शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

‘मेरिट वाचवा, देश वाचवा’ची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:38 IST

उपेक्षित, वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागू केलेले आरक्षण सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रासारख्या प्रगत देशात कागदावर ७८ टक्क््यांपर्यंत, तर प्रत्यक्षात ९५ टक्क््यांवर पोहचवले आहे. या मुद्द्यावर अतिआरक्षण विरोधी एकता मंच एकवटला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांचा ‘दांडी मार्च’मध्ये सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उपेक्षित, वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागू केलेले आरक्षण सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रासारख्या प्रगत देशात कागदावर ७८ टक्क््यांपर्यंत, तर प्रत्यक्षात ९५ टक्क््यांवर पोहचवले आहे. या मुद्द्यावर अतिआरक्षण विरोधी एकता मंच एकवटला आहे. ‘मेरिट वाचवा देश वाचवा’ आंदोलनातून लक्ष वेधत सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकत्रित येत बुधवारी आंदोलन छेडले. नेहरू मैदानातून बुधवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान शांततेत दांडी मार्च काढून यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन दिले.गठ्ठा मतांच्या लोभातून १० वर्षांसाठी लागू केलेले आरक्षण स्वातंत्र्याच्या सत्तरीतही कायम आहे. प्रत्येक सत्ताधाºयाने त्यात भर घालत खुल्या वर्गासाठी जेमतेम पाच टक्के जागा ठेवल्या आहेत. दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाला, त्यावेळी तेथे आरक्षणाविषयी सूचविण्यात आले. मात्र, नेल्सन मंडेला यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. बांग्लादेशात कडाडून विरोध झाल्याने सरकारी नोकºयांतील आरक्षण रद्द झाले. तथापि, आपल्याकडे सत्ताधाºयांची ही गरज बनली आहे. यामुळे ९८ टक्के गुण घेऊनही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कुठेही प्रवेश मिळत नाही, तर ४० टक्के गुण घेणारा आरक्षणाच्या बळावर तरून जातो. हा अन्याय किती दिवस सहन करायचा? सर्व शैक्षणिक शाखा व शासकीय नोकºयांमध्ये अतिआरक्षणामुळे गुणवत्ता व प्रतिभा डावलली जात असल्याने अतिआरक्षण विरोधी एकता मंचने उभारलेल्या ‘मेरिट वाचवा देश वाचवा’ चळवळीने आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे. नेहरु मैदान ते इर्विन चौकापर्यंत दांडी मार्च काढण्यात आला. यावेळी डॉक्टर, इंजिनिअर, सीए, व्यापारी आदी क्षेत्रातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या आहेत मागण्याराज्य सरकारने वाढविलेले आरक्षण तत्काळ रद्द करण्यात यावे, इयरमार्किंग पद्धत बंद करावी. आरक्षण विनाअट नसावे. शासनाने ५० लाखांचा बाँड द्यावा व त्याच्या बदल्यात दुर्गम भागात पाच वर्षे सेवेची अट ठेवावी. पदव्युत्तर प्रवेशासाठी आरक्षण असूच नये, आरक्षण केवळ शासकीय महाविद्यालयांमध्येच असावे. त्यामुळे खासगी संस्थांना कररूपी डोनेशन वाचेल. शिक्षण वा नोकरीत आरक्षण एकदाच मिळावे. बढत्यांमध्ये आरक्षण असू नये. आर्थिक निकषांसह सशर्त आरक्षण असावे. यामुळे जातिभेद नष्ट होण्यास मदत मिळेल. अशा अनेक प्रकारच्या मागण्या आंदोलनकर्त्यांच्या होत्या.