शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:13 IST

खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपांचा पुनर्वापर मानवी आरोग्यास धोकादायक आहे; मात्र पैसे वाचविण्यासाठी व्यापाºयांकडून जुन्या, गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री शहरात सर्रास केली जात आहे.

ठळक मुद्देएफडीएचे दुर्लक्ष : नागरिकांच्या आरोग्यास धोका

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपांचा पुनर्वापर मानवी आरोग्यास धोकादायक आहे; मात्र पैसे वाचविण्यासाठी व्यापाºयांकडून जुन्या, गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री शहरात सर्रास केली जात आहे. काही पिंपांचा एमआयडीसीमधील तेल कंपन्या पुनर्वापर करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.तेलाचे पिंप रिकामे झाल्यानंतर इतवारा बाजारात विकले जातात. नंतर अ‍ॅकेडमिक स्कूलच्या मागे रतनगंज-काला नागोबा परिसरात धुतले जातात. इतवारा व सक्करसाथमध्ये ठोक खाद्यतेल व्यापारी आहेत. एमआयडीसीत विविध कंपन्या या व्यापाºयांना खाद्यतेल विकतात. त्यांची साठवणूक धुतलेल्या पिंपांमध्ये केली जाते. पुन्हा व्यापाºयांना विकण्याचा गोरखधंदा थाटण्यात आला आहे. स्वच्छतेसंदर्भात सर्व नियम पायदळी तुडविले जात असताना एफडीएची कारवाई मात्र शून्य आहे.अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार, एक वेळा वापरलेल्या पिंपामध्ये खाद्यतेल भरणे व विक्री करणे नियमबाह्य आहे. तथापि, सर्व नियम धाब्यावर बसवून जुन्या पिंपामध्येच खाद्यतेलाची विक्री बाजारपेठेत करण्यात येते. या परिसरात एफडीएने धाडी टाकून तपासणी करावी व दोषी आढळणाºया व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी करण्यात येत आहे. इतवारा बाजारातून किरकोळ व्यापारी तेलाचा पिंप प्रत्येकी १० ते १५ रुपये दराने विकत घेतात. यावेळी या पिंपांना खाद्यतेल चिकटलेले असते. ज्या ठिकाणी त्यांची सफाई केली जाते, ती जागा अतिशय घाण असल्याचे सदर प्रतिनिधीच्या पाहणीत निदर्शनास आले. धुण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केला जातो. काही दिवसांत धुतलेले हे पिंप पुन्हा इतवारा बाजार व सक्करसाथमध्ये मोठ्या व्यापाºयांना प्रत्येकी २० ते २५ रुपये दराने विक्री केली जाते. दररोज अशा हजारो पिंपांचा व्यापार या ठिकाणी खुलेआम चालतो. त्यामधून लाखोे रुपये कमाविले जातात. रतनगंज परिसरात या व्यवसायात २० ते ३० जण असल्याची माहिती आहे. प्रत्येक पिंप धुऊन बाजारपेठेत विक्री करण्यामागे ५ ते १० रुपये कमावितो, असे एका व्यावसायिकाने स्पष्ट केले. यासंदर्भात अन्न व प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.आरोग्याला हानिकारकजुन्या पिंपांमध्ये खाद्यतेल भरून त्याची विक्री होत असेल, तर त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भेसळयुक्त तेल खाणे हे आरोग्याला हानिकारक आहे. यामुळे पोटाचे विकार बळावतात, असे मत कॅन्सरतज्ज्ञ अतुल यादगिरे यांनी सांगितले.असा होतो पिंपांचा पुनर्वापरखाद्यतेलाचा वापर झाल्यानंतर पिंपांची विक्री इतवारातील लोहाबाजारात होते. तेथून सुस्थितीत असलेले पिंप वेगळे काढून रतनगंज परिसरात आणले जातात. डिटर्जंटने धुऊन साफ केल्यानंतर काही दिवसांनी पिंप लोहाबाजारातून ठोक व्यापारी व एमआयडीसीमधील तेल उत्पादक कारखान्यांना पाठविले जातात.