शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

अभ्यासक्रम वेगळा गुणपत्रिकेत दुसरेच विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:13 IST

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता संपेना, हे विदारक चित्र आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाचा घोळ : एम.ए. राज्यशास्त्र भाग-२ सेमिस्टर ४ पेपरमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता संपेना, हे विदारक चित्र आहे.विद्यापीठात गत तीन वर्षांपासून परीक्षा आणि निकाल सुरळीत लागले असतील, असे क्वचितच घडले आहे. असाच धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. अमरावती येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालयातील एम.ए. भाग २ (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी प्रसेनजित बाबूराव इंगोले याने उन्हाळी २०१९ परीक्षेत सेमिस्टर ४ ची परीक्षा दिली. त्याने पदव्युत्तर राज्यशास्त्र अभ्यासक्रमाचे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट अ‍ॅन्ड थिअरी, रिसर्च मेथडॉलॉजी, डिप्लोमसी अ‍ॅन्ड इंडियन फॉरेन पॉलिसी, इंटरनॅशनल लॉ अ‍ॅन्ड इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन, असे चार पेपर दिले. मात्र, डिप्लोमसी अ‍ॅन्ड इंडियन फॉरेन पॉलिसी, इंटरनॅशनल लॉ अ‍ॅन्ड इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन या दोन विषयांऐवजी पॉलिटिकल सोशालॉजी व पॉलिटिकल अथ्रॉपॉलाजी हे दोन विषय गुणपत्रिकेवर नमूद करून त्यांचे गुण देण्यात आले आहे. जे विषय अभ्यासक्रमात घेतले नाही, त्याचे गुण नमूद करून चक्क उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका हाती पडल्याने सदर विद्यार्थी गोंधळून गेला आहे. अशाच प्रकार श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, तक्षशीला महाविद्यालय, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील पदव्युत्तर राज्यशास्त्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसोबत झाल्याची माहिती मिळाली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सर्वाधिक मनुष्यबळ उपलब्ध असुनही अचूक निकाल कधी लागणार, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.चूक परीक्षा विभागाची, हेलपाटे विद्यार्थ्यांनाएम.ए. राज्यशास्त्र भाग २ सेमिस्टर ४ पेपर वेगळ्याच विषयाचे सोडविले आणि उत्तरपत्रिका वेगळ्याच विषयाची मिळाल्याबाबत विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठ गाठले. परीक्षा व मूल्यांकन विभागात प्रसेनजित इंगोले या विद्यार्थ्याने कैफियत मांडली. मात्र, गुणपत्रिकेवरील चूक दुरूस्त करून मिळेल. त्याकरिता २० दिवसांचा अवधी लागेल, असे उत्तर देत विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते.