शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
11
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
12
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
14
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
15
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
16
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
17
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
18
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
19
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
20
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  

आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:17 IST

अमरावती : आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी शिष्यृवत्ती दिली जाते. यावर्षीसुद्धा शिष्यवृत्ती ...

अमरावती : आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी शिष्यृवत्ती दिली जाते. यावर्षीसुद्धा शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजवाणी करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रकल्प कार्यालय स्तरावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

दऱ्या-खोऱ्यात, वस्ती, वाड्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी, एमबीबीएस, फार्मसी, एमबीए अशा उच्च शिक्षणासाठी परदेशात शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या परदेशातील नामांकित संस्थेत प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे

शिक्षण, प्रवास, निवास आणि जेवणाचा खर्च राज्य शासन उचलणार आहे. शिष्यवृत्ती योजनेतंर्गत प्राप्त विद्यार्थांचे अर्ज प्रकल्प अधिकारी कार्यालय स्तरावर गोळा करून ते अपर आयुक्तांमार्फत नाशिक येथील आयुक्तांकडे पाठविले जातात. त्यानंतर राज्यभरातील विद्यार्थ्यांचे अर्जाची छाननी होऊन ते निवडले जातात. पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांची परदेश शिक्षणासाठी निवड होऊन त्यांना शिष्यवृत्ती बहाल केली जाते. आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यत आवश्यक ती कागदपत्रे जाेडून प्रस्ताव प्रकल्प कार्यालयात पाठवावे लागणार आहे. अमरावती अपर आयुक्त अंतर्गत धारणी, अकोला, कळमनुरी, औरंगाबाद, पांढरकवडा, किनवट व पुसद प्रकल्प कार्यालयात कागदपत्रे सादर करावे लागणार आहे.

----------------

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. ही यादी आयुक्तालयात पाठविली जाणार आहे. येथे पात्र उमेदवारांची निवड परदेशी शिक्षणासाठी करण्यात येणार आहे.

- वैभव वाघमारे, प्रकल्प अधिकारी, धारणी