शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

शिल्पकारांची जन्मभूमी उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:53 IST

शिल्पकारांची जन्मभूमी अशी ओळख मिरविणाऱ्या टिमटाळ्याची शासनाने उपेक्षा केली आहे. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी या गावात सुविधांची वानवा आहे.

ठळक मुद्देगाव दत्तक : विकासकामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव बारी : शिल्पकारांची जन्मभूमी अशी ओळख मिरविणाऱ्या टिमटाळ्याची शासनाने उपेक्षा केली आहे. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी या गावात सुविधांची वानवा आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हे गाव अडीच वर्षांपासून दत्तक घेतले होते. त्यासोबतच जनुना, जावरा, खिरसाना, निरसाना, अडगाव ही गावेसुद्धा दत्तक घेतली होती. तरीही या गावांचा विकास अद्यापही झाला नसल्याचे दिसून येत आहे. १९ नोव्हेंबर १९८४ रोजी महाराष्टÑ राज्यातील अमरावती जिल्ह्याच्या टिमटाळा या गावात एकनाथ रानडे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामकृष्ण रानडे हे टिमटाळा स्टेशनवर स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांची बदली झाल्याने ते कुटुंबासह नागपूरला स्थायिक झाले. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिल्प स्मारक त्यांनी उभारले. २ सप्टेंबर १९७० साली तत्कालीन राष्टÑपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले. या त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे पंतप्रधानांनी टिमटाळा या गावाची दत्तक ग्राम म्हणून निवड केली होती. तरी हे गाव अद्यापही विकास कामापासून कोसो दूर आहे. अडीच वर्षे उलटूनही घेतलेल्या दत्तक गावांचा विकास खोळंबला आहे. टिमटाळा गावात उद्योगधंदे, महिलांना उद्योग, वाचनालय, घरकुल सुविधा, शौचालय, संपूर्ण डांबरी रस्ते, सौंदर्यीकरण, एकनाथ रानडे यांचे स्मारक हे केंद्र शासनाच्यावतीने दत्तक ग्राम विकास योजनेच्यावतीने दोन वर्षात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही ही गावे विकास कामांपासून वंचित आहे. एकनाथ रानडे राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असल्याने पंतप्रधानांनी टिमटाळा गाव दत्तक घेण्यासाठी पीयूष गोयल यांना पाठविले होते. गावाच्या विकासासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंद अडसूळ, आ. वीरेंद्र जगताप यांच्याकडे दत्तक गावाच्या विकासाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावकºयांचे गावाचा विकास केव्हा होणार, याकडे लक्ष लागले आहे.टिमटाळा, खिरसाना, निरसाना ही गावे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतली असली तरी केंद्र शासनाने काम केलेच नाही. या गावांमधील घरकुल, शौचालयांची बांधकामे ग्रामपंचायतनेच केली.- लता भेंडेसरपंच, खिरसाना-निरसाना.