शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अतिसाराचा दुसरा बळी; पत्नीचा मृत्यू, पती रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:59 IST

तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथील अतिसाराने दुसरा बळी कौंडण्यपूर येथील निर्मला ठाकरे यांचा घेतला. त्यांचा १ एप्रिल रोजी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, गावातील अतिसाराला कारणीभूत पाण्याचा नमुना अहवालासाठी प्रशासनाने दिलेली २ मेची वेळ टळून गेली तरी हा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथील अतिसाराने दुसरा बळी कौंडण्यपूर येथील निर्मला ठाकरे यांचा घेतला. त्यांचा १ एप्रिल रोजी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, गावातील अतिसाराला कारणीभूत पाण्याचा नमुना अहवालासाठी प्रशासनाने दिलेली २ मेची वेळ टळून गेली तरी हा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.धारवाडा येथे २८ एप्रिल रोजी पांडुरंग तायवाडे (५०) यांना दूषित पाण्यातून अतिसाराची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गावात अतिसाराची लागण झाल्याचे आरोग्य व्यवस्थेच्या निदर्शनात येताच त्यांनी धारवाडा येथे आपली चमू पाठवून येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आरोग्य शिबिर राबवून काही जणांना तेथेच उपचार दिले. वॉर्ड क्र. २ मधील विहिरीच्या पाण्यातून हा प्रकार उद्भवला. गावातील एका लग्नसमारंभात या विहिरीचे पाणी वापरल्याने नागरिकांना अतिसारचा त्रास झाला.ही धारवाडाचीच लागणपांडुरंग तायवाडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले कौंडण्यपूर येथील शंकर ठाकरे व त्यांच्या पत्नी निर्मला ठाकरे हे दोन दिवस धारवाडा येथे राहिले. अतिसाराचा त्रास सुरू झाल्याने ते ३० एप्रिलला कौंडण्यपूर येथे परतले.ठाकरे दाम्पत्याने उपचारासाठी आर्वी ग्रामीण रुग्णालय गाठले. त्यांना संडास-उलट्यांचा त्रास जास्त असल्याने अ‍ॅडमिट करून घेतले. उपचारादरम्यात निर्मला ठाकरे यांचा १ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. अतिसारातून झालेल्या जंतुसंसर्गामुळे मृत्यू झाल्याचे आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कोल्हे यांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य पाहता, त्यांचे पती शंकर ठाकरे यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले असून, धारवाडा येथील तीन ते चार रुग्ण अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली.आरोग्य यंत्रणेची सारवासारव, तीन रुग्ण उपचारासाठी अमरावतीतइतर ठिकाणीही साथ!अतिसाराने एकापाठोपाठ बळी जाणे हे आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचे उदाहरण आहे. धारवाडा येथे आलेली पाहुणे मंडळी आपआपल्या गावी गेली आहेत. तेथेही अतिसाराचा जंतुसंसर्ग फैलण्याची भीती आहे.यंत्रणा कुचकामी२८ एप्रिलपासून चार दिवस होऊनही पाणी नमुना तपासणी अहवाल आलेला नाही. त्यावरूनच या प्रकरणात आरोग्य अधिकारी व यंत्रणा किती गंभीर आहे, हे दिसून येते. सतत चार दिवस शासकीय सुट्या असल्यामुळे पाणी तपासणी अहवाल येऊ शकला नाही, अशी कारणे आरोग्य विभाग असले तरी २ एप्रिलच्या दुपारपर्यंतही अहवालाची प्रतीक्षा होती.सदर महिला हृदयविकाराने दगावल्याची माहिती आहे. कौंडण्यपूरला पथक पाठविले. धारवाडाला दोन डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांचे पथक सात दिवस राहणार आहे. तेथील दूषित पाण्याचा चाचणी अहवाल अद्याप अप्राप्त आहे.सुरेश असोले,जिल्हा आरोग्य अधिकारीआईला घरी असताना माझ्यासमोर दोन वेळा उलट्या झाल्या होत्या. संडासचा त्रास होता. आई-वडिलांना आर्वी येथे दवाखान्यात दाखविले असता येथे आईचा मृत्यू झाला. आता बाबाची प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.- सचिन ठाकरे,मृताचा मुलगा