शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

यंदा एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

By admin | Updated: April 24, 2015 00:17 IST

२०१३-१४ च्या हंगामातील सोयाबीन डागी व ५० टक्केही उगवणशक्ती नसणारे होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

गजानन मोहोड अमरावतीसलग दोन हंगामात सोयाबीन उद्धवस्त झाले. २०१३-१४ च्या हंगामातील सोयाबीन डागी व ५० टक्केही उगवणशक्ती नसणारे होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. २०१४-१५ च्या हंगामात पावसाअभावी सोयाबीन शेतातच विरले, उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांनी घट झाली. यंदा साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी होण्याची शक्यता आहे. यासाठी किमान २ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. महाबीज व इतर कंपन्यांकडून केवळ १ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असल्याने एक लाख क्विंटल बियाण्यांचा तुटवडा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे राखून ठेवून बीजप्रक्रिया करावी, असा कृषी विभागाचा सल्ला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. मागील वर्षीचे सोयाबीन अतीपाऊस, परतीचा पाऊस यामध्ये गारद झाले. यंदाचे सोयाबीन पावसाअभावी दीड महिना उशिराने झालेली पेरणी व नंतर पावसातील खंड यामुळे बाधित झाले तसेच बाधित बियाण्यांच्या पेरणीमुळे यंदा सोयाबीनवर पिवळ्या ‘मोझॅक’ चा अटॅक झाला. या सर्वांचा परिणाम होऊन ७० टक्के सोयाबीन करपले. एकरी पोत्याचीही झडती झाली नाही. काही शेतामधील सोयाबीन शेतातच विरले मागील वर्षापेक्षा यंदाचे सोयाबीन अधिक खराब असल्याने ते पेरणीयोग्य नाही व उगवणशक्ती कमी असणारे आहे. त्यामुळे या बियाण्यावर पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी लागणार आहे. २ वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे ँॅत्र१ल्ल हंगामाकरिता सोयाबीन बियाण्यांची अवस्था बिकट आहे. महाबीजचे प्लॉट देखील निकृष्ट आहे. अन्य बियाणे कंपन्यांची हीच स्थिती आहे. राज्यात सर्वाधिक सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांची अशीच व्यथा आहे. शेतकऱ्यांना आंतर पिकावर भर द्यावा लागणार आहे. या बिकट परिस्थितीमुळे यावर्षीचा सोयाबीनचा हंगाम शेतकऱ्यांना फारसा सुखावह राहणार नाही याची चिन्हे आतापासूनच दिसायला लागली आहे.