शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलिस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST

प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण? अमरावती : ...

प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण?

अमरावती : राजकमल चौकाच्या रेल्वे पुलावरून ताब्यात घेतलेल्या महिलेला पोलीस ठाण्यात आणून रात्री आठच्या सुमारास हाकलून देण्यात आले. तिने काही सांगण्यापूर्वी काठी उगारून तिला पिटाळून लावण्यात आले. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद होत असल्याची कल्पना आल्याने काठी शांत झाली. मात्र, तिला दैव नेईल तिकडे जाण्यास बाध्य करण्यात आले.

अमरावती मुंबई अंबा एक्स्प्रेस निघण्याच्या मुहूर्तावर पुलावरून उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न भटक्या समाजातील एका महिलेने गुरुवारी रात्री सातच्या सुमारास केला होता. अवघ्या पाच वर्षांच्या तिच्या मुलाने हालचाली ओळखून गलका केला. त्यामुळे नागरिक व पोलिसांच्या सीआर व्हेन यांनी तिचा हा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर तिला शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. राजकमल वा अन्य महत्त्वाच्या चौकात भीक मागून वास्तव्य करणाऱ्या समाजातील या महिलेकडे यामुळेच पोलिसांनी नेहमीच्या सवयीनुसार दुर्लक्ष केले. अगदी जुजबी चौकशीदेखील तीच्या कडून करण्यात आली नाही रात्री आठच्या सुमारास तिला येथून बाहेर काढण्यात त्यांनी धन्यता मानली. ती काही सांगण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, तिला बाहेर काढण्यात आले आणि पोलीस ठाण्याबाहेर जाण्याचे दरडावून सांगत एका कर्मचाऱ्याने काठी उगारली. तिच्यासोबत चिमुकला होताच. आईला मारहाण होणार, याची कल्पना आलेल्या त्या मुलाने रडणे सुरु केले. यादरम्यान हा प्रसंग चित्रित होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे काठी उगारलेल्या कर्मचाऱ्याला थांबवून आणि महिलेला काहीबाही समजावून अन्य कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर काढले.

बॉक्स

वंचितांचे ऐकणार कोण?

स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचे ब्रीद मिरवणाऱ्या महापालिकेच्या पुढ्यात सर्वांकडून उपेक्षित अशी कुटुंबे राहतात. जगण्याचे भान नसलेल्या या कुटुंबांमध्ये पुरुष -महिलांना विविध व्यसनाधीनता जडली आहे. त्यांचे योग्य प्रबोधन व पुनर्वसन झाल्यास आणि मुलांना शिक्षणाची संधी मिळाल्यास अशी मानहानी त्यांच्या वाटेला येणार नाही. याकरिता जबाबदारीचे भान ठेवून सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.