शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:13 IST

खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपांचा पुनर्वापर मानवी आरोग्यास धोकादायक आहे; मात्र पैसे वाचविण्यासाठी व्यापाºयांकडून जुन्या, गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री शहरात सर्रास केली जात आहे.

ठळक मुद्देएफडीएचे दुर्लक्ष : नागरिकांच्या आरोग्यास धोका

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपांचा पुनर्वापर मानवी आरोग्यास धोकादायक आहे; मात्र पैसे वाचविण्यासाठी व्यापाºयांकडून जुन्या, गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री शहरात सर्रास केली जात आहे. काही पिंपांचा एमआयडीसीमधील तेल कंपन्या पुनर्वापर करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.तेलाचे पिंप रिकामे झाल्यानंतर इतवारा बाजारात विकले जातात. नंतर अ‍ॅकेडमिक स्कूलच्या मागे रतनगंज-काला नागोबा परिसरात धुतले जातात. इतवारा व सक्करसाथमध्ये ठोक खाद्यतेल व्यापारी आहेत. एमआयडीसीत विविध कंपन्या या व्यापाºयांना खाद्यतेल विकतात. त्यांची साठवणूक धुतलेल्या पिंपांमध्ये केली जाते. पुन्हा व्यापाºयांना विकण्याचा गोरखधंदा थाटण्यात आला आहे. स्वच्छतेसंदर्भात सर्व नियम पायदळी तुडविले जात असताना एफडीएची कारवाई मात्र शून्य आहे.अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार, एक वेळा वापरलेल्या पिंपामध्ये खाद्यतेल भरणे व विक्री करणे नियमबाह्य आहे. तथापि, सर्व नियम धाब्यावर बसवून जुन्या पिंपामध्येच खाद्यतेलाची विक्री बाजारपेठेत करण्यात येते. या परिसरात एफडीएने धाडी टाकून तपासणी करावी व दोषी आढळणाºया व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी करण्यात येत आहे. इतवारा बाजारातून किरकोळ व्यापारी तेलाचा पिंप प्रत्येकी १० ते १५ रुपये दराने विकत घेतात. यावेळी या पिंपांना खाद्यतेल चिकटलेले असते. ज्या ठिकाणी त्यांची सफाई केली जाते, ती जागा अतिशय घाण असल्याचे सदर प्रतिनिधीच्या पाहणीत निदर्शनास आले. धुण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केला जातो. काही दिवसांत धुतलेले हे पिंप पुन्हा इतवारा बाजार व सक्करसाथमध्ये मोठ्या व्यापाºयांना प्रत्येकी २० ते २५ रुपये दराने विक्री केली जाते. दररोज अशा हजारो पिंपांचा व्यापार या ठिकाणी खुलेआम चालतो. त्यामधून लाखोे रुपये कमाविले जातात. रतनगंज परिसरात या व्यवसायात २० ते ३० जण असल्याची माहिती आहे. प्रत्येक पिंप धुऊन बाजारपेठेत विक्री करण्यामागे ५ ते १० रुपये कमावितो, असे एका व्यावसायिकाने स्पष्ट केले. यासंदर्भात अन्न व प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.आरोग्याला हानिकारकजुन्या पिंपांमध्ये खाद्यतेल भरून त्याची विक्री होत असेल, तर त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भेसळयुक्त तेल खाणे हे आरोग्याला हानिकारक आहे. यामुळे पोटाचे विकार बळावतात, असे मत कॅन्सरतज्ज्ञ अतुल यादगिरे यांनी सांगितले.असा होतो पिंपांचा पुनर्वापरखाद्यतेलाचा वापर झाल्यानंतर पिंपांची विक्री इतवारातील लोहाबाजारात होते. तेथून सुस्थितीत असलेले पिंप वेगळे काढून रतनगंज परिसरात आणले जातात. डिटर्जंटने धुऊन साफ केल्यानंतर काही दिवसांनी पिंप लोहाबाजारातून ठोक व्यापारी व एमआयडीसीमधील तेल उत्पादक कारखान्यांना पाठविले जातात.