शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

...तर दीक्षांत सोहळा उधळून लावू; संभाजी ब्रिगेड, एआयएसएफचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 21:00 IST

कुलसचिव तुषार देशमुख यांना संभाजी ब्रिगेड व एआयएसएफचे पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. कुलसचिवांना निवेदन, संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनीच अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा घेण्याची मागणी.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा २१ नव्हे, तर २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी घेण्यात याव्या, अन्यथा दीक्षांत सोहळा उधळून लावू, असा निर्वाणीचा इशारा संभाजी ब्रिगेड, ऑल इंडिया स्टुडन्ट्‌स फेडरेशनच्यावतीने बुधवारी देण्यात आला. यासंदर्भात कुलसचिव तुषार देशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले.

संत गाडगेबाबांची जयंती २३ फेब्रुवारी रोजी असताना अमरावती विद्यापीठाने २१ फेब्रुवारी रोजी दीक्षांत सोहळ्याचे आयोजन कुणासाठी केले, असा प्रश्न संभाजी ब्रिगेड, एआयएसएफने उपस्थित केला आहे. अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा दरवर्षी २० डिसेंबर रोजी गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात येतो. मात्र, यंदा कोरोना संसर्गामुळे दीक्षांत सोहळा लांबणीवर पडला. असे असताना विद्यापीठ प्रशासनाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी दीक्षांत सोहळा न घेता पाहुण्यांच्या तारखेप्रमाणे २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात येत आहे.

गाडगेबाबा यांच्यापेक्षा आमंत्रित पाहुणे मोठे कसे झाले, असा सवाल संभाजी ब्रिगेड, एआयएसएफने उपस्थित केला आहे. गाडगेबाबांची जयंती मोठी की, पाहुण्यांसाठी मॅनेज केलेली तारीख मोठी, विद्यापीठाच्या अधिकारी, प्राधिकारिणीला कळू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. दीक्षांत सोहळा २३ फेब्रुवारी रोजी आयोजन करून विद्यार्थ्यांना याच दिवशी पदवी, पदकांनी सन्मानित करावे, अन्यथा हा सोहळा उधळून लावू. होणाऱ्या परिणामाला विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शुभम शेरेकर, याेगेश चव्हाण, कैलास चव्हाण, नीलेश सोनटक्के, राहुल खोडके, रोहन देढे, योगेश चव्हाण आदींनी निवेदन सादर केले.