शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दानदात्यांनी राखले ‘डिस्टन्सिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:13 IST

सुमित हरकूट चांदूर बाजार : मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गाव-खेडेपर्यंत सर्वांनी मदतीचे हात पुढे केले होते; परंतु दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य ...

सुमित हरकूट

चांदूर बाजार : मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गाव-खेडेपर्यंत सर्वांनी मदतीचे हात पुढे केले होते; परंतु दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिक भरडून जात असताना यंदा कुणीच कुणाला मदत करताना दिसत नाही. यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मदत करणारे गायब झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये बहुतांश राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व समाजातील अनेक नागरिकांनी परिसरातील गोरगरीब, गरजूंना अन्नधान्य, तेल, तिखट, मीठ, तांदूळ, पीठ, तूर डाळ आदी विविध वस्तू वाटप केल्या होत्या. कुणीही उपाशी राहू नये, यासाठी सर्व जण काळजी घेत होते; मात्र यंदा संचारबंदीत कोरोनामुळे गोरगरीब मजुरांकडे काम नाही. विहित वेळेत व्यवसाय करावा लागत आहे. अशात आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न अनेक नागरिकांपुढे उभा ठाकला आहे.

मात्र अशा बिकट परिस्थितीमध्येही त्यांना कोणीच मदतीचा हात देत नाही, जिल्ह्यासह तालुक्यातील ग्रामीण भागातील दानदातेदेखील दिसून येत नाहीत. जिल्हावासीयांवर सलग तीन महिन्यांपासून संचारबंदीचा बडगा आहे. होती नव्हती ती शिल्लक, घरातील मौल्यवान वस्तूंची मोड करून उपजीविका भागविली गेली; मात्र आता ग्रामीण भागातील लोकांना दोन वेळच्या जेवणाची समस्या भेडसावत आहे.

फोटोसेशन करणारे कुठे?

मागच्या वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत कार्य तसेच फोटोसेशन करणाऱ्यांनी यंदा मदतीचा हात आखडता घेतला आहे. मागच्या वर्षी गोरगरिबांना दिलेले धान्य कदाचित संपले नसावे, असा धान्य देणाऱ्यांचा समज झाला असावा, असे दिसत आहे. मागील लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य सरकारने शिस्तबद्धरीत्या तालुक्यातील गावागावात नागरिकांना मदतीचा हात दिला. या महत्त्वाच्या कार्यात सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्या दानदात्यांनी गरिबांपासून डिस्टन्सिंग राखले आहे.

बॉक्स २

गरजवंतांना आता खरी मदतीची गरज

गेल्या वर्षी कोरोना काळात अनेक सामाजिक संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गरजवंतांना मदत केली; मात्र काहींनी केवळ फोटोसेशनसाठी मदत केली होती, हे सर्वश्रुत आहे. तर काही सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी मात्र प्रामाणिक मदत केली. अनेकांनी तर मदतीचा थांगपत्ताही लागू दिला नाही. यावर्षी पुन्हा कोरोनाने आक्रमण केले आहे. अशा वेळी मदत करणाऱ्या प्रामाणिक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे; मात्र सर्व संघटना व कार्यकर्ते कुठे गेले, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.