शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रम वेगळा गुणपत्रिकेत दुसरेच विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:13 IST

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता संपेना, हे विदारक चित्र आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाचा घोळ : एम.ए. राज्यशास्त्र भाग-२ सेमिस्टर ४ पेपरमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता संपेना, हे विदारक चित्र आहे.विद्यापीठात गत तीन वर्षांपासून परीक्षा आणि निकाल सुरळीत लागले असतील, असे क्वचितच घडले आहे. असाच धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. अमरावती येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालयातील एम.ए. भाग २ (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी प्रसेनजित बाबूराव इंगोले याने उन्हाळी २०१९ परीक्षेत सेमिस्टर ४ ची परीक्षा दिली. त्याने पदव्युत्तर राज्यशास्त्र अभ्यासक्रमाचे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट अ‍ॅन्ड थिअरी, रिसर्च मेथडॉलॉजी, डिप्लोमसी अ‍ॅन्ड इंडियन फॉरेन पॉलिसी, इंटरनॅशनल लॉ अ‍ॅन्ड इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन, असे चार पेपर दिले. मात्र, डिप्लोमसी अ‍ॅन्ड इंडियन फॉरेन पॉलिसी, इंटरनॅशनल लॉ अ‍ॅन्ड इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन या दोन विषयांऐवजी पॉलिटिकल सोशालॉजी व पॉलिटिकल अथ्रॉपॉलाजी हे दोन विषय गुणपत्रिकेवर नमूद करून त्यांचे गुण देण्यात आले आहे. जे विषय अभ्यासक्रमात घेतले नाही, त्याचे गुण नमूद करून चक्क उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका हाती पडल्याने सदर विद्यार्थी गोंधळून गेला आहे. अशाच प्रकार श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, तक्षशीला महाविद्यालय, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील पदव्युत्तर राज्यशास्त्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसोबत झाल्याची माहिती मिळाली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सर्वाधिक मनुष्यबळ उपलब्ध असुनही अचूक निकाल कधी लागणार, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.चूक परीक्षा विभागाची, हेलपाटे विद्यार्थ्यांनाएम.ए. राज्यशास्त्र भाग २ सेमिस्टर ४ पेपर वेगळ्याच विषयाचे सोडविले आणि उत्तरपत्रिका वेगळ्याच विषयाची मिळाल्याबाबत विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठ गाठले. परीक्षा व मूल्यांकन विभागात प्रसेनजित इंगोले या विद्यार्थ्याने कैफियत मांडली. मात्र, गुणपत्रिकेवरील चूक दुरूस्त करून मिळेल. त्याकरिता २० दिवसांचा अवधी लागेल, असे उत्तर देत विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते.