शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

आत्मध्यानातून मोक्षप्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:02 IST

जगात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे आत्मा, जगातील सर्व वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी होतील, पण आत्मा हा चिरकाल टिकेल, कारण त्याला आदीही नाही आणि अंतही नसल्याचे प्रबोधन संत परमानंद महाराज यांनी येथे केले.

ठळक मुद्देपरमानंद महाराजांचे प्रबोधन : आत्मा मालीक ध्यान योग मिशन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जगात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे आत्मा, जगातील सर्व वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी होतील, पण आत्मा हा चिरकाल टिकेल, कारण त्याला आदीही नाही आणि अंतही नसल्याचे प्रबोधन संत परमानंद महाराज यांनी येथे केले.कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमातील आत्मा मालीक ध्यानपिठाच्यावतीने शहरात प्रथमच रविवारी सायंकाळी बडनेरा रोड स्थित नरेशबाबू लॉन येथे आत्मा मालिक सत्संग सोहळा पार पडला.अनादी काळापासून आत्मसत्व चालत आलेले आहे आणि अनंत काळापर्यंत असेच चालत राहील, कारण आत्मा अमर आहे. सर्व देवांच्या उत्पत्तीपूर्वी आत्मा स्थित होता, म्हणून आपण आत्म्याची पूजा केली पाहिजे. आत्म्यावर प्रेम केले पाहिजे, तसेच क्षणभर केलेले आत्मचिंतन कितीतरी श्रेष्ठ आहे. आत्मध्यानातून मोक्ष प्राप्ती होऊ शकते, हाच उद्देश आत्मा मालिक ध्यानपिठाचा असल्याचे ते म्हणाले.सबका मालिक आत्मा, या विषयावर सत्संगाद्वारे अमूल्य असे मार्गदर्शन उपस्थित संतांनी केले. अमरावतीमधील सत्संग न भुतो भविष्यती, असा असल्याचे ते म्हणाले. अंबानगरी संताची नगरी आहे, या संताच्या नगरीत आत्मध्यान सत्संगाचा योग ईश्वरीय शक्तीची अनुभुतीच आहे. आज प्रत्येक जिवाला सुख, आनंद हवा, मी कोण आहे, हे कळावे, यासाठी आत्मध्यान करणे आवश्यक आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण आनंदाचा शोध घेतो, मात्र, खरा आनंद मिळविण्यासाठी आत्मध्यान प्राप्त करणे आवश्यक आहे. सत्संगाच्या यशस्वीतेसाठी आर.बी.अटल, संजय हरवानी, नरेंद्र भाराणी, राजेश डागा, संतोष महात्मे, सुरेश रतावा, विक्रम झंवर, विनायक ठाकरे, मेघशाम करडे, देवदत्त शर्मा, विनोद डागा, गोपाल धुत, रोहित राठी, सुधीर वाकोडे, पवन भुतडा, शुभम शेगोकार, सुभाष पावडे, अनिल सावरकर यांनी परिश्रम घेतले. या सत्संग सोहळ्यात पालकमंत्री प्रवीण पोटे, नवनीत राणा, हनुमंत भोगळे, विलास इंगोले यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.आत्मध्यान सत्संगातील भजनामुळे मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली होती. भजन सेवा मंडळाचे जगदिश चव्हाण यांनी भजन गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.बालब्रम्हचारी वृंदाचा मंत्रोपचारआत्मध्यान करताना आत्म्याची पूजा मंत्रोपचाराने करण्यात आली. बाल ब्रम्हचारी वृंदांनी वेद मंत्र उच्चारून सत्संग सोहळ्याला सुरुवात केली. बेलोरा येथील वैभव जोशी यांच्या नेत्तृत्वात बाल देवतांनी मंत्रपुष्पांजली अर्पण केली.विवेकानंद महाराजांचा नामस्मरणाचा मंत्रसंत महापुरुषांनी आपल्या वाणीतून सर्वांना धार्मिकतेचे ज्ञान दिले. मात्र, भक्तांनी ते ऐकण्याशिवाय काही केले नाही. संत महात्म्यांनी दिलेल्या ज्ञानाची कृती केली नाही, त्यामुळे वैराग्य प्राप्त झाले नाही. संतांनी प्रबोधन केले, मात्र, तरीही समाज परिवर्तन होत नाही, कारण संतांनी सांगितलेले केवळ ऐकत गेलो,जोपर्यंत आपण आत्म्याला जाणत नाही, तोपर्यंत परमात्मा मिळत नाही, त्यामुळे सदगुरुच्या शरण जा, नामस्मरण करा, असा संदेश विवेकानंद महाराज यांनी दिला.सीपी दत्तात्रय मंडलिक माऊलीच्या सानिध्यातपोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी आत्मा मालीक सत्संग सोहळा आयोजित करण्यासाठी परिश्रम घेतले. माऊलीच्या सानिध्यात त्यांनी आत्मध्यानाची उपासना केल्याचे परमानंद महाराज यांनी मंचावर आवर्जून सांगितले. मंडलिक यांच्या पुढाकारानेच हा भव्यदिव्य असा सत्संग सोहळा यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.