शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

शालेय परिवहन समिती कागदावरच

By admin | Updated: February 3, 2015 22:48 IST

विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवणे तसेच त्यांच्या समस्या सोडविणे यासाठी प्रत्येक शाळेत स्थापन केलेली शालेय परिवहन समिती कागदावरच असून मागील अनेक

मोहन राऊत - अमरावतीविद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवणे तसेच त्यांच्या समस्या सोडविणे यासाठी प्रत्येक शाळेत स्थापन केलेली शालेय परिवहन समिती कागदावरच असून मागील अनेक दिवसांपासून या समितीची बैठकच झाली नाही. पोलीस ठाण्यातील बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे नाव यासमितीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ अमरावती शहरात मागील दिडवर्षा पूर्वी स्कूलबस अपघाताने शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील पालक मन सुन्न झाले होते़ अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना या स्कूलबसच्या न पाठविण्याचा निर्णय घेतला होता़ स्वत: तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी अमरावती शहरात घडलेल्या स्कूल बस अपघाताची दखल घेवून संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांच्या प्रवासा संदर्भात विशेष काळजी घेण्याचे आदेश शिक्षण विभाग व परिवहन विभागाला दिले होते़ परंतु या गंभीर बाबीकडे दोन्ही विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे़शासनाने जी नियमावली तयार केली आहे़ त्याची अंमलबजावणी काही शाळांमधून होते.परंतु काहीमधून होतच नाही ही च चितेची बाब आहे़ विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा रंग पिवळा असावा़ ज्या शाळेसाठी हे वाहन वापरले जाते त्या शाळेचे नाव त्या वाहनावर असावे या वाहनाकडे इतर वेळी अन्य कोणते कंत्राट असेल, त्या वाहनांवर चहू बाजूने पिवळा पट्टा आवश्यक असणार आहे़ विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन बंदिस्त असावे बॅग्ज ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा असावी, विद्यार्थी असतांना वाहनात संगीत लावता येणार नाही. वाहनातील विद्यार्थी कोठे बसणार व उतरणार याची यादी चालकाकडे असावी त्यावर पालकांचे नाव, पत्ता, मोबाईलनंबर असावा, वाहनांना स्पिड गव्हर्नर बसविण्याची शिफारस शासनाने केली असली तरी त्याची अंमलबजावणी कोणीच प्रभावीपणे करत नसल्याचे दिसून येत आहे़बालवाडीतील मुलांची वाहतूक करताना चालकाने काळजी घ्यायला हवी कारण ज्याठिकाणी मुले उतरणार आहेत तेथे त्यांना नेण्यास येणारी व्यक्ती पालकांपैकी कोणी आहे का़ याची खात्री करायला हवी मुलांना नेण्यास येणाऱ्या व्यक्तीची माहिती शाळेत असायला हवी पण अनेक बालवाडीत पालकांची माहिती दिलेली नसते़ अनेकवेळा पालक वेळेवर पोहोचत नाहीत आणि मुलास कोठे सोडायचे याची काळजी वाहनचालकाला करावी लागते जर कोणीच वेळेवर आले नाही तर त्या मुलास पुन्हा शाळेत आणून सोडण्याची जबाबदारी वाहनचालकास घ्यावी लागते, जर शालेय वाहतूक समिती असेल तर त्यांनी वाहतुकीबाबत सर्व माहिती घ्यायला हवी पण दुदैवाने शहरातील व जिल्ह्यातील अनेक शाळेमध्ये अशी समिती अस्तित्वातच नसल्याचे दिसूनयेते तर एखाद्यावेळी काही घटना घडली तर त्याची जबाबदारी वाहनचालकांवर टाकली जाते़ काही वाहनांमधून बारापेक्षा कमी मुले असतील तर त्यांची जबाबदारी स्वत: वाहनचालकांवर असली पाहिजे़ जर जास्त मुले असतील तर एक सहाय्यक असायला हवा़ वाहनांमध्ये मुलीच असतील तर त्यासाठी महिला सहाय्यक असणे आवश्यक आहे़ सर्व वाहनांची स्वच्छता ठेवली पाहिजे हे कागदावर असले तरी त्याची अमंलबजावणी होते किंवा नाही हे पाहण्याची पूर्ण जबाबदारी शालेय समितीची आहे़महागाईचा काळात अनेक पालकांना शालेय बस परवडत नाही मग मुलांसाठी रिक्षा, व्हॅनचा पर्याय शोधला जातो़ असा पर्याय घेतांना त्या रिक्षा अथवा व्हॅनमध्ये किती मुले आहेत हे पालक कधीच पाहत नाहीत अनेक वाहनांमध्ये किती मुले असावीत याची पाहणी करण्याची जबाबदारी पोलिसांची असते़ पण पोलिस अशा वाहनांची कधीच तपासणी करत नाहीत़ मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला की शाळा प्रशासन हात वर करते़ शाळेतील शिक्षक हे मुलांना शिकविण्यासाठी आहेत़ दुपारचे भोजन द्यायचे की त्यांचे आरोग्य पाहायचे तसेच त्यांची वाहतूक व्यवस्था आम्ही कशी पाहणार असा सवाल विचारला जातो प्रत्येक शाळांमध्ये वाहतूक समिती असावी असा दंडक आहे़ पण बहुतांश शाळांमध्ये अशी समिती नाही असे चित्र आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाने एक पाऊल पुढे टाकत परिवहन समित्या कितपत कार्यरत आहे़ याची पाहणी करणे महत्वाचे आहे़