शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळस्थितीवर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

 जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ६,८७,८९३ हेक्टरवर पेरणी झाली. सुरुवातील पावसात काही खंड राहिल्याने मूग, उडीद आदी ६० दिवसांचे पिके पूर्णत: खराब झाली, तर बियाणे कंपन्यांनी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने ५० हजारांवर हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही. याशिवाय सोयाबीन फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ऑगस्ट महिन्यापासून पावसाने जिल्ह्यात रिपरिप लावली ती ऑक्टोबरपर्यंत सुरूच होती. यामध्ये सोयाबीन जागेवरच सडले व काही भागात गंज्या सडल्या, सोयाबीनची प्रतवारी खराब झाली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची घोषणा, जिल्हाभरातील सर्वच १,९६० गावांची पैसेवारी ४६

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुरुवातीला पावसात खंड व नंतर सरासरी पार झालेल्या पावसाने खरिपाची पिके पूर्ण उद्‌ध्वस्त झाली. त्यामुळे अंतिम पैसेवारी काय जाहीर होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, यामध्ये गुरुवारी उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच म्हणजे १,९६० गावांची ४६ पैसेवारी जाहीर केल्याने दुष्काळस्थितीवर शासनाची एकप्रकारे मोहर लागली आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ६,८७,८९३ हेक्टरवर पेरणी झाली. सुरुवातील पावसात काही खंड राहिल्याने मूग, उडीद आदी ६० दिवसांचे पिके पूर्णत: खराब झाली, तर बियाणे कंपन्यांनी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने ५० हजारांवर हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही. याशिवाय सोयाबीन फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ऑगस्ट महिन्यापासून पावसाने जिल्ह्यात रिपरिप लावली ती ऑक्टोबरपर्यंत सुरूच होती. यामध्ये सोयाबीन जागेवरच सडले व काही भागात गंज्या सडल्या, सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनखर्चही पडला नाही.   सरासरीपेक्षा जास्त पावसाने जमिनीत आर्द्रता व ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. गुलाबी बोंडअळीसोबत यंदा ८० टक्के कपाशीवर यंदा बोंडसडचे संकट उद्भवले त्यामुळे कपाशीच्या सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांनी कमी आलेली आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांनी कपाशी काढून रबीसाठी हरभऱ्याची पेरणी केल्याचे दिसून आले. सततच्या पावसामुळे काही भागात तुरीवर ‘मर’रोगाचा प्रादुर्भाव झाला व आता शीतलहरमध्ये दवाळगेल्याने तूर जागेवरच सुकत असल्याने नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे, त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत खरिपाची अंतिम पैसेवारी ४६ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व आठ प्रकारच्या सवलती मिळण्याच मार्ग मोकळा झालेला आहे.

बोंडसडमुळे २.१७ लाख हेक्टरमधील कपाशी बाधितयंदा पावसामुळे कपाशीवर बोंडसड, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामध्ये २,४४,००२ हेक्टर क्षेत्रापैकी २,१७,००१ हेक्टरमधील कपाशीचे ३३ टक्क्यावर नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १५,९९९ हेक्टर, भातकुली १४,०५०, चांदूर रेल्वे ६,२८०, धामणगाव रेल्वे १६,८१०, नांदगाव खंडेश्वर ६,५००, अचलपूर १४,५००, अंजनगाव सुर्जी १७,५३८, दर्यापूर ३६,६०१, धारणी ९०, चिखलदरा १८५९, मोर्शी २९,८२६, वरुड २९,८९१, तिवसा १०,००० व चांदूरबाजार तालुक्यात १६,९५७ हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी