शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

दर्यापूर येथील हंगामी सेवकाने राष्ट्रपतींना मागितली इच्छामरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:30 IST

पणन महासंघात काम केल्यानंतर हाती दिव्यांग मुलाची ६१४ रुपये पेन्शन येते. त्यात आजारी पत्नी आणि उठताही न येऊ शकणारा मुलगा. त्यांना सोडून कुठे जाता येत नाही. त्यामुळे जेवढे मिळाले, तेवढ्यावरच गुजराण करावी लागते.

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : पणन महासंघात काम केल्यानंतर हाती दिव्यांग मुलाची ६१४ रुपये पेन्शन येते. त्यात आजारी पत्नी आणि उठताही न येऊ शकणारा मुलगा. त्यांना सोडून कुठे जाता येत नाही. त्यामुळे जेवढे मिळाले, तेवढ्यावरच गुजराण करावी लागते. अशा पराकोटीच्या विवशतेला कंटाळून दर्यापूर येथील एका व्यक्तीने राष्ट्रपतींकडे निवेदनातून आपली विवशता मांडली असून, इच्छामरणाला परवानगी देण्याची मागणी केली आहे.दर्यापुरातील खोलापुरी गेटस्थित जानराव राजगुरे हे १९७९ ते २००२ पर्यंत कापूस उत्पादक पणन महासंघात हंगामी सेवक म्हणून कार्यरत होते. शासनाने अचानक २००२ मध्ये कापूस खरेदी बंद केली. कार्यरत हंगामी सेवकांना कोणताही मोबदला दिला नाही. जानराव राजगुरे यांनी थातूरमातूर खाजगी कामे करून आपला संसाराचा गाडा चालवण्यास सुरुवात केली. मात्र, दुर्दैव त्यांच्या कच्छपी लागले. आधीच त्यांचा मुलगा २५ वर्षांपासून ९० टक्के अपंग आहे. दुसरीकडे पत्नीला आठ वर्षांपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्याने अपंगत्व आले. दोघांचे सारे जागीच करावे लागत असल्याने जानराव राजगुरे यांना त्यांच्या दिमतीला राहावे लागते. मुलासाठी मंजूर झालेल्या ६१४ रुपयांमध्ये दोघांच्या औषधासह घरामध्ये खाण्यापिण्यासाठी साहित्य आणावे लागते. नातेवाइकांसह मित्रमंडळींनी आजवर मदत केली; परंतु, दरवेळी त्यांच्यापुढे हात पसरण्याची वेळ येऊ न देण्यासाठी इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जानराव राजगुरे यांनी केली आहे.राष्ट्रपतींना निवेदनजानराव राजगुरे यांनी राष्ट्रपतींसह राज्याचे मुख्यमंत्री, सहकारमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना पत्रातून आपल्या वेदना कळविल्या आहेत.