शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

आता रेल्वे मालमत्तांवर सॅटेलाइटने ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:20 IST

रेल्वे स्थानक आणि त्याभोवताल खुल्या जागांवरील वाढत्या अतिक्रमणावर १ एप्रिल २०१९ पासून सॅटेलाइटने ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. त्याअनुषंगाने रेल्वेने इस्रोसोबत करार केला आहे.

ठळक मुद्देइस्रोसोबत करार स्थानक, खुल्या जागांवर नजर

लोकमत न्यूज नेटवर्कगणेश वासनिकअमरावती : रेल्वे स्थानक आणि त्याभोवताल खुल्या जागांवरील वाढत्या अतिक्रमणावर १ एप्रिल २०१९ पासून सॅटेलाइटने ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. त्याअनुषंगाने रेल्वेने इस्रोसोबत करार केला आहे. मालमत्तांचे संरक्षण करण्यात रेल्वे सुरक्षा दल कुचकामी ठरल्याचा ठपकादेखील रेल्वे बोर्डाने ठेवला आहे.देशात रेल्वेची मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. खुले भूखंड आणि बहुतांश जागांवर लोखंडी साहित्य व अन्य मालमत्ता असून, त्यांची देखभाल, संरक्षण करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून रेल्वे स्थानक, खुले भूखंड, कर्मचारी वसाहती, विश्रामगृह, अधिकाऱ्यांचे बंगले आदी मालमत्तांबाबतची नोंद उपग्रहाच्या नियंत्रणात केली जाणार आहे. मुंबई मध्य रेल्वे विभागांतर्गत पाचही विभागांत एक नियंत्रण कक्ष राहील. त्यानुसार नागपूर व भुसावळ मुख्यालयी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या कक्षांना सर्व मालमत्तांची माहिती प्राप्त होईल. मुंबई येथे मुख्य नियंत्रण कक्ष इस्रोला जोडण्यात आले आहे.दरम्यान, रेल्वेच्या सर्व मालमत्तांंचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जीआयएस पोर्टल विकसित करण्यात आले असून, ते पूर्णपणे जीपीएस प्रणालीवर आधारित आहे. रेल्वे प्रशासनाला डिसेंबर २०१८ मध्ये हे पोर्टल उपलब्ध झाले. पोर्टलसाठी सीआरआयएस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स) नव्या अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.२४ तास मालमत्तांवर लक्षरेल्वे स्थानक, मालमत्तांच्या मॅपिंगच्या हिशेबाने उपग्रहात चिन्हांकित स्थान अपलोड करण्यात आले आहेत. त्याद्वारे २४ तास अशा स्थानांवर नजर ठेवली जाणार असून, यात रेल्वे स्थानकांचादेखील समावेश आहे. अतिक्रमण आढळल्यास रेल्वेच्या विभागीय केंद्रातून ही माहिती रेल्वे सुरक्षा यंत्रणेला दिली जाणार आहे.विदर्भात अतिक्रमणाची मोठी समस्याविदर्भात नागपूर, वर्धा, पुलगाव, गोंदिया, भंडारा, अकोला, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकांच्या हद्दीत अतिक्रमण वाढीस लागले आहे. बहुतांश रेल्वे स्थानकाच्या प्रवेशाद्वाराला अतिक्रमणाचा वेढा आहे. ते हटविण्यासाठी प्रशासन पाऊल उचलत नाही.‘‘ रेल्वे मालमत्तांचे सॅटेलाइटने संरक्षण होणार असल्याने चोरीच्या घटनांवर अंकुश लावता येईल. रेल्वेच्या खुल्या जागांवर अतिक्रमण ही समस्या गंभीर असून, आता वरिष्ठांकडून याप्रकरणी दखल घेतल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने ही समस्या दूर करता येईल.- शरद सयाम,मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे