी व्यक्त केली. जयश्रीच्या निमित्याने पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून २००४ व २००५ च्या कायद्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.