शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

टंचाईग्रस्त गावे, प्रस्ताव तयार करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यातील काही गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा शुक्रवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत ...

अमरावती : जिल्ह्यातील काही गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा शुक्रवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत चांगलाच गाजला. अखेर या टंचाईग्रस्त गावात तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत.

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात मेळघाटसह अन्य तालुक्यांतील काही गावांत नागरिकांना पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अद्याप उन्हाळा लागला नसला तरी मेळघाटातील एकझिरा आणि धामनगाव रेल्वे तालुक्यातील आजनगाव येथे नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, वरील गावांना तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही तातडीने उपाययोजना होत नाही. मेळघाटातील काही गावांत दरवषीच पाणीटंचाई भेडसावते. त्यामुळे या गावांत कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत सभापती दयाराम काळे, सदस्या अनिता मेश्राम यांनी सभागृहात मांडले. सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत अध्यक्षांनी टंचाईग्रस्त गावांचा तातडीने प्रस्ताव तयार करून या ठिकाणी उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांना दिले आहेत. यावेळी जलसंधारण विभागाशी संबंधित प्रश्न सदस्या गौरी देशमुख यांनी मांडले. कृषी, महावितरण, आदी विभागाच्या प्रश्नांवर वादळी चर्चा झाली. सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सदस्या पूजा होडोळे, वासंती मंगरोळे, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे, जलसंधारण अधिकारी शिरीष तट्टे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

बॉक्स

बोंडसळ नुकसानीच्या सर्व्हेचा ठराव

जिल्ह्यात यंदा पावसामुळे मृूग, उडीद, सोयाबीन या पिकांसोबतच कपाशीवर आलेल्या बोंडसळ रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे नुकसान झाले आहे, परंतु या नुकसानाबाबत प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात आल्यात, असा प्रश्न कृषी अधिकाऱ्यांना अध्यक्षांनी विचारला. यावर बोंडसळमुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे करण्याबाबत शासनाचे आदेश नाहीत. त्यामुळे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, असा ठराव जलव्यवस्थापन समितीत पारीत करण्यात आला आहे.