शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

स्वच्छताग्रही एक वर्षापासून मानधनाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्हा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक स्वच्छाग्रही ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आला आहे. ...

अमरावती : जिल्हा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक स्वच्छाग्रही ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आला आहे. या स्वच्छाग्रहीकडे गाव पातळीवरील स्वच्छताविषयक देखरेखीची सर्व कामे सोपविण्यात आली आहेत. मात्र, मागील एक वर्षापासून स्वच्छाग्रहींना मानधनापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

गाव पातळीवर वेळोवेळी शासन निर्देशानुसार स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन विविध सर्वेक्षण ऑनलाइन, ऑफलाइन करण्याची जबाबदारीसुद्धा स्वच्छाग्रहीकडे सोपविण्यात आली आहे. ही सर्व कामे स्वच्छाग्रही नियमित करीत आहेत. परंतु त्यांना अद्यापही पुरेसे मानधन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्व स्वच्छाग्रहीमध्ये या कामाबद्दल उदासीनता पसरलेली आहे. जवळपास दीड हजारांवर स्वच्छताग्रही कार्यरत असून त्यांची नेमणूक ग्रामपंचायतीने केली आहे. या स्वच्छताग्रहींना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर काम पूर्ण झाल्यानुसार मानधन अदा करण्यात येते. यात संबंधित स्वच्छाग्रहीने एका लाभार्थ्यास वैयक्तिक शौचालय बांधकामास सुरुवात केल्यानंतर त्या स्वच्छाग्रहीला त्या कामापोटी ५० रुपये मानधन दिले जाते. परंतु, एक ते दीड वर्षापासून जिल्हास्तरावर शासनाकडून आयईसीचा निधी अप्राप्त असल्यामुळे संबंधित स्वच्छाग्रहींना पूर्ण मानधन अदा करण्यात आले नाही. हे सर्व कर्मचारी ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, रोजगार सेवक, आशामधून असल्याने त्यांना इतर कामांचे मानधन मिळते. कोरोनाकाळात गाव पातळीवर सर्व स्वच्छाग्रहीनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे व आज देखील नियमित करीतच आहेत.

कोट

आयईसी अंतर्गतमागील दीड वर्षापासून केंद्र व राज्याकडून निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे निधी वर्ग करू शकले नाही. निधीची मागणी शासनाकडे वारंवार करण्यात येत आहे. निधी प्राप्त होताच सर्व संबंधितांना तातडीने त्यांचे मानधन अदा करण्यात येईल.

- श्रीराम कुलकर्णी,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

स्वच्छ भारत मिशन कक्ष जिल्हा परिषद