शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 28, 2015 00:16 IST

खरीप हंगाम आठवडा भरावर येवून ठेपला असतानाही मागील पाच महिन्यांपूर्वी घेतलेल्या कर्ज पूर्नगठनाच्या ...

हंगाम तोंडावर: प्रशासन थंड, शेतकरी चिंतीतजितेंद्र दखने अमरावतीअमरावती : खरीप हंगाम आठवडा भरावर येवून ठेपला असतानाही मागील पाच महिन्यांपूर्वी घेतलेल्या कर्ज पूर्नगठनाच्या निर्णयाची शासनाकडून अंमलबजावणी होऊ न शकल्याने राष्ट्रीयकृत बँकेसह जिल्हा बँकेच्या लाखो कर्जदार शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संकटात सापडला आहे.कर्ज पुनर्गठनाबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून केवळ कागदोपत्री व्यवहार सुरु असल्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरिपात पावसाची दडी तर रबीत गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील दोन्ही हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने ७२४१ गावे दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आली. जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हरभरा या प्रमुख पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घसरले. अशातच महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारासाठी शेतकऱ्यांना नाईलाजास्तव शेतमालाची कमी दरात विक्री करावी लागली. अशा स्थितीत राज्य शासनाने ५ महिन्यांपूर्वी झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जमीन महसुलात सूट, शेतीच्या कर्ज वसुलीची स्थगिती, सहकवारी कर्जाचे पूनर्गठन, वीज बिलात सूट, परीक्षा शुल्कात माफी आदी उपाययोजना बाबत निर्णय घेतले होते. कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करणे शक्य न होवू शकल्यामुळे जिल्हा बँकेचे १ लाख ३८ हजार ८०६ शेतकऱ्यांसह राष्ट्रीयकृत बँकेचे लाखो शेतकरी थकीत राहिले आहे. खरीप हंगाम आठवडा भरावर आला असला तरी कर्जाच्या पुनर्गठनाबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. शेतीची कामे कशी करावी, असा गंभीर प्रश्न सद्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. केवळ प्रशासकीय अडचणीमुळे हा प्रश्न रखडून पडला आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कर्जाच्या पुनर्गठणासंदर्भात ३० जून ऐवजी तातडीने निर्णय घ्यावा, असे पत्र सहकार विभागाने नाबार्डकडे पाठविलेले आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल याची खात्री आहे.- प्रेम राठोड, सहायक निबंधक.