शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

दुष्काळावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: March 26, 2016 23:59 IST

खरीप २०१५ या हंगामात जिल्ह्यातील ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या १,९६७ गावांत शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली आहे.

सवलतींचा मार्ग सुकर : जिल्ह्यातील १ हजार ९६७ गावांना मिळणार लाभअमरावती : खरीप २०१५ या हंगामात जिल्ह्यातील ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या १,९६७ गावांत शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली आहे. अन्य दुष्काळी गावांप्रमाणेच या दुष्काळी गावांना देखील सर्व सवलती मिळणार आहे. जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षाकरिता खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४३ पैसे ३१ डिसेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली होती. शासनाने नोव्हेंबर २०१५ मध्ये राज्यातील १५ हजार ७४७ गावांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केली. मात्र यामध्ये अमरावती जिल्ह्यास वगळण्यात आले होते. जिल्ह्यात पैसेवारी ५० पैशाच्या आत असली तरी पर्जन्यमान ८० टक्क्यांवर असल्याने दुष्काळस्थिती नसल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. दरम्यान राज्यात दुष्काळस्थिती जाहीर करण्याबाबत शासनाने दुजाभाव केला आहे. शासन निकष पैसेवारीचा असताना व ५० पैशांच्या आत पैसेवारी असतानाही अमरावती विभागातील गावांत दुष्काळस्थिती जाहीर करण्यात आलेली नाही. या आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. यावर उच्च न्यायालयाने शासनाला फटकारले तसेच राज्य विधिमंडळ अधिवेशनात बुधवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित व सुनील तटकरे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या चर्चा दरम्यान ना. एकनाथ खडसे यांनी अमरावती, यवतमाळ, वाशीम व अकोला जिल्ह्यातील ५ हजार ८१० गावांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केल्याने जिल्ह्यातील १ हजार ९६७ गावांना दुष्काळाच्या सोई-सवलती मिळणार आहेत. जिल्ह्यात दुष्काळस्थिती घोषित केल्याबाबत जिल्हा प्रशासनाने पुष्टी केली. याविषयी शासन आदेश अद्याप प्राप्त नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)या गावांना मिळणार सवलतीजिल्ह्यात अमरावती तालुक्यातील १४३, भातकुली १३७, नांदगाव खंडेश्वर १६१, चांदूररेल्वे ९०, धामणगाव ११२, तिवसा ९५, मोर्शी १५६, वरुड १४०, अचलपूर १८४, चांदूरबाजार १७०, दर्यापूर १५०, अंजनगाव १२७, धारणी १५२, चिखलदरा तालुक्यातील १५० गावांना दुष्काळाच्या सवलतींचा लाभ मिळणार आहे. शुध्दीपत्रक काढण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर केलेला असताना, अमरावती विभागातील ५० पैशांच्या आत पैसेवारी असलेले जिल्हे दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवल्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवार १८ मार्च २०१५ रोजी राज्य शासनावर ताशेरे ओढले होते. विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांविषयी शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले होते.