शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

आदिवासी विकास विभागात सोमवारपासून ‘ऑन स्क्रिन’ बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

अमरावती एटीसींचा पहिला प्रयोग, बदलीपात्र ३६० कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्तांनी कर्मचारी बदल्यांमध्ये ...

अमरावती एटीसींचा पहिला प्रयोग, बदलीपात्र ३६० कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्तांनी कर्मचारी बदल्यांमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी, यासाठी ‘ऑन स्क्रिन’ बदल्या हा पहिलाच प्रयोग राबविला. सोमवार, २ ऑगस्टपासून सलग तीन दिवस ऑनलाईन बदली करण्यात येणार आहे.

धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी व औरंगाबाद अशा सात एकात्मिक प्रकल्प अधिकारी अधिनस्थ १२ जिल्ह्यातील ‘ट्रायबल’ बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. या बदलीसाठी राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार नागरी सेवा मंडळ अंतर्गत कर्मचारी बदली समिती गठित करण्यात आली आहे. २, ३ व ४ ऑगस्ट असे तीन दिवस बदलीपात्र कर्मचाऱ्यांना ‘ऑन स्क्रिन’ बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरदिवशी १२५ ते १३० कर्मचाऱ्यांना बदलीसाठी बोलावण्यात आले आहे. किंबहुना एखाद्या जागेसाठी वाद निर्माण झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा समुपदेशनातून मार्ग काढणार येणार आहे. दरवर्षी ‘ट्रायबल’मध्ये बदल्या सुरू झाल्या की, राजकीय दबावतंत्र, चिरिमिरी आणि अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविले जातात. मात्र, यंदा ‘ऑन स्क्रिन’ बदल्यांमुळे अनेक कर्मचारी आनंदित असल्याचे चित्र आहे. सोयीच्या ठिकाणी बदली होईल, अशी बहुतांश बदलीपात्र कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. यंदा शासन निर्णयानुसार कार्यरत पदाच्या २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. ३ वर्षे प्रशासकीय सेवेचा कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची अगोदरच यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कागदपत्रांची छाननीदेखील आटोपली आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची वैयक्तिक सुनावणी, अडचणी, बदलीचे ठिकाण, अर्ज आणि पर्यायदेखील ठेवण्यात आले आहे. त्यामुळे २ ऑगस्टपासून प्रारंभ होणारी बदली प्रक्रिया नक्कीच तक्रारीविना पार पडेल, असे दिसून येते.

------------------

हे आहेत बदली यादीत

माध्यमिक व प्राथमिकचे शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ प्राध्यापक, गृहपाल (महिला, पुरूष) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, आदिवासी विकास अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, उपलेखापाल, कार्यालय अधीक्षक, उपअधीक्षक अशा एकूण २८ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली यादीत समावेश आहे.

-----------------

यंदा कर्मचारी बदली प्रक्रिया ‘ऑनलाईन’, ‘ऑन स्क्रिन’ पारदर्शक आणि तक्रारीविना राबविली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या साेयीनुसार बदलीचे ठिकाण निश्चित होणार असून, तसे आदेश जारी होतील. समुपदेशाद्धारे बदली करण्यात येणार आहे. मेरीटला प्राधान्य राहील.

-विनोद पाटील, अपर आयुक्त, ‘ट्रायबल’अमरावती.