शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

अभ्यासक्रम वेगळा गुणपत्रिकेत दुसरेच विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:13 IST

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता संपेना, हे विदारक चित्र आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाचा घोळ : एम.ए. राज्यशास्त्र भाग-२ सेमिस्टर ४ पेपरमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता संपेना, हे विदारक चित्र आहे.विद्यापीठात गत तीन वर्षांपासून परीक्षा आणि निकाल सुरळीत लागले असतील, असे क्वचितच घडले आहे. असाच धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. अमरावती येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालयातील एम.ए. भाग २ (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी प्रसेनजित बाबूराव इंगोले याने उन्हाळी २०१९ परीक्षेत सेमिस्टर ४ ची परीक्षा दिली. त्याने पदव्युत्तर राज्यशास्त्र अभ्यासक्रमाचे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट अ‍ॅन्ड थिअरी, रिसर्च मेथडॉलॉजी, डिप्लोमसी अ‍ॅन्ड इंडियन फॉरेन पॉलिसी, इंटरनॅशनल लॉ अ‍ॅन्ड इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन, असे चार पेपर दिले. मात्र, डिप्लोमसी अ‍ॅन्ड इंडियन फॉरेन पॉलिसी, इंटरनॅशनल लॉ अ‍ॅन्ड इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन या दोन विषयांऐवजी पॉलिटिकल सोशालॉजी व पॉलिटिकल अथ्रॉपॉलाजी हे दोन विषय गुणपत्रिकेवर नमूद करून त्यांचे गुण देण्यात आले आहे. जे विषय अभ्यासक्रमात घेतले नाही, त्याचे गुण नमूद करून चक्क उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका हाती पडल्याने सदर विद्यार्थी गोंधळून गेला आहे. अशाच प्रकार श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, तक्षशीला महाविद्यालय, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील पदव्युत्तर राज्यशास्त्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसोबत झाल्याची माहिती मिळाली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सर्वाधिक मनुष्यबळ उपलब्ध असुनही अचूक निकाल कधी लागणार, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.चूक परीक्षा विभागाची, हेलपाटे विद्यार्थ्यांनाएम.ए. राज्यशास्त्र भाग २ सेमिस्टर ४ पेपर वेगळ्याच विषयाचे सोडविले आणि उत्तरपत्रिका वेगळ्याच विषयाची मिळाल्याबाबत विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठ गाठले. परीक्षा व मूल्यांकन विभागात प्रसेनजित इंगोले या विद्यार्थ्याने कैफियत मांडली. मात्र, गुणपत्रिकेवरील चूक दुरूस्त करून मिळेल. त्याकरिता २० दिवसांचा अवधी लागेल, असे उत्तर देत विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते.