शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

शालेय पाठपुस्तकांचा होणार पुनर्वापर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST

अमरावती : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट केला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी ...

अमरावती : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट केला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी पुनर्वापराची संकल्पना मुलांना शिकविली जाते. या संकल्पनेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत दिली जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके पालकांनी शाळेत मुख्याध्यापकाकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समग्र शिक्षा योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. त्यासाठी दरवर्षी २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च या पाठ्यपुस्तकावर होतो. शालेय विद्यार्थ्यांना गतवर्षी वाटप करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात पैकी अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तके योग्य रीतीने सांभाळून व व्यवस्थित ठेवतात. अधिकाधिक विद्यार्थ्यांकडील मुख्याध्यापकांनी पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्यांचे पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरवाटप करावे. पुस्तकांचा पुनर्वापर केल्यामुळे काही प्रमाणात कागदाची बचत होईल. पर्यावरणाची हानी होणार नाही. गतवर्षीप्रमाणे शासनाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराचा प्रकल्प सुरू केला आहे. ज्या शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात त्या शाळांमधील विद्यार्थी व पालकांनी २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावी. पाठ्यपुस्तके जमा झाल्यानंतर पुस्तकांची वर्गवारी शाळास्तरावर केली जाणार आहे.

बॉक्स

एकूण शाळा : २२६५

एकूण विद्यार्थी २ लाख २३ हजार ८०५

बॉक्स

गतवर्षी विद्यार्थ्यांना दिलेली पाठ्यपुस्तके

इ पहिली-२६९०८

इ दुसरी -२६९०८

इ तिसरी -२६९०८

इ चौथी -३०६७१

इ पाचवी -३२२३१

इ सहावी-३२१२६

इ सातवी-३७३२५

इ आठवी-३७६३६

कोट

पर्यावरण संवर्धन आणि कागदाची बचत करण्याच्या दृष्टीने गतवर्षी दिलेल्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मोफत वापरलेली पुस्तके मुख्याध्यापक, शिक्षकांकडे आणून द्यावी व पर्यावरण संवर्धन सहभाग घ्यावा.

- एजाज खान,

शिक्षणाधिकारी प्राथमिक

कोट

पुस्तकांच्या पुनर्वापराबद्दल जिल्ह्यातील सर्व बीईओ, केंद्रप्रमुखांची आढावा सभा घेण्यात आली. त्यात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके संकलित करून पुनर्वापर प्रकल्पास हातभार लावावा. पालकांनीसुद्धा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आपल्या पाल्याने वापरलेली पाठ्यपुस्तक इतर विद्यार्थ्यांच्या कामी पडतील, यासाठी सहकार्य करावे.

- प्रीती गावंडे,

संगणक प्रोग्रामर सर्व शिक्षा अभियान