शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दानदात्यांनी राखले ‘डिस्टन्सिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:13 IST

सुमित हरकूट चांदूर बाजार : मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गाव-खेडेपर्यंत सर्वांनी मदतीचे हात पुढे केले होते; परंतु दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य ...

सुमित हरकूट

चांदूर बाजार : मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गाव-खेडेपर्यंत सर्वांनी मदतीचे हात पुढे केले होते; परंतु दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिक भरडून जात असताना यंदा कुणीच कुणाला मदत करताना दिसत नाही. यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मदत करणारे गायब झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये बहुतांश राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व समाजातील अनेक नागरिकांनी परिसरातील गोरगरीब, गरजूंना अन्नधान्य, तेल, तिखट, मीठ, तांदूळ, पीठ, तूर डाळ आदी विविध वस्तू वाटप केल्या होत्या. कुणीही उपाशी राहू नये, यासाठी सर्व जण काळजी घेत होते; मात्र यंदा संचारबंदीत कोरोनामुळे गोरगरीब मजुरांकडे काम नाही. विहित वेळेत व्यवसाय करावा लागत आहे. अशात आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न अनेक नागरिकांपुढे उभा ठाकला आहे.

मात्र अशा बिकट परिस्थितीमध्येही त्यांना कोणीच मदतीचा हात देत नाही, जिल्ह्यासह तालुक्यातील ग्रामीण भागातील दानदातेदेखील दिसून येत नाहीत. जिल्हावासीयांवर सलग तीन महिन्यांपासून संचारबंदीचा बडगा आहे. होती नव्हती ती शिल्लक, घरातील मौल्यवान वस्तूंची मोड करून उपजीविका भागविली गेली; मात्र आता ग्रामीण भागातील लोकांना दोन वेळच्या जेवणाची समस्या भेडसावत आहे.

फोटोसेशन करणारे कुठे?

मागच्या वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत कार्य तसेच फोटोसेशन करणाऱ्यांनी यंदा मदतीचा हात आखडता घेतला आहे. मागच्या वर्षी गोरगरिबांना दिलेले धान्य कदाचित संपले नसावे, असा धान्य देणाऱ्यांचा समज झाला असावा, असे दिसत आहे. मागील लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य सरकारने शिस्तबद्धरीत्या तालुक्यातील गावागावात नागरिकांना मदतीचा हात दिला. या महत्त्वाच्या कार्यात सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्या दानदात्यांनी गरिबांपासून डिस्टन्सिंग राखले आहे.

बॉक्स २

गरजवंतांना आता खरी मदतीची गरज

गेल्या वर्षी कोरोना काळात अनेक सामाजिक संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गरजवंतांना मदत केली; मात्र काहींनी केवळ फोटोसेशनसाठी मदत केली होती, हे सर्वश्रुत आहे. तर काही सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी मात्र प्रामाणिक मदत केली. अनेकांनी तर मदतीचा थांगपत्ताही लागू दिला नाही. यावर्षी पुन्हा कोरोनाने आक्रमण केले आहे. अशा वेळी मदत करणाऱ्या प्रामाणिक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे; मात्र सर्व संघटना व कार्यकर्ते कुठे गेले, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.