शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पकारांची जन्मभूमी उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:53 IST

शिल्पकारांची जन्मभूमी अशी ओळख मिरविणाऱ्या टिमटाळ्याची शासनाने उपेक्षा केली आहे. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी या गावात सुविधांची वानवा आहे.

ठळक मुद्देगाव दत्तक : विकासकामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव बारी : शिल्पकारांची जन्मभूमी अशी ओळख मिरविणाऱ्या टिमटाळ्याची शासनाने उपेक्षा केली आहे. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी या गावात सुविधांची वानवा आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हे गाव अडीच वर्षांपासून दत्तक घेतले होते. त्यासोबतच जनुना, जावरा, खिरसाना, निरसाना, अडगाव ही गावेसुद्धा दत्तक घेतली होती. तरीही या गावांचा विकास अद्यापही झाला नसल्याचे दिसून येत आहे. १९ नोव्हेंबर १९८४ रोजी महाराष्टÑ राज्यातील अमरावती जिल्ह्याच्या टिमटाळा या गावात एकनाथ रानडे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामकृष्ण रानडे हे टिमटाळा स्टेशनवर स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांची बदली झाल्याने ते कुटुंबासह नागपूरला स्थायिक झाले. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिल्प स्मारक त्यांनी उभारले. २ सप्टेंबर १९७० साली तत्कालीन राष्टÑपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले. या त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे पंतप्रधानांनी टिमटाळा या गावाची दत्तक ग्राम म्हणून निवड केली होती. तरी हे गाव अद्यापही विकास कामापासून कोसो दूर आहे. अडीच वर्षे उलटूनही घेतलेल्या दत्तक गावांचा विकास खोळंबला आहे. टिमटाळा गावात उद्योगधंदे, महिलांना उद्योग, वाचनालय, घरकुल सुविधा, शौचालय, संपूर्ण डांबरी रस्ते, सौंदर्यीकरण, एकनाथ रानडे यांचे स्मारक हे केंद्र शासनाच्यावतीने दत्तक ग्राम विकास योजनेच्यावतीने दोन वर्षात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही ही गावे विकास कामांपासून वंचित आहे. एकनाथ रानडे राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असल्याने पंतप्रधानांनी टिमटाळा गाव दत्तक घेण्यासाठी पीयूष गोयल यांना पाठविले होते. गावाच्या विकासासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंद अडसूळ, आ. वीरेंद्र जगताप यांच्याकडे दत्तक गावाच्या विकासाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावकºयांचे गावाचा विकास केव्हा होणार, याकडे लक्ष लागले आहे.टिमटाळा, खिरसाना, निरसाना ही गावे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतली असली तरी केंद्र शासनाने काम केलेच नाही. या गावांमधील घरकुल, शौचालयांची बांधकामे ग्रामपंचायतनेच केली.- लता भेंडेसरपंच, खिरसाना-निरसाना.