शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

‘मेरिट वाचवा, देश वाचवा’ची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:38 IST

उपेक्षित, वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागू केलेले आरक्षण सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रासारख्या प्रगत देशात कागदावर ७८ टक्क््यांपर्यंत, तर प्रत्यक्षात ९५ टक्क््यांवर पोहचवले आहे. या मुद्द्यावर अतिआरक्षण विरोधी एकता मंच एकवटला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांचा ‘दांडी मार्च’मध्ये सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उपेक्षित, वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागू केलेले आरक्षण सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रासारख्या प्रगत देशात कागदावर ७८ टक्क््यांपर्यंत, तर प्रत्यक्षात ९५ टक्क््यांवर पोहचवले आहे. या मुद्द्यावर अतिआरक्षण विरोधी एकता मंच एकवटला आहे. ‘मेरिट वाचवा देश वाचवा’ आंदोलनातून लक्ष वेधत सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकत्रित येत बुधवारी आंदोलन छेडले. नेहरू मैदानातून बुधवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान शांततेत दांडी मार्च काढून यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन दिले.गठ्ठा मतांच्या लोभातून १० वर्षांसाठी लागू केलेले आरक्षण स्वातंत्र्याच्या सत्तरीतही कायम आहे. प्रत्येक सत्ताधाºयाने त्यात भर घालत खुल्या वर्गासाठी जेमतेम पाच टक्के जागा ठेवल्या आहेत. दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाला, त्यावेळी तेथे आरक्षणाविषयी सूचविण्यात आले. मात्र, नेल्सन मंडेला यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. बांग्लादेशात कडाडून विरोध झाल्याने सरकारी नोकºयांतील आरक्षण रद्द झाले. तथापि, आपल्याकडे सत्ताधाºयांची ही गरज बनली आहे. यामुळे ९८ टक्के गुण घेऊनही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कुठेही प्रवेश मिळत नाही, तर ४० टक्के गुण घेणारा आरक्षणाच्या बळावर तरून जातो. हा अन्याय किती दिवस सहन करायचा? सर्व शैक्षणिक शाखा व शासकीय नोकºयांमध्ये अतिआरक्षणामुळे गुणवत्ता व प्रतिभा डावलली जात असल्याने अतिआरक्षण विरोधी एकता मंचने उभारलेल्या ‘मेरिट वाचवा देश वाचवा’ चळवळीने आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे. नेहरु मैदान ते इर्विन चौकापर्यंत दांडी मार्च काढण्यात आला. यावेळी डॉक्टर, इंजिनिअर, सीए, व्यापारी आदी क्षेत्रातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या आहेत मागण्याराज्य सरकारने वाढविलेले आरक्षण तत्काळ रद्द करण्यात यावे, इयरमार्किंग पद्धत बंद करावी. आरक्षण विनाअट नसावे. शासनाने ५० लाखांचा बाँड द्यावा व त्याच्या बदल्यात दुर्गम भागात पाच वर्षे सेवेची अट ठेवावी. पदव्युत्तर प्रवेशासाठी आरक्षण असूच नये, आरक्षण केवळ शासकीय महाविद्यालयांमध्येच असावे. त्यामुळे खासगी संस्थांना कररूपी डोनेशन वाचेल. शिक्षण वा नोकरीत आरक्षण एकदाच मिळावे. बढत्यांमध्ये आरक्षण असू नये. आर्थिक निकषांसह सशर्त आरक्षण असावे. यामुळे जातिभेद नष्ट होण्यास मदत मिळेल. अशा अनेक प्रकारच्या मागण्या आंदोलनकर्त्यांच्या होत्या.