शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शालेय पाठपुस्तकांचा होणार पुनर्वापर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST

अमरावती : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट केला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी ...

अमरावती : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट केला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी पुनर्वापराची संकल्पना मुलांना शिकविली जाते. या संकल्पनेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत दिली जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके पालकांनी शाळेत मुख्याध्यापकाकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समग्र शिक्षा योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. त्यासाठी दरवर्षी २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च या पाठ्यपुस्तकावर होतो. शालेय विद्यार्थ्यांना गतवर्षी वाटप करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात पैकी अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तके योग्य रीतीने सांभाळून व व्यवस्थित ठेवतात. अधिकाधिक विद्यार्थ्यांकडील मुख्याध्यापकांनी पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्यांचे पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरवाटप करावे. पुस्तकांचा पुनर्वापर केल्यामुळे काही प्रमाणात कागदाची बचत होईल. पर्यावरणाची हानी होणार नाही. गतवर्षीप्रमाणे शासनाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराचा प्रकल्प सुरू केला आहे. ज्या शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात त्या शाळांमधील विद्यार्थी व पालकांनी २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावी. पाठ्यपुस्तके जमा झाल्यानंतर पुस्तकांची वर्गवारी शाळास्तरावर केली जाणार आहे.

बॉक्स

एकूण शाळा : २२६५

एकूण विद्यार्थी २ लाख २३ हजार ८०५

बॉक्स

गतवर्षी विद्यार्थ्यांना दिलेली पाठ्यपुस्तके

इ पहिली-२६९०८

इ दुसरी -२६९०८

इ तिसरी -२६९०८

इ चौथी -३०६७१

इ पाचवी -३२२३१

इ सहावी-३२१२६

इ सातवी-३७३२५

इ आठवी-३७६३६

कोट

पर्यावरण संवर्धन आणि कागदाची बचत करण्याच्या दृष्टीने गतवर्षी दिलेल्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मोफत वापरलेली पुस्तके मुख्याध्यापक, शिक्षकांकडे आणून द्यावी व पर्यावरण संवर्धन सहभाग घ्यावा.

- एजाज खान,

शिक्षणाधिकारी प्राथमिक

कोट

पुस्तकांच्या पुनर्वापराबद्दल जिल्ह्यातील सर्व बीईओ, केंद्रप्रमुखांची आढावा सभा घेण्यात आली. त्यात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके संकलित करून पुनर्वापर प्रकल्पास हातभार लावावा. पालकांनीसुद्धा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आपल्या पाल्याने वापरलेली पाठ्यपुस्तक इतर विद्यार्थ्यांच्या कामी पडतील, यासाठी सहकार्य करावे.

- प्रीती गावंडे,

संगणक प्रोग्रामर सर्व शिक्षा अभियान