शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

रेल्वे गाड्यात विनातिकीट प्रवाशांची शोधमोहीम

By admin | Updated: July 25, 2016 00:09 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आर्थिक उत्पन्नात झालेली घट बघता मध्य रेल्वे मुंबई विभागाने विनातिकीट प्रवाशांची शोधमोहीम सुरू केली आहे.

विशेष पथक गठित : अमरावती, बडनेरा प्लॅटफार्मवर लक्षअमरावती : गतवर्षीच्या तुलनेत यंदा आर्थिक उत्पन्नात झालेली घट बघता मध्य रेल्वे मुंबई विभागाने विनातिकीट प्रवाशांची शोधमोहीम सुरू केली आहे. २१ ते ३१ जुलै या कालावधीत सप्ताहांतर्गत रेल्वे गाड्या, प्लॅटफार्म तपासणीसाठी विशेष पथक गठित करण्यात आले आहे. भुसावळ विभागात या मोहिमेतून दरदिवशी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न वाढीस लागले आहे.रेल्वे गाड्यात विनातिकीट प्रवास करणे कायदेशिरपणे गुन्हा आहे. मात्र रेल्वेकडे तोकडे मनुष्यबळ असल्यामुळे ही बाब प्रवाशांसाठी फावत आहे. यावर्षी रेल्वेमंत्रालयाने आर्थिक उत्पन्नाचा आढावा घेतला असता मध्य रेल्वे मुंबई विभाग उत्पन्नात फारच माघारल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी विनातिकीट प्रवासी शोधमोहिम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २१ जुलैपासून भुसावळ मध्य रेल्वे विभागात विशेष पथक गठित करण्यात आले आहे. रेल्वे तिकीट विभागाशी संबंधित नसलेल्या अन्य विभागातील अधिकाऱ्यांची विनातिकीट प्रवाशांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक भुसावळ ते बडनेरा या दरम्यान एकुणच गाड्यांची तपासणी करीत आहे. बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर चार दिवसांपासून रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मची कसून तपासणी केली जात आहे. यात एक्सप्रेस, पॅसेजर व लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. विशेष पथकाला स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहे. विनातिकीट प्रवासी आढळल्यास त्याने दंडात्मक रक्कमेचा भरणा केला नाही तर त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार देवून कारागृहात पाठविले जाते. रेल्वे गाड्यात विनातिकीट प्रवाशांची शोधमोहिम सुरु झाल्याने अनेकांनी आता तिकीट घेवूनच प्रवास करायला प्रारंभ केला आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असून विनातिकीट प्रवास करणाऱ्यावर अंकुश लावता येत आहे. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जात आहे. रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवर प्रवाशांच्या गर्दी देखील वाढली आहे. (प्रतिनिधी)लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या लक्ष्यरेल्वे गाड्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची शोधमोहीम विशेष पथकाकडून होत आहे. अमरावती व बडनेरा रेल्वेस्थानकावर गत चार दिवसांपासून लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या फुकट्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. मेल, एक्सप्रेस गाड्यांना विशेषतत्वाने रेल्वे अधिकारी तपासणी करीत आहे. चार दिवसाच्या या तपासणीत अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करताना निदर्शनास आले आहे. शनिवारी दोन गाड्यांमध्ये १९ प्रवासी विना तिकीट आढळले.विशेष पथक तपासणीमुळे रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. किंबहुना फकट्या प्रवाशांवर लगाम लावणे सुकर झाले आहे. दोन दिवसात १९ प्रवाश्यांकडून ५२१० रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.- व्ही. डी. कुंभारेवाणिज्य निरिक्षक, अमरावती रेल्वे