शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

शनिवार, रविवारची संचारबंदी कायमस्वरूपी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:01 IST

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ देखील कोरोना प्रतिबंधतत्मक उपाययोजनांसाठी लागू करण्यात आला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रकिया १९७३ चे कलम १४४ (१), (२) व (३) अन्वये १ ऑगस्टपासून जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले.

ठळक मुद्देसण-उत्सव काळात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील दर आठवड्यातील ६० तासांची संचारबंदी रद्द करण्यात आली. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी जारी केले आहेत.जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ देखील कोरोना प्रतिबंधतत्मक उपाययोजनांसाठी लागू करण्यात आला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रकिया १९७३ चे कलम १४४ (१), (२) व (३) अन्वये १ ऑगस्टपासून जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले. यामध्ये शुकवारी सायंकाळी ७ ते सोमवार सकाळ ७ पर्यत संचारबंदी करण्यात आली होती. मात्र, आता संचारबंदीचे आदेश रद्द करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जाहीर केले.दोन आठवड्यांपासून शहरातील संचारबंदीमध्ये काही भागांत खुलेआम उल्लंघन होत असताना, पोलीस, महापालिका व जिल्हा प्रशासनाद्वार कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. लागोपाठ दोन आठवडे भाजीबाजारही लागला. हा दुजाभाव का, हा सवाल नागरिकांनी प्रशासनाला केला होता.सण-उत्सव काळात अडचणी‘मिशन बिगीन अगेन’तंर्गत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. आता सण-उत्सवांच्या दिवसांत संचारबंदीच्या आदेशाबाबत नागरिकांमध्ये नाराजी होती. अनेक उद्योग, व्यवसायांना या काळात समस्या उद्भवत असल्याने हा कर्फ्यू रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी उठविण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, दुकाने, बाजार उघडण्याची विहित वेळ कायम आहे.नियमांचे पालन आवश्यकसंचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आलेली असली तरी जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे चेहºयावर मास्क लावावा. फिजिकल डिस्टन्सिंग व कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत शासनाचे आदेश व सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. बाजारपेठा व दुकाने सुरू ठेवताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तपासण्या, स्वच्छता, निर्जंंतुकीकरण आदीचे पालन करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी त्यांचे पालन करावे, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या