शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मोर्शी येथे डेंग्यूसदृश आजाराने पुन्हा शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:16 IST

संख्या पोहोचली पाचवर, प्रशासनाकडून उपाययोजना नाहीत, मोर्शी : अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत मोर्शी शहरातील चार व तालुक्यातील बेलोना येथील ...

संख्या पोहोचली पाचवर, प्रशासनाकडून उपाययोजना नाहीत,

मोर्शी : अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत मोर्शी शहरातील चार व तालुक्यातील बेलोना येथील एका शाळकरी मुलाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे. तरीसुद्धा प्रशासनामार्फत या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्या जात नसल्याची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.

सूत्रांनुसार, अप्पर वर्धा कॉलनी येथील अप्पर वर्धाच्या कॉर्टरमध्ये भाड्याने राहत असलेल्या विजय श्रीराव यांचा ओम या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा ५ सप्टेंबर रोजी डेंग्यूसदृश आजाराने बळी घेतला. गेल्या काही दिवसांपासून मोर्शी शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. ५ ते ३० वर्षे वयोगटातील मुले-युवकांना ताप येऊन शरीरातील पेशी कमी होत आहेत. परिणामी शहरातील मोठ्या दवाखान्यांमध्ये दाखल होण्यासाठी गर्दी वाढली आहे. हा आजार आणखी किती बळी घेणार, अशी भीती मोर्शी शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये पसरली आहे. शहरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने डासांचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता तरी मोर्शी शहरात दिवसाआड फवारणी व काही दिवसांआड नाली सफाई करण्यात यावी, गाजरगवत निर्मूलन मोहीम राबविण्यात यावी, डासांचा प्रादुर्भाव व डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपाय योजना कराव्यात, अशी मागणी या ठिकाणी जोर धरीत आहे.

-------------

वातावरणातील अनियमिततेने वाढविले भय

शहरातील अस्वच्छता व डासांचा उद्रेक डेंगू आजाराला कारणीभूत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली असूनसुद्धा मोर्शी शहरात पाहिजे तसा पाऊस कोसळला नसल्याने उन्हाची दाहकता कायम आहे. पावसाच्या या अनियमितपणामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरीसुद्धा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नाल्यांची साफसफाई व फवारणी केली जात नाही.

पाच जण दगावले

१९ जुलै रोजी मोर्शी येथील रामजीबाबा परिसरातील १४ वर्षीय सर्वेश दिनेश महल्ले, ऑगस्ट महिन्यात रुक्मिणीनगरातील मयूर शैलेंद्र चौरे (२२), पेठपुरा परिसरातील गौरी प्रवीण मोथरकर (१५), तर आता ५ सप्टेंबर रोजी ओम श्रीराव या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. याशिवाय बेलोना येथील सौरभ दंडाळे (२२) याचाही डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला.