शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियानापासून जिल्हा दूरच

By admin | Updated: August 7, 2014 23:43 IST

जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचे धोरण शासनाचे आहे. या अभियानाला लोक सहभागातून चालना देण्यासाठी ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ स्पर्धा आयोजित केली आहे.

अमरावती : जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचे धोरण शासनाचे आहे. या अभियानाला लोक सहभागातून चालना देण्यासाठी ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ स्पर्धा आयोजित केली आहे. १५ जूनपासून सुरू झालेले हे अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत ग्रामस्तरावर राबवावयाचे आहे. मात्र, हे अभियान राबविण्यात अडचणी येत असल्याने जिल्ह्यात याबाबत उदासीनताच असल्याचे दिसून आले आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून पाणीटंचाईवर मात करता येते आणि पर्यावरणाचा समतोलही साधता येतोे. या उद्देशाने पावसाचे पाणी अडविण्यावर राज्य शासनाने विशेष भर दिला आहे. उपक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘पाणी साठवा गाव वाचवा’ स्पर्धा आयोजित केली आहे. या हेतूने सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीही झाल्या. पदाधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षितअभियान राबविण्यासाठी ग्रा.पं. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी गावाच्या पाणीप्रश्नासाठी प्राधान्याने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार गावातील लोकांना आणि जनावरांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. त्यादृष्टीने हे अभियान राबविले जात आहे. अभियान अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.