शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी येथे डेंग्यूसदृश आजाराने पुन्हा शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:16 IST

संख्या पोहोचली पाचवर, प्रशासनाकडून उपाययोजना नाहीत, मोर्शी : अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत मोर्शी शहरातील चार व तालुक्यातील बेलोना येथील ...

संख्या पोहोचली पाचवर, प्रशासनाकडून उपाययोजना नाहीत,

मोर्शी : अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत मोर्शी शहरातील चार व तालुक्यातील बेलोना येथील एका शाळकरी मुलाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे. तरीसुद्धा प्रशासनामार्फत या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्या जात नसल्याची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.

सूत्रांनुसार, अप्पर वर्धा कॉलनी येथील अप्पर वर्धाच्या कॉर्टरमध्ये भाड्याने राहत असलेल्या विजय श्रीराव यांचा ओम या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा ५ सप्टेंबर रोजी डेंग्यूसदृश आजाराने बळी घेतला. गेल्या काही दिवसांपासून मोर्शी शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. ५ ते ३० वर्षे वयोगटातील मुले-युवकांना ताप येऊन शरीरातील पेशी कमी होत आहेत. परिणामी शहरातील मोठ्या दवाखान्यांमध्ये दाखल होण्यासाठी गर्दी वाढली आहे. हा आजार आणखी किती बळी घेणार, अशी भीती मोर्शी शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये पसरली आहे. शहरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने डासांचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता तरी मोर्शी शहरात दिवसाआड फवारणी व काही दिवसांआड नाली सफाई करण्यात यावी, गाजरगवत निर्मूलन मोहीम राबविण्यात यावी, डासांचा प्रादुर्भाव व डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपाय योजना कराव्यात, अशी मागणी या ठिकाणी जोर धरीत आहे.

-------------

वातावरणातील अनियमिततेने वाढविले भय

शहरातील अस्वच्छता व डासांचा उद्रेक डेंगू आजाराला कारणीभूत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली असूनसुद्धा मोर्शी शहरात पाहिजे तसा पाऊस कोसळला नसल्याने उन्हाची दाहकता कायम आहे. पावसाच्या या अनियमितपणामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरीसुद्धा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नाल्यांची साफसफाई व फवारणी केली जात नाही.

पाच जण दगावले

१९ जुलै रोजी मोर्शी येथील रामजीबाबा परिसरातील १४ वर्षीय सर्वेश दिनेश महल्ले, ऑगस्ट महिन्यात रुक्मिणीनगरातील मयूर शैलेंद्र चौरे (२२), पेठपुरा परिसरातील गौरी प्रवीण मोथरकर (१५), तर आता ५ सप्टेंबर रोजी ओम श्रीराव या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. याशिवाय बेलोना येथील सौरभ दंडाळे (२२) याचाही डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला.