शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

सव्वालाख शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 28, 2015 00:16 IST

खरीप हंगाम आठवडा भरावर येवून ठेपला असतानाही मागील पाच महिन्यांपूर्वी घेतलेल्या कर्ज पूर्नगठनाच्या ...

हंगाम तोंडावर: प्रशासन थंड, शेतकरी चिंतीतजितेंद्र दखने अमरावतीअमरावती : खरीप हंगाम आठवडा भरावर येवून ठेपला असतानाही मागील पाच महिन्यांपूर्वी घेतलेल्या कर्ज पूर्नगठनाच्या निर्णयाची शासनाकडून अंमलबजावणी होऊ न शकल्याने राष्ट्रीयकृत बँकेसह जिल्हा बँकेच्या लाखो कर्जदार शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संकटात सापडला आहे.कर्ज पुनर्गठनाबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून केवळ कागदोपत्री व्यवहार सुरु असल्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरिपात पावसाची दडी तर रबीत गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील दोन्ही हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने ७२४१ गावे दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आली. जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हरभरा या प्रमुख पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घसरले. अशातच महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारासाठी शेतकऱ्यांना नाईलाजास्तव शेतमालाची कमी दरात विक्री करावी लागली. अशा स्थितीत राज्य शासनाने ५ महिन्यांपूर्वी झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जमीन महसुलात सूट, शेतीच्या कर्ज वसुलीची स्थगिती, सहकवारी कर्जाचे पूनर्गठन, वीज बिलात सूट, परीक्षा शुल्कात माफी आदी उपाययोजना बाबत निर्णय घेतले होते. कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करणे शक्य न होवू शकल्यामुळे जिल्हा बँकेचे १ लाख ३८ हजार ८०६ शेतकऱ्यांसह राष्ट्रीयकृत बँकेचे लाखो शेतकरी थकीत राहिले आहे. खरीप हंगाम आठवडा भरावर आला असला तरी कर्जाच्या पुनर्गठनाबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. शेतीची कामे कशी करावी, असा गंभीर प्रश्न सद्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. केवळ प्रशासकीय अडचणीमुळे हा प्रश्न रखडून पडला आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कर्जाच्या पुनर्गठणासंदर्भात ३० जून ऐवजी तातडीने निर्णय घ्यावा, असे पत्र सहकार विभागाने नाबार्डकडे पाठविलेले आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल याची खात्री आहे.- प्रेम राठोड, सहायक निबंधक.