शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पूर्वसूचना फेटाळणाऱ्या कंपनीला ‘एसएओंची’ फटकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 16:06 IST

अवकाळीसह गारपीटचे नुकसान, शेतकरी अर्जाची पाहणी करण्याचे आदेश

अमरावती : बाधित साडेतीन हजार शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीसाठी दाखल केलेल्या पूर्वसूचनांपैकी बहुतांश पीक विमा कंपनीद्वारा फेटाळण्यात आल्या. ‘लोकमत’ने ही बाब जनदरबारात मांडताच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कंपनी प्रतिनिधींना फटकारले व लेखी पत्र देवून तंबी दिली. याशिवाय तांत्रिक कारणांसह खूलासादेखील मागितला आहे.

मार्चअखेर जिल्ह्यास दोन वेळा अवकाळीसह गारपिटीने तडाखा दिला. त्यामुळे सात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, कांदा, स्ट्राबेरी, भाजीपाला, मका, उन्हाळी मूग यासह संत्रा, मोसंबी, लिंबू व आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. यासाठी पीक विमा योजनेत सहभागी असलेल्या साडे तीन हजार शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या केल्या, यापैकी तीन हजारावर पूर्वसूचना अर्ज पीक विमा कंपनीद्वारा नाकारण्यात आले आहे. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच कृषी विभागाने याची गंभीर दखल घेतली.

पीक विमा कंपनीला याविषयी कृषी विभागाद्वारा पत्र देण्यात आलेले आहे. या पूर्वसूचना ग्राह्य धरण्यात याव्यात व पंचनामे करण्याच्या सूचना एसएओ अनिल खर्चान यांनी दिल्या. याशिवाय बैठक बोलावून शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनांच्या आधारे बाधित पिकांची पाहणी करण्याच्या सूचना कंपनी प्रतिनिधीला देण्यात आल्या.