शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

यंदा एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

By admin | Updated: April 24, 2015 00:17 IST

२०१३-१४ च्या हंगामातील सोयाबीन डागी व ५० टक्केही उगवणशक्ती नसणारे होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

गजानन मोहोड अमरावतीसलग दोन हंगामात सोयाबीन उद्धवस्त झाले. २०१३-१४ च्या हंगामातील सोयाबीन डागी व ५० टक्केही उगवणशक्ती नसणारे होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. २०१४-१५ च्या हंगामात पावसाअभावी सोयाबीन शेतातच विरले, उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांनी घट झाली. यंदा साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी होण्याची शक्यता आहे. यासाठी किमान २ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. महाबीज व इतर कंपन्यांकडून केवळ १ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असल्याने एक लाख क्विंटल बियाण्यांचा तुटवडा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे राखून ठेवून बीजप्रक्रिया करावी, असा कृषी विभागाचा सल्ला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. मागील वर्षीचे सोयाबीन अतीपाऊस, परतीचा पाऊस यामध्ये गारद झाले. यंदाचे सोयाबीन पावसाअभावी दीड महिना उशिराने झालेली पेरणी व नंतर पावसातील खंड यामुळे बाधित झाले तसेच बाधित बियाण्यांच्या पेरणीमुळे यंदा सोयाबीनवर पिवळ्या ‘मोझॅक’ चा अटॅक झाला. या सर्वांचा परिणाम होऊन ७० टक्के सोयाबीन करपले. एकरी पोत्याचीही झडती झाली नाही. काही शेतामधील सोयाबीन शेतातच विरले मागील वर्षापेक्षा यंदाचे सोयाबीन अधिक खराब असल्याने ते पेरणीयोग्य नाही व उगवणशक्ती कमी असणारे आहे. त्यामुळे या बियाण्यावर पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी लागणार आहे. २ वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे ँॅत्र१ल्ल हंगामाकरिता सोयाबीन बियाण्यांची अवस्था बिकट आहे. महाबीजचे प्लॉट देखील निकृष्ट आहे. अन्य बियाणे कंपन्यांची हीच स्थिती आहे. राज्यात सर्वाधिक सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांची अशीच व्यथा आहे. शेतकऱ्यांना आंतर पिकावर भर द्यावा लागणार आहे. या बिकट परिस्थितीमुळे यावर्षीचा सोयाबीनचा हंगाम शेतकऱ्यांना फारसा सुखावह राहणार नाही याची चिन्हे आतापासूनच दिसायला लागली आहे.