शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

सरपंच आरक्षणाविना निवडणुकीत निरुत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आले आहे. ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक पॅनेलप्रमुखांचा हिरमोड झाला आहे. निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण ठरल्याने गावागावांत या निवडणुकांमध्ये ना चुरस उरली आहे, ना उत्साह आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे कळीचा मुद्दा कायम राहिलेला आहे. त्यामुळे भावकीतील वाद असो अथवा नातेवाइकांमधील मतभेद, या निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून येत असतात. वर्षानुवर्षे वादग्रस्त असलेले अनेक विषय या निवडणुकीच्या निमित्ताने कायमस्वरूपी मिटतात अथवा पुन्हा ते उफाळून येतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रचंड चुरस असते. निवडणुकांमध्ये वर्चस्व निर्माण करून गावची सत्ता काबीज करण्यासाठी पॅनेलप्रमुख या निवडणुकांमध्ये साम, दाम ,दंड आणि भेद या चतु:सूत्रीचा उपयोग करतात.

यंदा शासनाने निवडणूकपश्चात सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे संभाव्य सरपंच कोण असणार वा नाही, हे स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आता या निवडणुका कशासाठी आणि नेमके कोणाला सरपंच करण्यासाठी लढायच्या, असा प्रश्न पॅनेलप्रमुखांसमोरही निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीतून अंग काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.

---------------

सरपंचाचे गणित लागेना

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा आणि उत्सुकतेचा विषय. पण, आता होत असलेल्या निवडणुकांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण स्पष्ट असल्याने पॅनेलप्रमुख उमेदवारांच्या ग्रामस्थांमध्ये ही एवढी उत्सुकता दिसून येत नाही. सरपंच कोण होऊ शकेल, याचा अंदाज बांधता येत नसल्याने पॅनेलप्रमुखही चक्रावून गेल्याचे चित्र आहे