शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

बांधावर पोहोचणार बियाणे, खत

By admin | Updated: June 19, 2015 00:44 IST

दुष्काळी परिस्थिती व वाढत्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेता शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांच्या अध्यक्षतेखाली .....

अमरावती : दुष्काळी परिस्थिती व वाढत्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेता शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना येथे कृषी क्रांती शेतकरी समूहाचा पहिला उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची सुरूवात गुरूवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे अधिकाअधिक पर्याय कृषिसेवा सुविधा उपक्रमातून देण्यासोबत अधिकाधिक उत्पादन मिळण्याच्या दुष्टीने राजना, कवाळा जटेश्र्वर व परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खरीप हंगापासून शेतकऱ्यांना थेट बांधावर व स्वस्तात बी-बियाणे पुरविण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. ही बाब अतिशय चांगली असून यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे, रासायनिक खते यामध्ये होणारी फसवणूक गैरप्रकार नक्कीच थांबणार आहे, असे प्रतिप्रादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे सीईओ अनिल भंडारी होते. कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, सहयोगी संशोधन संचालक सी.यू.पाटील, प्रवीण देशमुख, कृषी अधिकारी साबळे, नाबार्डचे वाघमारे, जि.प.सदस्य रवींद्र मुंदे, सरपंच लता पाटेकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गित्ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना पाऊस पडला म्हणजे त्यांचे सर्व प्रश्न संपले असे होत नाही. त्यांना प्रामुख्याने प्रश्न पडतो की आता पिकासाठी कोणते बियाणे घेतले पाहिजेत, कोणत्या किमतीत मिळेल, शेतीला बियाणे पूरक ठरतील का, अशा सर्व प्रश्नांसाठी कृषी सुविधा केंद्रातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात येत आहे. पाऊस कमी किंवा अधिक झाला तर कोणते पीक घेता येते या सर्व बाबींविषयी माहिती शेतकरी कृषी सुविधा केंद्रातून मिळू शकते. या तालुक्यात कोणतेही मोठे सिंचन प्रकल्प नाही. पुढील वर्षी या तालुक्यातील गावांनी अर्ज सादर करुन या अभियानात गावांचा समावेश करण्यात येईल. गावातील नाले अडवून त्यांचे खोलीकरण केले व सिमेंट बंधारे बांधले तर गावातील शेतकऱ््यांना आपल्या शेतीसाठी पाणी मिळेल तसेच त्यांना पाण्याची टंचाई भासणार नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा नवीन थेट बियाने , खते पुरविण्याचा उपक्रम सुरू केल्याने या भागातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. कृषी क्रांती शेतकरी समूहाचे अध्यक्ष रविद्र मुंदे यांनी प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी कृषि क्रांती शेतकरी समुहाचे पदाधिकारी रविंद्र मुंदे,बंडूपंत रोहनकर, दिलीप बोरकर, रामकृष्ण वाघमारे, संतोष देवतळे, प्रवीण बागडे, रामभाऊ हेरोळे संतोष लवंगे, रामसिंग धुर्वे, रामदास पवार, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे पाणलोट समितीचे रूपांतर कृषि क्रांती शेतकरी समुहात करून शेतकऱ्यांना दिलासा देणारा जिल्ह्यात पहिला उपक्रम नांदगाव तालुक्यात सुरू झाला आहे.