शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

सरपंच आरक्षणाविना निवडणुकीत निरुत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आले आहे. ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक पॅनेलप्रमुखांचा हिरमोड झाला आहे. निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण ठरल्याने गावागावांत या निवडणुकांमध्ये ना चुरस उरली आहे, ना उत्साह आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे कळीचा मुद्दा कायम राहिलेला आहे. त्यामुळे भावकीतील वाद असो अथवा नातेवाइकांमधील मतभेद, या निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून येत असतात. वर्षानुवर्षे वादग्रस्त असलेले अनेक विषय या निवडणुकीच्या निमित्ताने कायमस्वरूपी मिटतात अथवा पुन्हा ते उफाळून येतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रचंड चुरस असते. निवडणुकांमध्ये वर्चस्व निर्माण करून गावची सत्ता काबीज करण्यासाठी पॅनेलप्रमुख या निवडणुकांमध्ये साम, दाम ,दंड आणि भेद या चतु:सूत्रीचा उपयोग करतात.

यंदा शासनाने निवडणूकपश्चात सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे संभाव्य सरपंच कोण असणार वा नाही, हे स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आता या निवडणुका कशासाठी आणि नेमके कोणाला सरपंच करण्यासाठी लढायच्या, असा प्रश्न पॅनेलप्रमुखांसमोरही निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीतून अंग काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.

---------------

सरपंचाचे गणित लागेना

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा आणि उत्सुकतेचा विषय. पण, आता होत असलेल्या निवडणुकांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण स्पष्ट असल्याने पॅनेलप्रमुख उमेदवारांच्या ग्रामस्थांमध्ये ही एवढी उत्सुकता दिसून येत नाही. सरपंच कोण होऊ शकेल, याचा अंदाज बांधता येत नसल्याने पॅनेलप्रमुखही चक्रावून गेल्याचे चित्र आहे