शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलिस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST

प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण? अमरावती : ...

प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण?

अमरावती : राजकमल चौकाच्या रेल्वे पुलावरून ताब्यात घेतलेल्या महिलेला पोलीस ठाण्यात आणून रात्री आठच्या सुमारास हाकलून देण्यात आले. तिने काही सांगण्यापूर्वी काठी उगारून तिला पिटाळून लावण्यात आले. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद होत असल्याची कल्पना आल्याने काठी शांत झाली. मात्र, तिला दैव नेईल तिकडे जाण्यास बाध्य करण्यात आले.

अमरावती मुंबई अंबा एक्स्प्रेस निघण्याच्या मुहूर्तावर पुलावरून उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न भटक्या समाजातील एका महिलेने गुरुवारी रात्री सातच्या सुमारास केला होता. अवघ्या पाच वर्षांच्या तिच्या मुलाने हालचाली ओळखून गलका केला. त्यामुळे नागरिक व पोलिसांच्या सीआर व्हेन यांनी तिचा हा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर तिला शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. राजकमल वा अन्य महत्त्वाच्या चौकात भीक मागून वास्तव्य करणाऱ्या समाजातील या महिलेकडे यामुळेच पोलिसांनी नेहमीच्या सवयीनुसार दुर्लक्ष केले. अगदी जुजबी चौकशीदेखील तीच्या कडून करण्यात आली नाही रात्री आठच्या सुमारास तिला येथून बाहेर काढण्यात त्यांनी धन्यता मानली. ती काही सांगण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, तिला बाहेर काढण्यात आले आणि पोलीस ठाण्याबाहेर जाण्याचे दरडावून सांगत एका कर्मचाऱ्याने काठी उगारली. तिच्यासोबत चिमुकला होताच. आईला मारहाण होणार, याची कल्पना आलेल्या त्या मुलाने रडणे सुरु केले. यादरम्यान हा प्रसंग चित्रित होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे काठी उगारलेल्या कर्मचाऱ्याला थांबवून आणि महिलेला काहीबाही समजावून अन्य कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर काढले.

बॉक्स

वंचितांचे ऐकणार कोण?

स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचे ब्रीद मिरवणाऱ्या महापालिकेच्या पुढ्यात सर्वांकडून उपेक्षित अशी कुटुंबे राहतात. जगण्याचे भान नसलेल्या या कुटुंबांमध्ये पुरुष -महिलांना विविध व्यसनाधीनता जडली आहे. त्यांचे योग्य प्रबोधन व पुनर्वसन झाल्यास आणि मुलांना शिक्षणाची संधी मिळाल्यास अशी मानहानी त्यांच्या वाटेला येणार नाही. याकरिता जबाबदारीचे भान ठेवून सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.