शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर पोहोचणार बियाणे, खत

By admin | Updated: June 19, 2015 00:44 IST

दुष्काळी परिस्थिती व वाढत्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेता शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांच्या अध्यक्षतेखाली .....

अमरावती : दुष्काळी परिस्थिती व वाढत्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेता शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना येथे कृषी क्रांती शेतकरी समूहाचा पहिला उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची सुरूवात गुरूवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे अधिकाअधिक पर्याय कृषिसेवा सुविधा उपक्रमातून देण्यासोबत अधिकाधिक उत्पादन मिळण्याच्या दुष्टीने राजना, कवाळा जटेश्र्वर व परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खरीप हंगापासून शेतकऱ्यांना थेट बांधावर व स्वस्तात बी-बियाणे पुरविण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. ही बाब अतिशय चांगली असून यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे, रासायनिक खते यामध्ये होणारी फसवणूक गैरप्रकार नक्कीच थांबणार आहे, असे प्रतिप्रादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे सीईओ अनिल भंडारी होते. कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, सहयोगी संशोधन संचालक सी.यू.पाटील, प्रवीण देशमुख, कृषी अधिकारी साबळे, नाबार्डचे वाघमारे, जि.प.सदस्य रवींद्र मुंदे, सरपंच लता पाटेकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गित्ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना पाऊस पडला म्हणजे त्यांचे सर्व प्रश्न संपले असे होत नाही. त्यांना प्रामुख्याने प्रश्न पडतो की आता पिकासाठी कोणते बियाणे घेतले पाहिजेत, कोणत्या किमतीत मिळेल, शेतीला बियाणे पूरक ठरतील का, अशा सर्व प्रश्नांसाठी कृषी सुविधा केंद्रातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात येत आहे. पाऊस कमी किंवा अधिक झाला तर कोणते पीक घेता येते या सर्व बाबींविषयी माहिती शेतकरी कृषी सुविधा केंद्रातून मिळू शकते. या तालुक्यात कोणतेही मोठे सिंचन प्रकल्प नाही. पुढील वर्षी या तालुक्यातील गावांनी अर्ज सादर करुन या अभियानात गावांचा समावेश करण्यात येईल. गावातील नाले अडवून त्यांचे खोलीकरण केले व सिमेंट बंधारे बांधले तर गावातील शेतकऱ््यांना आपल्या शेतीसाठी पाणी मिळेल तसेच त्यांना पाण्याची टंचाई भासणार नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा नवीन थेट बियाने , खते पुरविण्याचा उपक्रम सुरू केल्याने या भागातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. कृषी क्रांती शेतकरी समूहाचे अध्यक्ष रविद्र मुंदे यांनी प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी कृषि क्रांती शेतकरी समुहाचे पदाधिकारी रविंद्र मुंदे,बंडूपंत रोहनकर, दिलीप बोरकर, रामकृष्ण वाघमारे, संतोष देवतळे, प्रवीण बागडे, रामभाऊ हेरोळे संतोष लवंगे, रामसिंग धुर्वे, रामदास पवार, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे पाणलोट समितीचे रूपांतर कृषि क्रांती शेतकरी समुहात करून शेतकऱ्यांना दिलासा देणारा जिल्ह्यात पहिला उपक्रम नांदगाव तालुक्यात सुरू झाला आहे.