शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शाळेची घंटा वाजली; विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:14 IST

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आणि विद्यार्थी अजूनही शाळेपासून दूर जितेंद्र दखने अमरावती: जिल्ह्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण महिनाभरापासून नाही अशा ...

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आणि विद्यार्थी अजूनही शाळेपासून दूर

जितेंद्र दखने

अमरावती: जिल्ह्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण महिनाभरापासून नाही अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचा आदेश शासनाने दिला असून, त्यानुसार काही शाळाही सुरू झाल्या आहेत; परंतु मागील वर्षाप्रमाणे यावर्षी शाळा निर्जंतुकीकरण व करुणा प्रतिबंधात्मक उपायांविषयी स्पष्ट आदेश लेखी स्वरूपात काढले गेलेले नाही. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील १८२ माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये एकूण ४० हजारावर पटसंख्या आहे; मात्र यापैकी उपस्थिती मात्र केवळ १० हजार आत आहे. यावरून अजूनही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालक उत्सुक नसल्याचे दिसून येते. त्याचा मुलांच्या आरोग्याविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी शासन कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली-४०५६२

दुसरी-३८३६५

तिसरी -३९८०७

चौथी -४३३६४

पाचवी-४४६०४

सहावी-४३२३४

सातवी -४४४९५

आठवी -४३६९६

नववी-४३७२६

दहावी-४४१०२

बॉक्स

सॅनिटायझेशन करा, पण पैसे देणार कोण?

निर्जंतुकीकरण प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना शासनाकडून होत आहेत; मात्र निधी नसल्याने निर्जंतुकीरणास पैसा कोण देणार, असा प्रश्न मुख्याध्यापक व शिक्षकांना पडला आहे.

बॉक्स

स्थानिक स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना

कोराेना संसर्गामुळे बंद असलेल्या जिल्ह्यातील शाळा हळूहळू सुरू होत आहेत. त्यासाठी शाळातली मागील वर्षाप्रमाणे स्थानिक ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने स्थानिक स्तरावर नियोजन केले जात आहे; परंतु काही ठिकाणी शाळा सुरू होऊनही रुग्ण आढळल्याने शाळा बदल करावे लागत असून, यासंदर्भातील निर्णय घेणे आवश्यक असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

बॉक्स

तोंडी आदेशामुळे मुख्याध्यापकांसमोर पेच

हरदाविषयी शासनाने लिखित आणि सातवा सूचना दिलेली नाही. त्यामुळे शाळांची निर्जंतुकीकरणासह अन्य खर्च करावा, असा पेच मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील १८२ शाळा सुरू

जिल्ह्यातील महिनाभराच्या कालावधीत कोरोना संसर्ग नसलेल्या वेगवेगळ्या गावातील सुमारे १८२ माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. सुरू झालेल्या शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत विद्यार्थ्यांची शाळेमध्ये उपस्थिती कमी आहे.