शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

सरपंच आरक्षणाविना निवडणुकीत निरुत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आले आहे. ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक पॅनेलप्रमुखांचा हिरमोड झाला आहे. निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण ठरल्याने गावागावांत या निवडणुकांमध्ये ना चुरस उरली आहे, ना उत्साह आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे कळीचा मुद्दा कायम राहिलेला आहे. त्यामुळे भावकीतील वाद असो अथवा नातेवाइकांमधील मतभेद, या निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून येत असतात. वर्षानुवर्षे वादग्रस्त असलेले अनेक विषय या निवडणुकीच्या निमित्ताने कायमस्वरूपी मिटतात अथवा पुन्हा ते उफाळून येतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रचंड चुरस असते. निवडणुकांमध्ये वर्चस्व निर्माण करून गावची सत्ता काबीज करण्यासाठी पॅनेलप्रमुख या निवडणुकांमध्ये साम, दाम ,दंड आणि भेद या चतु:सूत्रीचा उपयोग करतात.

यंदा शासनाने निवडणूकपश्चात सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे संभाव्य सरपंच कोण असणार वा नाही, हे स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आता या निवडणुका कशासाठी आणि नेमके कोणाला सरपंच करण्यासाठी लढायच्या, असा प्रश्न पॅनेलप्रमुखांसमोरही निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीतून अंग काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.

---------------

सरपंचाचे गणित लागेना

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा आणि उत्सुकतेचा विषय. पण, आता होत असलेल्या निवडणुकांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण स्पष्ट असल्याने पॅनेलप्रमुख उमेदवारांच्या ग्रामस्थांमध्ये ही एवढी उत्सुकता दिसून येत नाही. सरपंच कोण होऊ शकेल, याचा अंदाज बांधता येत नसल्याने पॅनेलप्रमुखही चक्रावून गेल्याचे चित्र आहे