शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

“शेतकरी वाचवा - लोकशाही वाचवा’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:10 IST

अमरावती : केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या शेतकरीविरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात व हमीभाव कायद्याच्या मागणीसाठी २६ जूनला ‘शेती ...

अमरावती : केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या शेतकरीविरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात व हमीभाव कायद्याच्या मागणीसाठी २६ जूनला ‘शेती वाचवा - लोकशाही वाचवा’ या देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. यानिमित्त अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि कामगार कृती समिती जिल्हा शाखेच्यावतीने दुपारी १२ वाजता राजकमल चौक येथे निदर्शने आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला २६ जूनला सात महिने पूर्ण होत आहेत. जोपर्यत कृषिकायदे सरकार मागे घेणार नाही तसेच शेतीमालासाठी हमीभावाचा कायदा करीत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा व तीव्र करण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत आंदोलन होत आहे. समन्वय समितीच्या बैठकीला आपचे महेश देशमुख, भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, रोशन अर्डक, अशोक सोनारकर, विजय रोडगे, महादेव गारपवार, सतीश ठाकूर, सिटूचे सुभाष पांडे, आयटकचे चंद्रकांत बानुबाकोडे, निळकंठ ढोके आदी पदाधिकारी उपस्थित होते.