शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

सेतू केंद्रावरील सातबारा योजनेचा फज्जा

By admin | Updated: June 19, 2015 00:40 IST

शासनाने पटवाऱ्यांना सातबारा आॅनलाईन करण्याचे आदेश दिल्यापासून हा निर्णय प्रत्यक्षात येईपर्यंत त्यात अनेक चुका झाल्या आहेत.

जुन्याच नोंदी : अंजनगाव तालुक्यातील शेतकरी अडचणीत, कर्ज मिळण्यास अपात्रतेची पावतीअंजनगाव सुर्जी : शासनाने पटवाऱ्यांना सातबारा आॅनलाईन करण्याचे आदेश दिल्यापासून हा निर्णय प्रत्यक्षात येईपर्यंत त्यात अनेक चुका झाल्या आहेत. त्यामुळे ‘अद्ययावत सातबारा’ ही केवळ लोकप्रिय घोषणा ठरली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सातबारा आॅनलाईन काढल्यावरदेखील त्यांच्यावर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. या सातबाऱ्यामध्ये जुन्याच नोंदी असून कित्येक सातबाऱ्यामधील मालकाचे नाव गायब आहेत. मात्र, कर्ज घेतल्याची नोंद सातबाऱ्यावर कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेताना अडचणी येत आहेत. सेतू केंद्रावर गावोगावी शेतकऱ्यांनी सातबारा मिळविण्यासाठी गर्दी केली असून प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पदरी सातबारा न पडल्याने निराशा आली आहे.शासनाने पटवाऱ्यांना सातबारा यापुढे गावातून न देण्याचे आदेश दिले व सर्व शेतकऱ्यांनी आपला सातबारा संगणक सेतू केंद्रातून घेण्याचे आवाहन केले. मात्र, योजनेचे केंद्रीकरण करुन आपण एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या शेतकरी खातेदारांना बोटावर मोजण्याइतपत सेतू केंद्रातून खरोखरच सातबारा वितरित करु शकतो काय? याचा विचार मात्र झाला नाही. पर्यायाने ही संपूर्ण योजना कोलमोडली आहे व याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. आपल्या हक्काचे कमाईचे साधन गेले म्हणून पटवारी वर्गानेही सातबारा अद्ययावत करण्याच्या नोंदी संगणकात केल्याच नाहीत, याचे अनेक पुरावे आहेत. स्थानिक तहसीलच्या सेतू केंद्रात सातबारा प्राप्त झाला नाही. म्हणून महसूल अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तहसीलदार प्रदीप पवार यांनी तातडीने सर्व तलाठ्यांची सभा घेऊन सातबाराच्या नोंदी तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहे. पण, हे काम कितीही घाईने केली तरी कामे आटोपत नसल्याने शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत आहेत. शासनाने निराधार योजनेचे पोस्ट खात्यामार्फत गावागावांत होणारे वेतन वितरण थांबवून बँकांमार्फत केल्याने जशा बँकांचे कामकाज गर्दीमुळे प्रभावित झाले तसेच सेतू केंद्राचे हाल होत आहेत. या योजनेचा पूर्णत: विचार करुन शेतकऱ्यांना तातडीने व गरज असल्यास पटवाऱ्यांकडून हाताने लिहिलेला सातबारा वितरित करण्याची मागणी महेश खारोळे, संजय हाडोळे, कपिल देशमुख, शंतनू भांबुरकर, श्याम गायगोले आदी युवा शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांची अडचण ओळखून तातडीने सातबाऱ्याची समस्या निकाली काढावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सातबाऱ्यामुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण दूर व्हावी, एवढी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.