शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून शाळा बंद, स्कूल वाहनचालकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून २२ मार्च २०२१ ला एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत जिल्ह्यातील संपूर्ण शाळा ...

अमरावती : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून २२ मार्च २०२१ ला एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत जिल्ह्यातील संपूर्ण शाळा बंदच आहेत. आमची स्थिती खूप भयावह असून, उपासमारीची पाळी आली आहे. आर्थिक संकटामुळे काही स्कूल वाहनचालकांनी आत्महत्यादेखील केली आहे. देव करो, शाळा लवकरच सुरू हो, असा टाहो स्कूल वाहनचालकांचा आहे. एक वर्षापासून शाळांची स्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे आमचा रोजगार गेला आहे. वर्षभरापासून आम्ही आर्थिक संकटाशी लढत आहो. आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. काय करावे अन्‌ काय नाही, अशी स्थिती आहे. आता २६ जूननंतर तरी शाळा सुरू होणे अपेक्षित असून, तशी आशा आम्हाला आहे, असे स्कूल वाहनचालक विजय रगबनसिंग यांनी व्यक्त केले.

बॉक्स

टरबुज, भाजीपाला, कपडे विकण्याची वेळ

राज्यात हजारो तर जिल्ह्यातील दोनशे ते तीनशे स्कूल वाहनचालकांचा रोजगार कोरोनाच्या संसर्गामुळे हिसकल्या गेला आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी टरबुज, भाजीपाला, कपडे आणि अन्य व्यवसाय सुरू केले आहेत. पोटाची खळगी बुजविण्यासाठी वाहनचालकांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटलेला आहे. विशेष म्हणजे वाहनचालक –मालकांच्या कुटुंबातील महिलांनासुद्धा रोजगारासाठी बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

बॉक्स

राज्यात नऊ स्कूल वाहनचालकांची आत्महत्या

राज्यभरातील शाळा बंद असल्यामुळे स्कूल वाहनचालक व मालकांना खूप वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे वाहनचालक मानसिक तणावात आले आहे. या मानसिक तणावातून राज्यभरातील नऊ स्कूल वाहनचालकांनी आत्महत्यादेखील केली आहे. यामध्ये नागपूरमध्ये ४, अमरावती २, चांदुरबाजार १ तर अन्य ठिकाणच्या स्कूल वाहनचालकांचा यात समावेश असल्याची धक्कादायक माहिती भगवे वादळ चालक-मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेचे राज्य अध्यक्ष अतुल खोंड यांनी दिली.

बॉक्स

आता मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच आत्मदहन करू

स्कूल वाहनचालक व मालकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वपरीने प्रयत्न केले आहेत; परंतु शासनाला जाग आला नाही. अनेकदा निवेदने दिली, रास्ता रोको आंदोलन केले. मी स्वत: अन्नत्याग आंदोलन केले. माझी प्रकृती गंभीर झाली होती. इतके सर्व केल्यानंतरही शासनाला जाग आली नाही. आता एकच मार्ग आहे. आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यां‍च्या निवासस्थानासमोर आत्मदहन करू, यासंदर्भात आमची संघटना लवकरच निर्णय घेणार असल्याचे भगवे वादळ चालक-मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेचे राज्य अध्यक्ष अतुल खोंड यांनी सांगितले.