शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

योजना गरिबांची, लाभ मिळतो धनदांडग्यांना !

By admin | Updated: September 18, 2015 00:21 IST

शासन प्रशासन स्तरावर राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ हा गरिबांना नव्हे, तर धनदांडग्यांना मिळत आहे.

अन्याय : गरजू लाभार्थी वंचितच, रिपाइंचा आरोपअमरावती : शासन प्रशासन स्तरावर राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ हा गरिबांना नव्हे, तर धनदांडग्यांना मिळत आहे. या योजनांमध्ये सर्वेक्षण करुन खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात रिपाइंचे शहर उपाध्यक्ष अशोक नंदागवळी यांनी निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती तसेच निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार, आर्थिक दुर्बल घटकांसाठीचा अनुदान योजनेत अनियमितता होत असल्याचा आरोप केला. निराधारासाठी ही योजना १९८० सालापासून राबविण्यात येत होती. परंतु अलीकडील काळात योजनेच्या निकषात पूर्णपणे बदल करून देवदासी, परितक्त्या, तृतीयपंथियांचा समावेश करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी व काही व्यक्तींनी केली आहे. मात्र याचा फायदा गरीबांना नव्हे तर धनदांडग्यांना होत आहे. योजनांचा वापर करून स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग होऊ लागल्याने खरेखुरे व गरजुवंत लाभार्थी मात्र वंचित राहू लागले असल्याचे रिपाइंचे म्हणणे आहे. सध्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा योजना आहे तर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ, अपंग आणि विधवा निवृत्ती वेतन योजना आहे. ६५ वर्षावरील व्यक्ती, ८० टक्क्याहून जास्त अपंग, २१ हजाराच्या आतील उत्पन्न आणि मुलांचे वय वर्षाच्या आतील असल्यास यातील काही योजनांसाठी लाभार्थी पात्र होतो. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तलाठ्यांपासून नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवाय क्षेत्रीय मर्यादा न ठेवता प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना त्यांच्या इच्छेनुसार अधिकार देण्यात आले आहेत यात राजकीय दबाव वाढत आहे. (प्रतिनिधी)