शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

नालवाड्याच्या पुनर्वसनाला सचिवाचा अडथळा

By admin | Updated: September 28, 2016 00:22 IST

दर्यापूर तालुक्यातील नालवाडा येथे २००७ मध्ये महापूर आला होता.

शासनाला निवेदन : शेकडो नागरिकांची जिल्हाकचेरीवर धडक अमरावती : दर्यापूर तालुक्यातील नालवाडा येथे २००७ मध्ये महापूर आला होता. या गावाचे १०० टक्के पुनर्वसन शासनामार्फत करण्यात आले. मात्र ग्रामपंचायतीचे सचिव खोटा ठराव देऊन मंजूर कामे करण्यात अडथळा आणत असण्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आले. येथील सर्व शासकीय इमारती पुनर्वसनमध्ये याव्यात, यासाठी लेआऊटसुद्धा टाकण्यात आले आहे. परंतु या कामाला सचिव प्रतिसाद देत नसल्याने सर्व धनादेश परत जाण्याच्या तयारीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. गावात मंजूर झालेले घरकूल हे पुनर्वसनात देण्यात यावे. गावठाण हे निळ्या पट्ट्यात आहे. तसेच गावात प्राधिकरणाद्वारा पिण्याच्या पाण्याची सोय करावी, रस्ते, नाल्या व रपट्यांची कामे करावी, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी नरेंद्र खांडेकर, विनोद येवले, अण्णा खांडेकर, राजू ढगेकर, विश्वास ढगेकर, अर्चना ढगेकर, निर्मला ढगेकर, नामदेवराव गारपवार, पुनम नारोळकर, विश्वास डायलकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)