शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:13 IST

खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपांचा पुनर्वापर मानवी आरोग्यास धोकादायक आहे; मात्र पैसे वाचविण्यासाठी व्यापाºयांकडून जुन्या, गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री शहरात सर्रास केली जात आहे.

ठळक मुद्देएफडीएचे दुर्लक्ष : नागरिकांच्या आरोग्यास धोका

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपांचा पुनर्वापर मानवी आरोग्यास धोकादायक आहे; मात्र पैसे वाचविण्यासाठी व्यापाºयांकडून जुन्या, गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री शहरात सर्रास केली जात आहे. काही पिंपांचा एमआयडीसीमधील तेल कंपन्या पुनर्वापर करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.तेलाचे पिंप रिकामे झाल्यानंतर इतवारा बाजारात विकले जातात. नंतर अ‍ॅकेडमिक स्कूलच्या मागे रतनगंज-काला नागोबा परिसरात धुतले जातात. इतवारा व सक्करसाथमध्ये ठोक खाद्यतेल व्यापारी आहेत. एमआयडीसीत विविध कंपन्या या व्यापाºयांना खाद्यतेल विकतात. त्यांची साठवणूक धुतलेल्या पिंपांमध्ये केली जाते. पुन्हा व्यापाºयांना विकण्याचा गोरखधंदा थाटण्यात आला आहे. स्वच्छतेसंदर्भात सर्व नियम पायदळी तुडविले जात असताना एफडीएची कारवाई मात्र शून्य आहे.अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार, एक वेळा वापरलेल्या पिंपामध्ये खाद्यतेल भरणे व विक्री करणे नियमबाह्य आहे. तथापि, सर्व नियम धाब्यावर बसवून जुन्या पिंपामध्येच खाद्यतेलाची विक्री बाजारपेठेत करण्यात येते. या परिसरात एफडीएने धाडी टाकून तपासणी करावी व दोषी आढळणाºया व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी करण्यात येत आहे. इतवारा बाजारातून किरकोळ व्यापारी तेलाचा पिंप प्रत्येकी १० ते १५ रुपये दराने विकत घेतात. यावेळी या पिंपांना खाद्यतेल चिकटलेले असते. ज्या ठिकाणी त्यांची सफाई केली जाते, ती जागा अतिशय घाण असल्याचे सदर प्रतिनिधीच्या पाहणीत निदर्शनास आले. धुण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केला जातो. काही दिवसांत धुतलेले हे पिंप पुन्हा इतवारा बाजार व सक्करसाथमध्ये मोठ्या व्यापाºयांना प्रत्येकी २० ते २५ रुपये दराने विक्री केली जाते. दररोज अशा हजारो पिंपांचा व्यापार या ठिकाणी खुलेआम चालतो. त्यामधून लाखोे रुपये कमाविले जातात. रतनगंज परिसरात या व्यवसायात २० ते ३० जण असल्याची माहिती आहे. प्रत्येक पिंप धुऊन बाजारपेठेत विक्री करण्यामागे ५ ते १० रुपये कमावितो, असे एका व्यावसायिकाने स्पष्ट केले. यासंदर्भात अन्न व प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.आरोग्याला हानिकारकजुन्या पिंपांमध्ये खाद्यतेल भरून त्याची विक्री होत असेल, तर त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भेसळयुक्त तेल खाणे हे आरोग्याला हानिकारक आहे. यामुळे पोटाचे विकार बळावतात, असे मत कॅन्सरतज्ज्ञ अतुल यादगिरे यांनी सांगितले.असा होतो पिंपांचा पुनर्वापरखाद्यतेलाचा वापर झाल्यानंतर पिंपांची विक्री इतवारातील लोहाबाजारात होते. तेथून सुस्थितीत असलेले पिंप वेगळे काढून रतनगंज परिसरात आणले जातात. डिटर्जंटने धुऊन साफ केल्यानंतर काही दिवसांनी पिंप लोहाबाजारातून ठोक व्यापारी व एमआयडीसीमधील तेल उत्पादक कारखान्यांना पाठविले जातात.